शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

जी-२० संमेलनादरम्यान काय करावं काय करू नये? मोदींनी मंत्र्यांसाठी तयार केले नियम  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 15:39 IST

G-20 Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आपल्या मंत्र्यांना सांगितले की, सनातन धर्मावर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या टीकेला प्रखरपणे विरोध करा. मात्र त्याचवेळी भारत नावासंदर्भात समोर येत असलेल्या वादापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आपल्या मंत्र्यांना सांगितले की, सनातन धर्मावर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या टीकेला प्रखरपणे विरोध करा. मात्र त्याचवेळी भारत नावासंदर्भात समोर येत असलेल्या वादापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. सूत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. जी-२० शिखर संमेलनापूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी काय करावं आणि काय करू नये, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना सांगितले की, या मोठ्या कार्यक्रमादम्यान, मंत्र्यांनी राष्ट्रीय राजधानीमध्ये थांबावे. तसेच त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवली असेल ती त्यांनी योग्यपणे पार पाडावी जेणेकरून दिल्लीत येणाऱ्या पाहुण्यांना कुठल्याही अडचणी येणार नाहीत. तसेच मंत्र्यांनी भारत मंडपम आणि इतर बैठक स्थळांवर पोहोचण्यासाठी सरकारी वाहनांचा वापर न करता शटल सेवांचा वापर करावा.

सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना सांगितले की, त्यांनी जी-२० शी संबंधित विविध मुद्यांबाबत ज्यांची नियुक्त करण्यात आली आहे, अशाच लोकांना भेटू द्यावे, तसेच स्वत: बोलणे टाळावे. दरम्यान, डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरोधात केलेल्या विधानांमुळे निर्माण झालेल्या राजकीय वादावर मोदींनी सांगितले की, अशा प्रकारची वक्तव्य करणारे पक्ष आणि त्या पक्षांच्या नेत्यांना उघडे पाडावे. तसेच सत्य जनतेसमोर आणावे. हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या सनातन धर्माबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकारात्मक विधान केलं. तसेच मंत्र्यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांचं दृढपणे खंडन करण्यास सांगितलं.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रेसिडेंट ऑफ भारत आणि नरेंद्र मोदींचा प्राइम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख केला जात आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी घटनेचं उल्लंघन होत असल्याचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा वाद टाळण्याचं आवाहन केलं आहे.  

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत