शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राने दिलेल्या ऊर्जेतून भावी वाटचाल; राहुल गांधींनी पत्राद्वारे व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 06:48 IST

महाराष्ट्रातून उद्या सकाळी यात्रा मध्यप्रदेशला रवाना होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला काढलेल्या पत्रात राहुल म्हणतात, महाराष्ट्रातील कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांना त्यांच्या तपस्येचे फळ  मिळत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत.

जळगाव जामोद (जि. बुलढाणा) :  महाराष्ट्रातील जनतेने भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद व भरभरून प्रेम दिले. यात्रेत बहुसंख्येने लोक बरोबरीने चालले. छत्रपती शिवाजी महाराज,  शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्री संत साईबाबा व श्री संत गजानन महाराज या संत-महापुरुषांच्या विचारांपासून प्रेरणा मिळाली. पुरोगामी महाराष्ट्रातून मोठी ऊर्जा मिळत गेली, या शब्दांत खा. राहुल गांधी यांनी मंगळवारी सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रात भावना व्यक्त केल्या. 

महाराष्ट्रातून उद्या सकाळी यात्रा मध्यप्रदेशला रवाना होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला काढलेल्या पत्रात राहुल म्हणतात, महाराष्ट्रातील कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांना त्यांच्या तपस्येचे फळ  मिळत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. कृषी साहित्याच्या किमतीतील प्रचंड वाढ, शेतमालाच्या भावातील अनियमितता व फसलेली पीक विमा योजना यांनी शेतकऱ्याला गरिबीच्या दुष्टचक्रात ढकलले आहे, ही स्थिती पाहून आपण व्यथित झालो. अनेक बेरोजगार युवक उच्च शिक्षण घेऊनही काम नसल्याने हताश झालेत. आदिवासींच्या अधिकारावर गदा आलेली आहे. 

महाराष्ट्राचा पुरोगामी विचार हा नेहमी फुले, शाहू, आंबेडकर, तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज यांचा जाज्वल्य विचार देशाला दिशा देत राहिला आहे. हा विचार टिकविण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील जनता करीत असल्याचे पाहून समाधान वाटले. अशा विचाराच्या जनतेने यात्रेला दिलेला प्रतिसाद हा ऊर्जा देणारा ठरणार आहे.

पुरोगामी मातीचा गंध- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पवित्र भूमीतून मध्यप्रदेशात जात असताना संतांच्या या पुरोगामी मातीचा गंध व विचार संपूर्ण देशात घेऊन जाऊ, असा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला देतो. - प्रेम, प्रतिसाद व आदरातिथ्य यातून मोठी नवीन ऊर्जा घेऊन जात असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

‘भारत जोडो’ यात्रेचे आज मध्य प्रदेशकडे प्रयाण; काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुधवारी (दि. २३) जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या आमपाणी कॅम्प येथून सकाळी ६ वाजता मध्य प्रदेशातील बोदरलीकडे प्रयाण करणार आहेत. 

आमपाणी-बोदरली हा प्रवास राहुल गांधी व त्यांचे यात्रेकरू हे सुरक्षेच्या कारणावरून वाहनाने करणार आहेत. आमपाणी-बोदरली हा रस्ता सातपुडा पर्वतातून असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने या भागात पदयात्रा राहणार नाही. मध्य प्रदेशातील बोदरली येथून त्यांची पदयात्रा पूर्ववत सुरू होईल.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा