शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

महाराष्ट्राने दिलेल्या ऊर्जेतून भावी वाटचाल; राहुल गांधींनी पत्राद्वारे व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 06:48 IST

महाराष्ट्रातून उद्या सकाळी यात्रा मध्यप्रदेशला रवाना होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला काढलेल्या पत्रात राहुल म्हणतात, महाराष्ट्रातील कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांना त्यांच्या तपस्येचे फळ  मिळत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत.

जळगाव जामोद (जि. बुलढाणा) :  महाराष्ट्रातील जनतेने भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद व भरभरून प्रेम दिले. यात्रेत बहुसंख्येने लोक बरोबरीने चालले. छत्रपती शिवाजी महाराज,  शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्री संत साईबाबा व श्री संत गजानन महाराज या संत-महापुरुषांच्या विचारांपासून प्रेरणा मिळाली. पुरोगामी महाराष्ट्रातून मोठी ऊर्जा मिळत गेली, या शब्दांत खा. राहुल गांधी यांनी मंगळवारी सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रात भावना व्यक्त केल्या. 

महाराष्ट्रातून उद्या सकाळी यात्रा मध्यप्रदेशला रवाना होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला काढलेल्या पत्रात राहुल म्हणतात, महाराष्ट्रातील कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांना त्यांच्या तपस्येचे फळ  मिळत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. कृषी साहित्याच्या किमतीतील प्रचंड वाढ, शेतमालाच्या भावातील अनियमितता व फसलेली पीक विमा योजना यांनी शेतकऱ्याला गरिबीच्या दुष्टचक्रात ढकलले आहे, ही स्थिती पाहून आपण व्यथित झालो. अनेक बेरोजगार युवक उच्च शिक्षण घेऊनही काम नसल्याने हताश झालेत. आदिवासींच्या अधिकारावर गदा आलेली आहे. 

महाराष्ट्राचा पुरोगामी विचार हा नेहमी फुले, शाहू, आंबेडकर, तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज यांचा जाज्वल्य विचार देशाला दिशा देत राहिला आहे. हा विचार टिकविण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील जनता करीत असल्याचे पाहून समाधान वाटले. अशा विचाराच्या जनतेने यात्रेला दिलेला प्रतिसाद हा ऊर्जा देणारा ठरणार आहे.

पुरोगामी मातीचा गंध- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पवित्र भूमीतून मध्यप्रदेशात जात असताना संतांच्या या पुरोगामी मातीचा गंध व विचार संपूर्ण देशात घेऊन जाऊ, असा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला देतो. - प्रेम, प्रतिसाद व आदरातिथ्य यातून मोठी नवीन ऊर्जा घेऊन जात असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

‘भारत जोडो’ यात्रेचे आज मध्य प्रदेशकडे प्रयाण; काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुधवारी (दि. २३) जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या आमपाणी कॅम्प येथून सकाळी ६ वाजता मध्य प्रदेशातील बोदरलीकडे प्रयाण करणार आहेत. 

आमपाणी-बोदरली हा प्रवास राहुल गांधी व त्यांचे यात्रेकरू हे सुरक्षेच्या कारणावरून वाहनाने करणार आहेत. आमपाणी-बोदरली हा रस्ता सातपुडा पर्वतातून असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने या भागात पदयात्रा राहणार नाही. मध्य प्रदेशातील बोदरली येथून त्यांची पदयात्रा पूर्ववत सुरू होईल.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा