शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

३० लाख लोकांचे भवितव्य अनिश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 06:10 IST

आसाममध्ये बांगलादेशातून आलेले बेकायदा घुसखोर हुडकून काढण्यासाठी ‘एनआरसी’ तयार करण्यात येत आहे. 

गुवाहाटी : आसाममध्ये ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स’ (एनआरसी) प्रसिद्ध झाल्यावर त्यात समावेश नसलेल्या लोकांची नावे राज्याच्या मतदारयाद्यांमधून वगळली जाऊ शकतील, अशी शक्यता सरकारी सूत्रांनी व्यक्त केली.आसाममध्ये बांगलादेशातून आलेले बेकायदा घुसखोर हुडकून काढण्यासाठी ‘एनआरसी’ तयार करण्यात येत आहे. या प्रक्रियेत जे घुसखोर ठरतील त्यांना देशाबाहेर घालविणे हा अंतिम उद्देश असला तरी पहिला टप्पा म्हणून अशा लोकांची नावे मतदारयाद्यांमधून वगळण्याची संभाव्य कारवाई पहिल्या टप्प्यात केली जाऊ शकेल, असे या सूत्रांनी सूचित केले. ‘एनआरसी’चे काम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने व त्यांच्याच देखरेखीखाली सुरू असल्याने अंतिम ‘एनआरसी’ प्रसिद्ध झाल्यावर पुढे काय करायचे हे न्यायालयाच्या निर्देशांशिवाय ठरविले जाऊ शकत नाही, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.आसाममध्ये राजकारण तापलेविदेशी घुसखोर बाजूला राहून ही प्रक्रिया भारताच्याच दोन राज्यांमधील भांडणाचे कारण ठरली. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘एनआरसी’ला जोरदार विरोध केला आणि आसाममध्ये राहणाऱ्या बंगाली लोकांना स्वदेशातच निर्वासित करण्याचे हे कारस्थान असल्याचा आरोप केला.

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीAssamआसाम