दौंड रेल्वे अपघातातील मृतांवर अंत्यसंस्कार ----------------------
By Admin | Updated: May 4, 2014 23:54 IST2014-05-04T23:54:11+5:302014-05-04T23:54:11+5:30
पाथर्डी (जि. अहमदनगर): शनिवारी दौंड येथे रेल्वे-ट्रॅक्टर अपघातात तालुक्यातील तीन उसतोडणी मजुरांचा जागीच मृत्यू झाला व २२ जण गंभीर जखमी झाले़ मृतांवर रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले़

दौंड रेल्वे अपघातातील मृतांवर अंत्यसंस्कार ----------------------
प थर्डी (जि. अहमदनगर): शनिवारी दौंड येथे रेल्वे-ट्रॅक्टर अपघातात तालुक्यातील तीन उसतोडणी मजुरांचा जागीच मृत्यू झाला व २२ जण गंभीर जखमी झाले़ मृतांवर रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले़शनिवारी (दि़ ३) तालुक्यातील तांबेवाडी व मंचरवाडी येथील ऊस तोडणी मजूर ट्रॅक्टरमधून गावाकडे येते होते़ दौंड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅक पार करीत असतानाच दुरांतो एक्सप्रेसने या ट्रॅक्टरला धडक दिली़ या अपघातात तांबेवाडी येथील कारभारी महारनोर व इंदुबाई हंडाळ तर मंचरवाडी येथील ताईबाई बर्डे हे तीन ऊस तोडणी कामगार मृत्युमुखी पडले तर २२ मजूर गंभीर जखमी झाले. ही माहिती कळाल्यानंतर तालुक्यावर शोककळा पसरली़ तांबेवाडी व मंचरवाडीतील अबालवृद्धांना सुरुवातीला काही कळू दिले नाही़ परंतु रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सायरन वाजवित रुग्णवाहिकांनी गावात प्रवेश केला आणि अबालवृद्धांनी हंबरडा फोडला़ लहानग्यांना समजावताना ग्रामस्थांना अश्रू लपविता आले नाहीत़ शोकाकुल वातावरणातच रात्री दहाच्या सुमारास तांबेवाडी व मंचरवाडी येथे मयतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.पाथर्डी तालुका हा उसतोड मजुरांचा तालुका म्हणून परिचित आहे. तालुक्यातील सुमारे चाळीस ते पन्नास हजार मजूर दरवर्षी टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणीसाठी राज्यातील तसेच परराज्यातील साखर कारखान्यावर जातात. या उसतोड मजुरांची दिवाळी दरवर्षी रस्त्यातच होत असते. सुमारे सहा सात महिने हे ऊस तोडणी कामगार घराबाहेर असतात. गावाकडे फक्त म्हातारी माणसे व शाळेत जाणारी लहान मुले़ असे हे रहाटगाडगे वर्षानुवर्षे चालत आलेले आहे. शनिवारीही असेच हे ऊस तोडणी कामगार गावाकडे परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला़ (तालुकाप्रतिनिधी)़़़़़़़़़़़़़़़अपघातातील २२ मजुरांवर विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ त्यांच्या उपचारासाठी मोठा खर्च येणार आहे़ हे सर्व ऊस तोडणी मजूर अत्यंत गरीब परिस्थितीतील असल्याने उपचाराचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न ग्रामस्थ आणि नातेवाईकांसमोर उभा राहिला़ अंत्यविधीसाठी आलेल्या अनेकांना हाच प्रश्न सतावत होता़ त्यामुळे ऊस तोडणी मजुरांवरील उपचाराचा खर्च सरकारने करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत़ ....गावकर्यांनी केली वर्गणीअपघातात जखमी झालेल्या ऊस तोडणी मजुरांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे़ यातील अनेकजण उपचाराचा खर्चही देऊ शकत नाहीत़ त्यामुळे रविवारी (दि़४) सकाळी ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून जखमींवरील उपचाराचा खर्च भागविण्याची तयारी केली आहे़ मात्र, सरकारनेही मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़ सांत्वन करायला अनेक येतील़ परंतु मदत करणार्यांनी पुढे यावे, असे आवाहनही ग्रामस्थ करीत आहेत़