शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

Atiq Ahmed: उमेशची हत्या ते अतिक-अश्रफच्या मर्डरपर्यंत, दोन दशकांच्या दुश्मनीचा भयानक शेवट, अशी आहे पूर्ण कहाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 06:53 IST

Atiq Ahmed News: शनिवारी रात्री उत्तर प्रदेश एका भयावह घटनेने पुन्हा एकदा हादरले. प्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांना कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना त्यांची धडाधड गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

शनिवारी रात्री उत्तर प्रदेश एका भयावह घटनेने पुन्हा एकदा हादरले. प्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांना कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना त्यांची धडाधड गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एकेकाळी प्रयागराजमध्ये आपली दहशत निर्माण करणाऱ्या अतिक अहमदची तितक्याच भयावह पद्धतीने हत्या करण्यात आली. एकेकाळी माफिया अतिक अहमद याची दहशत एवढी होती की, कुणीही त्याच्याविरोधात ब्र काढण्याची हिंमत करत नसे. मात्र एक वर्ष असं आलं आणि त्यात अशी काही पटकथा लिहिली की, ज्याची कल्पना अतीक किंवा राज्यातील कुणीही केली नव्हती.

या कहाणीची सुरुवात झाली होती ती २००४ मध्ये. २००४ मध्ये बसपाच्या तिकिटावर राजू पाल यांनी अतिक अहमदचा धाकटा भाऊ मोहम्मद अश्रफविरोधात निवडणूक लढवली. त्यात त्यांनी अश्रफचा पराभव केला. त्यानंतर २५ जानेवारी २००५ रोजी राजू पाल याची हत्या करण्यात आली. या हत्येचा आरोप अतिक आणि अश्रफसोबत माफियाच्या गँगमधील इतर लोकांवर झाला. या हत्याकांडामध्ये उमेश पाल हा साक्षीदार होता.

२००६ मध्ये अतिक अहमदने उमेशचं अपहरण केलं होतं. त्यानंतर त्याबरोबरच राजू पाल हत्याकांडामध्ये अतिकने उमेशकडून आपल्याबाजूने साक्षही देऊन घेतली होती. मात्र नंतर उमेश पालने अतिक अहमदविरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली. या प्रकरणात यावर्षी २४ फेब्रुवारी रोजी उमेश पाल कोर्टात हजर झाला होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये अतिक अहमदकडून युक्तिवाद होणार होता. मात्र अतिकच्या शूटर्सनी उमेश पालची हत्या केली. या हत्येवरून उत्तर प्रदेशात मोठा गदारोळ उठला होता.

या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेमध्ये माफियाला जमीनदोस्त करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी आक्रमक कारवाई करत आरोपींविरोधात मोर्चा सांभाळला होता. तसेच हत्याकांडाच्या तिसऱ्या दिवशीच पोलिसांनी पहिला एन्काऊंटर केला. त्यामध्ये अरबाझ नावाच्या गुंडाला ठार करण्यात आले. हा एन्काऊंटर नेहरू पार्कमधील जंगलांमध्ये झाला होता. 

यापूर्वी ६ मार्च रोजी या प्रकरणातील आणखी एक आरोपी विजय कुमार उर्फई उस्मान चौधरी एन्काऊंटरमध्ये मारला गेला. पोलीस आणि उस्मान यांच्यात हे एन्काऊंटर प्रयागराजमधील कौंधियारा परिसरात झाले. उस्मान यानेच उमेश पाल याच्यावर पहिली गोळी झाडली होती.

त्यानंतर १३ एप्रिल रोजी आणखी दोन शूटरची हत्या करण्यात आली. या एन्काऊंटरमध्ये अतिक अहमदचा मुलगा मारला गेला. मुलाच्या मृत्युमुळे अतिक अहमदला मोठा धक्का बसला होता. यादरम्यान, अतिक अहमद प्रसार माध्यमांसमोर आला होता. मात्र त्याने काही बोलण्यास नकार दिला. कारण मुलाच्या हत्येमुळे तो पुरता खचून गेला होता.

मात्र या सर्व घटनाक्रमामध्ये दोन दशकांपूर्वी राजू पाल हत्याकांडामुळे वादात सापडलेल्या अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची अशा प्रकारे हत्या होईल, याची कल्पना कुणीही केली नव्हती. प्रयागराज पोलीस या दोघांनाही मेडिकल तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन गेले होते. त्यावेळी पोलिसांचा बंदोबस्त भेदत तीन हल्लेखोरांनी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ याची हत्या केली. त्यानंतर या हल्लेखोरांनी पोलिसांसमोर सरेंडर केले. मात्र या हत्याकांडामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी