शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कुरूक्षेत्रातून जगभर गुंजणार गीतेचा संदेश, संत मोरारीबापूंच्या रामकथेने प्रारंभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 12:51 IST

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही उपस्थित होते.

 चंडीगड : हरयाणातील कुरूक्षेत्र या पवित्र भूमीतून गीतेचा संदेश जगभर घुमणार आहे. हा संदेश भारताची आध्यात्मिक संस्कृती दर्शवेल. कुरूक्षेत्रातील सर्व तीर्थक्षेत्रे श्रीकृष्ण सर्किट म्हणून विकसित केली जातील. संत मोरारीबापूंनी सुरू केलेल्या रामकथेतून देवाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचणार आहे. कुरूक्षेत्र लवकरच एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणूनही उदयास येणार आहे. आंतरराष्ट्रीय गीता जयंती महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ही माहिती देण्यात आली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही उपस्थित होते. रामकथेचे उद्घाटन करताना संत मोरारीबापू म्हणाले की, ही कथा संपूर्ण समाजाला ऊर्जा आणि प्रेरणा देईल. यावेळी गीता ज्ञान संस्थेतर्फे मेळ्यात नऊ दिवस रामकथेचे पठण होणार आहे. रामकथेतून जीवन जगण्याचा संदेश जनतेला दिला जाणार असल्याचे संत मोरारी बापू म्हणाले. ऋषी-मुनींच्या या भूमीतून हा संदेश हजारो वर्षांपासून जगभर पोहोचत आहे. हा संदेश लोकांना भारताची आध्यात्मिक संस्कृती दर्शवत आहे.

कुरूक्षेत्रला आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ करणारमुख्यमंत्री खट्टर म्हणाले की, हरयाणा सरकार कुरूक्षेत्रला आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहे. या पवित्र भूमीतील सर्व तीर्थक्षेत्रे श्रीकृष्ण सर्किट म्हणून विकसित केली जात आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. कुरूक्षेत्राच्या भूमीच्या प्रत्येक कणात इतिहास आहे, त्यामुळे ते जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :om birlaओम बिर्लाramayanरामायणMahabharatमहाभारत