शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

एअर इंडियाची संपूर्ण मालकी ‘एनआरआय’ना देण्यास मुभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 06:25 IST

एअर इंडियाची मालकी ‘एनआरआय’ना देण्याचा मार्ग मोकळा करून सरकारने प्रक्रिया अधिक आकर्षक केली आहे.

नवी दिल्ली : एअर इंडिया कंपनी अनिवासी भारतीयांना (एनआरआय) १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीच्या (एफडीआय) मार्गाने पूर्णपणे विकत घेण्याची मुभा देण्याचे सरकारने ठरविले आहे. यासाठी ‘एफडीआय’ धोरणात दुरुस्ती करण्यास केंद्रीय मत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस ही तिची उपकंपनी व सिंगापूर एअरलाइन्ससोबत स्थापन केलेल्या ‘आयसॅट’ या कंपनीतील ५० टक्के भागीदारी निर्गुंतवणुकीने खासगी खरेदीदारास विकण्याचा निर्णय सरकारने आधी घेतला आहे. परंतु अनुकूल प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे एअर इंडियाची मालकी ‘एनआरआय’ना देण्याचा मार्ग मोकळा करून सरकारने प्रक्रिया अधिक आकर्षक केली आहे.अन्य भारतीय विमान कंपन्यांत १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीस मुभा आहे. मात्र एअर इंडियाची भांडवल गुंतवणूक व मालकी विदेशी व्यक्ती वा कंपनीकडे जाणार नाही, अशा ‘एफडीआय’ला मंजुरी होती. आता त्यात सरकारने बदल केला आहे. जे ‘एनआरआय’ आहेत त्यांना एअर इंडिया १०० टक्के मालकीने विकत घेण्याची मुभा आहे. ‘एनआरआयची गुंतवणूक भारतीयाने केल्याचे मानले जाईल. त्यामुळे एअर इंडियावरील सरकारी मालकी गेली तरी नवा मालक भारतीयच राहील.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया