शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

आंध्र प्रदेशात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 11:42 IST

एका चार वर्षाच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देएका चार वर्षाच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरूवारी गुंटूर जिल्ह्यातील अदविताक्केलापडूमधील राजीव गृहा कल्प अपार्टमेंटच्या बाजूला ही संपूर्ण घटना घडली आहे.दुकानात जाणाऱ्या चार वर्षीय दुपती प्रेम कुमार या चिमुरड्यावर सहा कुत्र्यांनी हल्ला केला होता.

गुंटूर, दि. 22- भटक्या कुत्र्यांकडून लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असलेलं पाहायला मिळतं आहे. असाच एक प्रकार आंध्र प्रदेशात घडला आहे. तेथे एका चार वर्षाच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरूवारी गुंटूर जिल्ह्यातील अदविताक्केलापडूमधील राजीव गृहा कल्प अपार्टमेंटच्या बाजूला ही संपूर्ण घटना घडली आहे. दुकानात जाणाऱ्या चार वर्षीय दुपती प्रेम कुमार या चिमुरड्यावर सहा कुत्र्यांनी हल्ला केला होता. वेफर्स घेण्यासाठी दुकानात जात असताना ही घटना घडली.

चार वर्षीय दुपती प्रेम कुमार दुकानात जात असताना त्याच्या ओरडण्याचा आवाज एका महिलेने ऐकला. काही कुत्रे कुमारवर हल्ला करत असल्याचं त्या महिलेने पाहिलं. त्यावेळी तिने कुत्र्यांवर दगडं मारून त्यांना हकलविण्याचा व त्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. ही घटना पाहून तेथे असणारी काही लोकही मदतीसाठी धावून आली. तो पण तोपर्यंत कुत्र्यांच्या हल्ल्यात कुमार जबर जखमी झाला होता. त्या कुत्र्यांनी मुलाच्या गळ्यावर व हातावार चावा घेतला होता. त्यामुळे त्याला तेथे जबर जखमा झाल्याने तो रक्तबंबाळ झाला होता. या घटनेनंतर कुमारलाल लगेचच गुंटूरमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण हॉस्पिटलमध्ये कुमारचा मृत्यू झाला. कुमारचे आई-वडील, मल्लीस्वारी आणि येसुबाबू रोजंदारी करतात. त्यामुळे ही घटना जेव्हा घडली तेव्हा ते दोघेही घरी नव्हते.शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या दूर करण्याबाबतच्या आवश्यक उपाययोजनांसाठी काम सुरू आहे, असं गुंटूर महापालिकेच्या आयुक्त सी. अनुराधा यांनी सांगितलं आहे. 

दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना सगळीकडेच घडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातही अशा प्रकारच्या घटना याआधी घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भिंवडीमध्ये एका मुलाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. भटक्या कुत्र्यांनी धीरज यादव या ८ वर्षांच्या मुलाच्या शरीराचे लचके तोडले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी ठाण्यातील रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. धीरज सकाळी साडेनऊच्या सुमारास सलमान शेख या मित्रासोबत कचऱ्याच्या ठिकाणी काचेच्या गोट्या शोधण्यासाठी पाइपलाइनवरून जात होता. धीरजने १५ फूट दलदलीत उडी मारली, तेव्हा तेथे असलेल्या भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. हे दृश्य पाहून घाबरलेला सलमान घरी जाऊन बसला. दुपारी साडेअकरा वाजता फेणेभागात राहणारा यंत्रमाग कामगार सबाजित बिंद त्याच पाइपलाइनवरून जेवणासाठी घरी जात असताना लहान मुलावर कुत्रे हल्ला करत असल्याचे दिसले. त्याने खोलीमालक काथोड धुमाळ यांना ही घटना सांगितली. दोघांनी मिळून त्या भटक्या कुत्र्यांना तेथून पळवून लावत धीरजची सुटका केली. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात धीरज गंभीर जखमी झाला होता. त्याला इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात नेले. तेथे त्याचा मृत्यू झाला.