शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
2
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
3
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
4
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
5
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
8
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
9
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
10
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
11
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
12
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
13
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
14
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
15
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
16
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
17
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
18
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
19
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
20
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप

चारचाकी वाहनचोरी प्रकरण : चोरीची माहिती उशिरा; विमा नाकारता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 14:05 IST

एका चारचाकी वाहनाची मालकाच्या दुकानासमोरून चोरी झाली. ५ दिवस शोध घेतल्यानंतर त्यांनी पोलिसांत गुन्हा नोंदविला.

डॉ. खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : वाहन चोरीस गेल्याचे विमा कंपनीला उशिरा कळविले, या कारणावरून विमा नाकारता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.एका चारचाकी वाहनाची मालकाच्या दुकानासमोरून चोरी झाली. ५ दिवस शोध घेतल्यानंतर त्यांनी पोलिसांत गुन्हा नोंदविला. पोलिसांनी तपास करून वाहन मिळून आले नसल्याचा अहवाल (अ समरी) न्यायालयात पाठविली. वाहनमालकाने विमा कंपनीस अगोदर फोन करून चोरीबाबत कळवले व नंतर लेखी कळविले. विमा कंपनीने चोरीची माहिती ७८ दिवस उशिरा दिली या कारणावरून विम्याची रक्कम देण्यास नकार दिला.

याविरुद्ध वाहनमालकाने जिल्हा ग्राहक मंचकडे तक्रार दिली. ग्राहक मंचने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीस ३ लाख ४० हजार रुपये १२ टक्के व्याजासह विम्याची रक्कम देण्याचे आदेश दिले. हेच आदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने कायम ठेवले. विमा कंपनीने याविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे अपिल दाखल केले. राष्ट्रीय आयोगाने ७८ दिवसांनंतर विमा कंपनीस कळविणे हे विमा मंजूर करण्यास बाधक आहे, असे ठरवत राज्य आयोगाचा आदेश रद्द केला.

जिल्हा ग्राहक मंचचा आदेश कायम-     याविरुद्ध वाहनमालकाने सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल केले. येथेही विमा कंपनीचे म्हणणे होते की, उशीरा गुन्हा दाखल केला, विमा कंपनीस ७८ दिवसांनंतर कळविले. यामुळे विमा रकमेची मागणी तपासणे शक्य होत नाही. गुन्हा नोंदवणे व विमा कंपनीस तत्काळ माहिती देणे हा चौकशीचा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे राष्ट्रीय आयोगाचा निर्णय योग्यच आहे.-     न्या. हेमंत गुप्ता आणि व्ही. रामासुब्रमण्यम यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या निकालांचे संदर्भ देत उशिरा माहिती दिल्याच्या कारणावरून विमा नाकारता येणार नाही, असे स्पष्ट केले आणि जिल्हा ग्राहक मंचचा आदेश कायम केला. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcarकार