शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मध्य प्रदेशात दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; एकापाठोपाठ चौघांचे मृतदेह पडले रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:57 IST

मध्य प्रदेशात सोमवारी दोन कुटुंबांच्या रक्तरंजीत संघर्षात चौघांचा बळी गेला आहे.

MP Crime:मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात सोमवारी दोन कुटुंबांमध्ये झालेल्या वादावादीदरम्यान चार जणांची हत्या करण्यात आली. सोमवारी सकाळी झालेल्या रक्तरंजित संघर्षामुळे संपूर्ण मध्य प्रदेशात खळबळ उडाली. दोन कुटुंबांमध्ये झालेल्या या हिंसक संघर्षात चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. शेतातील जुगारावरून गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या जुन्या वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. या घटनेत अनेकांनी शस्त्रांचा वापर केला गेल्याचेही बोललं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु करुन कारवाई सुरु केली आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूरमधील टिमरी गावात दोन कुटुंबांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षात चौघांना आपला जीव गमवावा लागला. पाठक आणि साहू कुटुंबात जुने वाद होता आणि त्यातूनच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. पीडित कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या बाबत पोलिसांकडे तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. 

सोमवारी अकराच्या सुमारास टिमरी गावात पाठक आणि साहू कुटुंबातील वादाला हिंसक वळण लागले. २५ ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणांवर साहू कुटुंबाच्या लोकांनी हल्ला केला. त्यानंतर दोन्ही बाजूचे लोक समोरासमोर आले आणि त्यांनी एकमेकांवर लाठ्या, तलवारीने हल्ला केला. या संघर्षात पाठक कुटुंबातील सतीश पाठक, मनीष पाठक आणि दुबे कुटुंबातील अनिकेत दुबे आणि समीर दुबे यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी विपिन दुबे आणि मुकेश दुबे हे गंभीर जखमी असून त्यांना वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झालं. ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली. पोलिसांनी आमच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या नाहीत, त्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप तिथल्या लोकांनी केला. तणाव वाढत असल्याचे पाहून प्रशासनाने आजूबाजूचया पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी तैनात केला आहे. आरोपींना लवकरच अटक करून कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस