शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

मध्य प्रदेशात दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; एकापाठोपाठ चौघांचे मृतदेह पडले रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:57 IST

मध्य प्रदेशात सोमवारी दोन कुटुंबांच्या रक्तरंजीत संघर्षात चौघांचा बळी गेला आहे.

MP Crime:मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात सोमवारी दोन कुटुंबांमध्ये झालेल्या वादावादीदरम्यान चार जणांची हत्या करण्यात आली. सोमवारी सकाळी झालेल्या रक्तरंजित संघर्षामुळे संपूर्ण मध्य प्रदेशात खळबळ उडाली. दोन कुटुंबांमध्ये झालेल्या या हिंसक संघर्षात चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. शेतातील जुगारावरून गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या जुन्या वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. या घटनेत अनेकांनी शस्त्रांचा वापर केला गेल्याचेही बोललं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु करुन कारवाई सुरु केली आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूरमधील टिमरी गावात दोन कुटुंबांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षात चौघांना आपला जीव गमवावा लागला. पाठक आणि साहू कुटुंबात जुने वाद होता आणि त्यातूनच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. पीडित कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या बाबत पोलिसांकडे तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. 

सोमवारी अकराच्या सुमारास टिमरी गावात पाठक आणि साहू कुटुंबातील वादाला हिंसक वळण लागले. २५ ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणांवर साहू कुटुंबाच्या लोकांनी हल्ला केला. त्यानंतर दोन्ही बाजूचे लोक समोरासमोर आले आणि त्यांनी एकमेकांवर लाठ्या, तलवारीने हल्ला केला. या संघर्षात पाठक कुटुंबातील सतीश पाठक, मनीष पाठक आणि दुबे कुटुंबातील अनिकेत दुबे आणि समीर दुबे यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी विपिन दुबे आणि मुकेश दुबे हे गंभीर जखमी असून त्यांना वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झालं. ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली. पोलिसांनी आमच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या नाहीत, त्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप तिथल्या लोकांनी केला. तणाव वाढत असल्याचे पाहून प्रशासनाने आजूबाजूचया पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी तैनात केला आहे. आरोपींना लवकरच अटक करून कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस