शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघातामुळे केरळ एक्सप्रेसमधील 4 प्रवाशांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 12:48 IST

सोमवारी मथुरा येथे तापमान 50 अंश सेल्सिअसवर पोहचलं होतं. उन्हाचा तडाखा आणि गरमीमुळे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत.

आगरा - देशात वाढत्या तापमानामुळे गरमीचं प्रमाण वाढलेलं आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. अशातच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही गरमीचा फटका बसताना पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील आगरा ते झांसी दरम्यान केरळ एक्सप्रेसमधील स्लीपर कोचमध्ये प्रवास करणाऱ्या 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तर भारतात वाढत्या तापमानाने उच्चांक गाठला असून अनेक शहरात गरमीमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागले आहेत. 

सोमवारी मथुरा येथे तापमान 50 अंश सेल्सिअसवर पोहचलं होतं. उन्हाचा तडाखा आणि गरमीमुळे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत. ही ट्रेन निजामुद्दीनपासून त्रिवेंद्रमला जात होती. आगरापासून ट्रेन निघाल्यानंतर पुढील प्रवासात ट्रेन थांबत थांबत पुढे जात होती. त्यामुळे ट्रेनमध्ये 5 प्रवाशांची तब्येत बिघडली. ज्यातील 4 जणांचा मृत्यू झाला. झांसी रेल्वे स्टेशनवर या चार जणांचा मृतदेह उतरविण्यात आला. त्यांच्या नातेवाईकांना रेल्वे प्रशासनाकडून माहिती देण्यात आली. 

दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून या घटनेवर कोणतंही भाष्य केलं जात नाही. उत्तर मध्य रेल्वेचे पीआरओ मनोज कुमार सिंह यांनी तांत्रिक कारणामुळे ट्रेन उशीराने सुरु होती. मात्र या प्रवाशांची तब्येत आधीपासून खराब होती. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच कळू शकेल असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. 

दहा दिवसांपूर्वी 68 प्रवाशांचा एक गट तामिळनाडूहून वाराणसी आणि आगरा येथे फिरण्यासाठी आला होता. वाराणसीनंतर ते आगरा येथे पोहचले. हे सर्व प्रवासी स्लीपर कोचमधून प्रवास करत होते. आगरा ते झांसी दरम्यान ट्रेन तांत्रिक कारणाने थांबत थांबत पुढे जात होती. या दरम्यान कोचमधील प्रवासी गरमीमुळे त्रस्त झाले होते. ट्रेनमध्ये कोणतीही उपचारासाठी सोय न मिळाल्याने 4 जणांचा मृत्यू झाला. 

उत्तर प्रदेशमध्ये रविवारी सर्वाधिक तापमान बांदामध्ये नोंदवलं गेलं होतं. बांदामध्ये 49 डिग्री सेल्सियस तापमान होतं, तर महोबामध्ये 47 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद केली आहे. हरियाणातही तापमान 48 अंशांवर पोहोचलं आहे. तर नारनौलमध्ये 47.6 डिग्री सेल्सियस तापमान होतं. पंजाबमध्येही उष्णतेची लाट कायम आहे. त्याशिवाय राजस्थानमधल्या सहा शहरांमध्ये पारा 47 डिग्रीच्या वर गेला होता. राजस्थानच्या चुरूमध्ये शनिवारी 50.8 अंश सेल्सियस एवढं तापमान नोंदवलं गेलं आहे. उत्तर भारतात गरमीमुळे हवामान खात्याने अलर्ट दिला आहे.  

टॅग्स :Heat Strokeउष्माघातKeralaकेरळUttar Pradeshउत्तर प्रदेशrailwayरेल्वे