शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

उष्माघातामुळे केरळ एक्सप्रेसमधील 4 प्रवाशांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 12:48 IST

सोमवारी मथुरा येथे तापमान 50 अंश सेल्सिअसवर पोहचलं होतं. उन्हाचा तडाखा आणि गरमीमुळे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत.

आगरा - देशात वाढत्या तापमानामुळे गरमीचं प्रमाण वाढलेलं आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. अशातच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही गरमीचा फटका बसताना पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील आगरा ते झांसी दरम्यान केरळ एक्सप्रेसमधील स्लीपर कोचमध्ये प्रवास करणाऱ्या 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तर भारतात वाढत्या तापमानाने उच्चांक गाठला असून अनेक शहरात गरमीमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागले आहेत. 

सोमवारी मथुरा येथे तापमान 50 अंश सेल्सिअसवर पोहचलं होतं. उन्हाचा तडाखा आणि गरमीमुळे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत. ही ट्रेन निजामुद्दीनपासून त्रिवेंद्रमला जात होती. आगरापासून ट्रेन निघाल्यानंतर पुढील प्रवासात ट्रेन थांबत थांबत पुढे जात होती. त्यामुळे ट्रेनमध्ये 5 प्रवाशांची तब्येत बिघडली. ज्यातील 4 जणांचा मृत्यू झाला. झांसी रेल्वे स्टेशनवर या चार जणांचा मृतदेह उतरविण्यात आला. त्यांच्या नातेवाईकांना रेल्वे प्रशासनाकडून माहिती देण्यात आली. 

दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून या घटनेवर कोणतंही भाष्य केलं जात नाही. उत्तर मध्य रेल्वेचे पीआरओ मनोज कुमार सिंह यांनी तांत्रिक कारणामुळे ट्रेन उशीराने सुरु होती. मात्र या प्रवाशांची तब्येत आधीपासून खराब होती. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच कळू शकेल असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. 

दहा दिवसांपूर्वी 68 प्रवाशांचा एक गट तामिळनाडूहून वाराणसी आणि आगरा येथे फिरण्यासाठी आला होता. वाराणसीनंतर ते आगरा येथे पोहचले. हे सर्व प्रवासी स्लीपर कोचमधून प्रवास करत होते. आगरा ते झांसी दरम्यान ट्रेन तांत्रिक कारणाने थांबत थांबत पुढे जात होती. या दरम्यान कोचमधील प्रवासी गरमीमुळे त्रस्त झाले होते. ट्रेनमध्ये कोणतीही उपचारासाठी सोय न मिळाल्याने 4 जणांचा मृत्यू झाला. 

उत्तर प्रदेशमध्ये रविवारी सर्वाधिक तापमान बांदामध्ये नोंदवलं गेलं होतं. बांदामध्ये 49 डिग्री सेल्सियस तापमान होतं, तर महोबामध्ये 47 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद केली आहे. हरियाणातही तापमान 48 अंशांवर पोहोचलं आहे. तर नारनौलमध्ये 47.6 डिग्री सेल्सियस तापमान होतं. पंजाबमध्येही उष्णतेची लाट कायम आहे. त्याशिवाय राजस्थानमधल्या सहा शहरांमध्ये पारा 47 डिग्रीच्या वर गेला होता. राजस्थानच्या चुरूमध्ये शनिवारी 50.8 अंश सेल्सियस एवढं तापमान नोंदवलं गेलं आहे. उत्तर भारतात गरमीमुळे हवामान खात्याने अलर्ट दिला आहे.  

टॅग्स :Heat Strokeउष्माघातKeralaकेरळUttar Pradeshउत्तर प्रदेशrailwayरेल्वे