शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

उष्माघातामुळे केरळ एक्सप्रेसमधील 4 प्रवाशांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 12:48 IST

सोमवारी मथुरा येथे तापमान 50 अंश सेल्सिअसवर पोहचलं होतं. उन्हाचा तडाखा आणि गरमीमुळे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत.

आगरा - देशात वाढत्या तापमानामुळे गरमीचं प्रमाण वाढलेलं आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. अशातच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही गरमीचा फटका बसताना पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील आगरा ते झांसी दरम्यान केरळ एक्सप्रेसमधील स्लीपर कोचमध्ये प्रवास करणाऱ्या 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तर भारतात वाढत्या तापमानाने उच्चांक गाठला असून अनेक शहरात गरमीमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागले आहेत. 

सोमवारी मथुरा येथे तापमान 50 अंश सेल्सिअसवर पोहचलं होतं. उन्हाचा तडाखा आणि गरमीमुळे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत. ही ट्रेन निजामुद्दीनपासून त्रिवेंद्रमला जात होती. आगरापासून ट्रेन निघाल्यानंतर पुढील प्रवासात ट्रेन थांबत थांबत पुढे जात होती. त्यामुळे ट्रेनमध्ये 5 प्रवाशांची तब्येत बिघडली. ज्यातील 4 जणांचा मृत्यू झाला. झांसी रेल्वे स्टेशनवर या चार जणांचा मृतदेह उतरविण्यात आला. त्यांच्या नातेवाईकांना रेल्वे प्रशासनाकडून माहिती देण्यात आली. 

दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून या घटनेवर कोणतंही भाष्य केलं जात नाही. उत्तर मध्य रेल्वेचे पीआरओ मनोज कुमार सिंह यांनी तांत्रिक कारणामुळे ट्रेन उशीराने सुरु होती. मात्र या प्रवाशांची तब्येत आधीपासून खराब होती. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच कळू शकेल असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. 

दहा दिवसांपूर्वी 68 प्रवाशांचा एक गट तामिळनाडूहून वाराणसी आणि आगरा येथे फिरण्यासाठी आला होता. वाराणसीनंतर ते आगरा येथे पोहचले. हे सर्व प्रवासी स्लीपर कोचमधून प्रवास करत होते. आगरा ते झांसी दरम्यान ट्रेन तांत्रिक कारणाने थांबत थांबत पुढे जात होती. या दरम्यान कोचमधील प्रवासी गरमीमुळे त्रस्त झाले होते. ट्रेनमध्ये कोणतीही उपचारासाठी सोय न मिळाल्याने 4 जणांचा मृत्यू झाला. 

उत्तर प्रदेशमध्ये रविवारी सर्वाधिक तापमान बांदामध्ये नोंदवलं गेलं होतं. बांदामध्ये 49 डिग्री सेल्सियस तापमान होतं, तर महोबामध्ये 47 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद केली आहे. हरियाणातही तापमान 48 अंशांवर पोहोचलं आहे. तर नारनौलमध्ये 47.6 डिग्री सेल्सियस तापमान होतं. पंजाबमध्येही उष्णतेची लाट कायम आहे. त्याशिवाय राजस्थानमधल्या सहा शहरांमध्ये पारा 47 डिग्रीच्या वर गेला होता. राजस्थानच्या चुरूमध्ये शनिवारी 50.8 अंश सेल्सियस एवढं तापमान नोंदवलं गेलं आहे. उत्तर भारतात गरमीमुळे हवामान खात्याने अलर्ट दिला आहे.  

टॅग्स :Heat Strokeउष्माघातKeralaकेरळUttar Pradeshउत्तर प्रदेशrailwayरेल्वे