शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

मध्यप्रदेशातील भाजपचे आणखी चार आमदार बंडखोरीच्या तयारीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 03:15 IST

कम्प्युटर बाबांनी केला दावा

भोपाळ : मध्यप्रदेशातील भाजपच्या दोन आमदारांनी विधानसभेत काँग्रेस सरकारच्या बाजूने मतदान केल्याने भाजपमध्ये खळबळ माजली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत भाजप श्रेष्ठींनी ताबडतोब दिल्लीत असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष खा. राकेश सिंह यांना भोपाळला पाठवले. त्यांनी संबंधितांची भेट घेऊ न भाजपचे सारे आमदार एकत्र असल्याचा दावा केला; पण भाजपचे आणखी चार आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.

नारायण त्रिपाठी व शरद कौल या दोन आमदारांनी बुधवारी सरकारच्या बाजूने मतदान केले. नारायण त्रिपाठी यांनी तर काँग्रेसमध्ये जाण्याचा आपण विचार करीत असल्याचे जाहीर केले. आपली भाजपमध्ये घुसमट होत असल्याचे या दोन आमदारांनी म्हटले आहे. हे दोघेही पूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यांच्याशिवायही काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आणि आमदार झालेले काही जण आहेत. त्यांच्यापैकी आणखी चार जण काँग्रेसकडे येण्याची शक्यता आहे.

काँग्रेसशी जवळीक असलेल्या कम्प्युटर बाबांनी गुरुवारी जाहीर केले की भाजपमधील चार आमदार आपणास भेटले आहेत आणि ते काँग्रेसकडे पुन्हा येऊ इच्छितात. मुख्यमंत्री कमलनाथ सांगतील, तेव्हा त्या चौघांना आपण त्यांच्याकडे नेणार आहोत.

भाजपमध्ये एकजूट कायम असून कोणतीही गटबाजी अस्तित्वात नाही असे प्रदेशाध्यक्ष खा. राकेशसिंह म्हणाले. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, मध्य प्रदेशमध्ये भाजपत कोणतीही गटबाजी नाही. आता सर्व परिस्थिती नियंत्रणात असून काहीही विपरीत घडलेले नाही. सूत्रांनी सांगितले की, नारायण यादव व शरद कौल या दोन आमदारांच्या भाजप नेते संपर्कात आहेत. 

योग्य दखल घेत नसल्याची तक्रारआमची भाजपमध्ये दखल घेतली जात नसल्याची तक्रार दोन आमदारांनी शिवराजसिंह चौहान यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी केली होती. यापुढे तसे होणार नाही, असे आश्वासन त्यांना शिवराजसिंह चौहान यांनी दिले होते. मात्र, तरीही कमलनाथ सरकारने विधानसभेत मांडलेल्या मध्यप्रदेश फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयकावर या दोन भाजप आमदारांनी बुधवारी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले होते.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस