शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 08:17 IST

लडाखमध्ये बुधवारी आंदोलनाने हिंसक वळण घेतले. दरम्यान, आता भाजपाने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. लडाखमधील हिंसाचार हा देशात बांगलादेश, नेपाळ आणि फिलीपिन्ससारखी परिस्थिती निर्माण करण्याच्या उद्देशाने काँग्रेस पक्षाच्या धोकादायक कटाचा भाग होता, असा आरोप केला आहे.

लडाखला सहाव्या अनुसूचीत समाविष्ट करण्यासाठी आणि राज्याचा दर्जा मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला आणि ३० पोलिस आणि सीआरपीएफ जवानांसह ७० जण जखमी झाले.

दरम्यान, आता भाजपाने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. 'लडाखमधील हिंसाचार हा काँग्रेस पक्षाच्या धोकादायक कटाचा भाग होता, याचा उद्देश देशात बांगलादेश, नेपाळ आणि फिलीपिन्ससारखी परिस्थिती निर्माण करणे हा आहे. आज, लडाखमधील निदर्शने Gen-Z यांनी रचली आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तपासात हा Gen- Z यांचा निषेध नव्हता तर काँग्रेस पक्षाचा निषेध होता, असे दिसून आल्याचा दावा केला आहे.

सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार

काँग्रेसचे वाईट हेतू आहेत - भाजप

माध्यमांसोबत संवाद साधताना भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, "काँग्रेसचे वाईट हेतू आहेत. हे काँग्रेसचे षड्यंत्र आहे. 'भारत तेरे तुकडे होंगे, इन्शाअल्लाह, इन्शाअल्लाह' हे काँग्रेसचे मुख्य नारा आहे. हे राहुल गांधी आणि जॉर्ज सोरोस यांचे षडयंत्र आहे. त्यांना जनतेचा पाठिंबा मिळत नसल्याने ते देश तोडण्याचा कट रचत आहेत.

राहुल गांधी बांगलादेश आणि नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करतात

पात्रा म्हणाले, "राहुल गांधी वारंवार तरुणांना बांगलादेश आणि नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी चिथावणी देतात. हे आजकाल फिलीपिन्समध्ये घडत आहे. ते भारतातही अशीच परिस्थिती निर्माण करू इच्छितात. काँग्रेससाठी हे योग्य नेतृत्व आहे का?, असा सवाल त्यांनी केला.

"काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी हे लक्षात ठेवावे की असे प्रयत्न भारतात यशस्वी होणार नाहीत. भारत ही हजारो वर्षे जुनी संस्कृती आहे. या देशातील लोकांमध्ये चांगले आणि वाईट यात फरक करण्याची क्षमता आहे. त्यांना माहिती आहे की पंतप्रधान आणि सरकार त्यांच्यासाठी काय करत आहेत",असेही पात्रा म्हणाले.

"२०१४ पूर्वीची परिस्थिती काय होती आणि आज काय आहे. आज आपण जगात एका चमकत्या ताऱ्यासारखे आहोत. या देशातील लोकांना सर्वकाही माहित आहे. जर तुम्ही देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला तर जनता उत्तर देईल, असा टोला पात्रा यांनी लगावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Ladakh Violence: Four Dead, Curfew Imposed; BJP Accuses Congress

Web Summary : Ladakh's agitation turned violent, resulting in four deaths and seventy injuries. BJP accuses Congress of plotting the unrest to destabilize India, alleging a conspiracy with international actors to create chaos.
टॅग्स :ladakhलडाख