शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 08:17 IST

लडाखमध्ये बुधवारी आंदोलनाने हिंसक वळण घेतले. दरम्यान, आता भाजपाने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. लडाखमधील हिंसाचार हा देशात बांगलादेश, नेपाळ आणि फिलीपिन्ससारखी परिस्थिती निर्माण करण्याच्या उद्देशाने काँग्रेस पक्षाच्या धोकादायक कटाचा भाग होता, असा आरोप केला आहे.

लडाखला सहाव्या अनुसूचीत समाविष्ट करण्यासाठी आणि राज्याचा दर्जा मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला आणि ३० पोलिस आणि सीआरपीएफ जवानांसह ७० जण जखमी झाले.

दरम्यान, आता भाजपाने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. 'लडाखमधील हिंसाचार हा काँग्रेस पक्षाच्या धोकादायक कटाचा भाग होता, याचा उद्देश देशात बांगलादेश, नेपाळ आणि फिलीपिन्ससारखी परिस्थिती निर्माण करणे हा आहे. आज, लडाखमधील निदर्शने Gen-Z यांनी रचली आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तपासात हा Gen- Z यांचा निषेध नव्हता तर काँग्रेस पक्षाचा निषेध होता, असे दिसून आल्याचा दावा केला आहे.

सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार

काँग्रेसचे वाईट हेतू आहेत - भाजप

माध्यमांसोबत संवाद साधताना भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, "काँग्रेसचे वाईट हेतू आहेत. हे काँग्रेसचे षड्यंत्र आहे. 'भारत तेरे तुकडे होंगे, इन्शाअल्लाह, इन्शाअल्लाह' हे काँग्रेसचे मुख्य नारा आहे. हे राहुल गांधी आणि जॉर्ज सोरोस यांचे षडयंत्र आहे. त्यांना जनतेचा पाठिंबा मिळत नसल्याने ते देश तोडण्याचा कट रचत आहेत.

राहुल गांधी बांगलादेश आणि नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करतात

पात्रा म्हणाले, "राहुल गांधी वारंवार तरुणांना बांगलादेश आणि नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी चिथावणी देतात. हे आजकाल फिलीपिन्समध्ये घडत आहे. ते भारतातही अशीच परिस्थिती निर्माण करू इच्छितात. काँग्रेससाठी हे योग्य नेतृत्व आहे का?, असा सवाल त्यांनी केला.

"काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी हे लक्षात ठेवावे की असे प्रयत्न भारतात यशस्वी होणार नाहीत. भारत ही हजारो वर्षे जुनी संस्कृती आहे. या देशातील लोकांमध्ये चांगले आणि वाईट यात फरक करण्याची क्षमता आहे. त्यांना माहिती आहे की पंतप्रधान आणि सरकार त्यांच्यासाठी काय करत आहेत",असेही पात्रा म्हणाले.

"२०१४ पूर्वीची परिस्थिती काय होती आणि आज काय आहे. आज आपण जगात एका चमकत्या ताऱ्यासारखे आहोत. या देशातील लोकांना सर्वकाही माहित आहे. जर तुम्ही देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला तर जनता उत्तर देईल, असा टोला पात्रा यांनी लगावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Ladakh Violence: Four Dead, Curfew Imposed; BJP Accuses Congress

Web Summary : Ladakh's agitation turned violent, resulting in four deaths and seventy injuries. BJP accuses Congress of plotting the unrest to destabilize India, alleging a conspiracy with international actors to create chaos.
टॅग्स :ladakhलडाख