शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या नोटाबंदीच्या 40 मिनिटांच्या भाषणात 17 वेळा काळया पैशांचा उल्लेख पण काय उपयोग ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 12:05 IST

नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला त्यामागे काही ठराविक उद्दिष्टये होती. त्यात सर्वात महत्वाचे उद्दिष्टय होते ते म्हणजे काळा पैसा संपवण्याचे.

ठळक मुद्देधक्कातंत्र ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकारणाची खास ओळख. नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला त्यामागे काही ठराविक उद्दिष्टये होती.

नवी दिल्ली -  धक्कातंत्र ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकारणाची खास ओळख. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी रामनाथ कोविंद यांची निवड असो किंवा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा. या दोन्ही निर्णयांनी राजकीय तज्ञांपासून ते सर्वसामान्यांना आश्चर्याचा धक्का दिला. मागच्यावर्षी आठ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूरचित्रवाहिनीवरुन जाहीर केलेला नोटाबंदीचा निर्णय सुद्धा असाच धक्कादायक होता. 

देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणा-या या निर्णयामुळे श्रीमंतांपासून ते गरीबांपर्यंत सर्वचजण कामाला लागले. नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला त्यामागे काही ठराविक उद्दिष्टये होती. त्यात सर्वात महत्वाचे उद्दिष्टय होते ते म्हणजे काळा पैसा संपवण्याचे. आठ नोव्हेंबरला मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना 40 मिनिटांचे भाषण केले. या भाषणात 17 वेळा त्यांनी काळया पैशांचा उल्लेख केला. पण प्रत्यक्षात नोटाबंदीनंतर किती काळा पैसा बाहेर आला हे तपासले तर मोदींचा निर्णय फसला असेच दिसते. 

ना मोदींच्या सरकारी यंत्रणेला काळया पैशाचा स्त्रोत शोधून काढता आला, ना या पैशाला बँकेत जमा करण्यापासून रोखता आले. संसदीय समितीने जेव्हा आरबीआयच्या अधिका-यांना नोटाबंदीनंतर किती काळा पैसा जमा झाला असा प्रश्न विचारला तेव्हा आरबीआय अधिका-यांकडे उत्तर नव्हते. ऑगस्ट महिन्यात आरबीआयने आकडेवारी जाहीर केली त्यावेळी सत्य परिस्थिती समोर आली.

नोटाबंदीनंतर चलनातून रद्द झालेल्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या 99 टक्के नोटा आरबीआयकडे परत जमा झाल्या होत्या. मग काळा पैसा गेला कुठे ? नोटाबंदीच्या निर्णयाचा काय उपयोग झाला ? असे प्रश्न निर्माण होतात.  इतक्या मोठया निर्णयानंतर कमीत कमी 15 ते 20 टक्के काळा पैसा तरी बाहेर यायला हवा होता.  

टॅग्स :Note BanनोटाबंदीNarendra Modiनरेंद्र मोदी