शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

Harsh Mahajan In BJP: “कार्यकर्ते नाहीत, दिशाहीन-नेतृत्वहीन पक्ष”; ४५ वर्षांची साथ सोडली, काँग्रेसचा बडा नेता भाजपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 21:05 IST

Harsh Mahajan In BJP: काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने पियुष गोयल आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असतानाच पक्षाला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे राजस्थानमध्ये राजकीय संकट ओढावलेले असताना, दुसरीकडे तब्बल ४५ वर्ष पक्षाची सेवा केलेल्या एका बड्या नेत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

हिमाचल प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष हर्ष महाजन यांनी काँग्रेस पक्षाला मोठा झटका दिला. गेल्या ४५ वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या महाजनांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत हर्ष महाजनांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे दिल्ली दरबारी वजन वाढलेले महाराष्ट्रातील नेते आणि माजी मंत्री विनोद तावडेही यावेळी उपस्थित होते.

पक्षाकडे ना दूरदर्शीपणा राहिलाय ना कार्यकर्ते

मी ४५ वर्षे काँग्रेसमध्ये होतो. आज काँग्रेस दिशाहीन, नेतृत्वहीन झाली आहे. तळागाळातील कार्यकर्ते नाहीत, अशी टीका महाजन यांनी यावेळी बोलताना केली. महाजन हे हिमाचल प्रदेश राज्य सरकारचे माजी मंत्री आहेत. ते माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निकटवर्तीय मानले जात. वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह आता प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत आणि त्यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह हे पक्षाचे आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये काहीही दम उरला नाही, असेही महाजन यांनी सांगितले. 

दरम्यान, हर्ष महाजन यांचे स्वागत करताना पियुष गोयल म्हणाले की, महाजन यांनी काँग्रेसमध्ये महत्त्वाची पदे भूषवली असून त्यांनी स्वच्छ प्रतिमा राखली आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकांनंतर राज्यात सत्ता टिकवून भाजप इतिहास रचणार असून, भाजप सरकारची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास पियुष गोयल यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसHimachal Pradeshहिमाचल प्रदेश