शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
Daily Top 2Weekly Top 5

“देशातील वातावरण बिघडलयं, जातीयवाद वाढवला जातोय”; सलमान खुर्शीद यांनी साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 12:35 IST

माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी केंद्रातील मोदी  सरकारवर सडकून टीका केली आहे.

इंदोर: माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी केंद्रातील मोदी  सरकारवर सडकून टीका केली आहे. इंदोरमधील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सलमान खुर्शीद यांनी यावरून उघडपणे भाष्य केले. देशातील वातावरण बिघडत चालले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झाला आहे. भारतातील नागरिक सुखी असल्याचे पाहायला मिळत नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे लोभ तसेच दुसरे म्हणजे बदल घडवणाऱ्या नेतृत्वाचा अभाव आहे, अशी टीका सलमान खुर्शीद यांनी केली आहे.  

देशातील वाढत्या जातीय तणावावरही त्यांनी आपले मत मांडले. सलमान खुर्शीद म्हणाले की, आजच्या घडीला देशात जातीय बाबींना जाणीवपूर्वक महत्त्व दिले जात आहे. विविध वर्गांमध्ये तेढ वाढताना दिसत आहे. यामुळे नागरिक एकमेकांवर घृणास्पद आरोप करत आहेत. यामागे राजकीय कारणे आहेत. देशवासीयांची विचारसरणी अशी नाही. याला कोणीतरी बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे, आपण सयंम बाळगला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाचेच म्हणणे नाकारत असू तर मग कुठे जायचे

नुपूर शर्माप्रकरणी बोलताना सलमान खुर्शीद म्हणाले की, आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणतीच उच्च संस्था नाही. सर्वोच्च न्यायालयाला आदरपूर्वक सांगू शकतो की, यावर पुनर्विचार करावा. परंतु, सर्वोच्च न्यायालयावर पक्षपातीपणाचा आरोप करणे पूर्णपणे चुकीचे आहे. आपण जर सर्वोच्च न्यायालयाचेच म्हणणे नाकारत असू तर मग कुठे जायचे, असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना केला. 

लोभामुळे हे सगळे घडतेय

देशात उद्भवलेल्या सद्य स्थितीमागील कारण लालसा, लोभ असल्याचे खुर्शीद यांनी म्हटले आहे. आता पैसा चालत नाही, मग लोक धर्माचा आसरा घेत आहेत. त्यामुळे आपल्याला आता अशा नेतृत्वाची गरज आहे, जे या विचारसरणीत बदल घडवून आणेल, जसा बदल राष्ट्रपिता महात्मा गांधीनी घडवून आणला होता, असे खुर्शीद यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, काँग्रेसने आपल्या सद्यस्थितीबाबत गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. या देशात नेमके असे काय बदल झाले आहेत, ज्यामुळे आपण देशातील राजकारणात मोठ्या प्रमाणात पिछाडीवर गेले आहोत, असे नमूद करत, देशातील वातावरण चांगले नसून, देशवासी सुखाने नांदताना दिसत नाहीत, असा दावा खुर्शीद यांनी केला.  

टॅग्स :Politicsराजकारणsalman khurshidसलमान खुर्शिदCentral Governmentकेंद्र सरकार