शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

“देशातील वातावरण बिघडलयं, जातीयवाद वाढवला जातोय”; सलमान खुर्शीद यांनी साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 12:35 IST

माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी केंद्रातील मोदी  सरकारवर सडकून टीका केली आहे.

इंदोर: माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी केंद्रातील मोदी  सरकारवर सडकून टीका केली आहे. इंदोरमधील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सलमान खुर्शीद यांनी यावरून उघडपणे भाष्य केले. देशातील वातावरण बिघडत चालले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झाला आहे. भारतातील नागरिक सुखी असल्याचे पाहायला मिळत नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे लोभ तसेच दुसरे म्हणजे बदल घडवणाऱ्या नेतृत्वाचा अभाव आहे, अशी टीका सलमान खुर्शीद यांनी केली आहे.  

देशातील वाढत्या जातीय तणावावरही त्यांनी आपले मत मांडले. सलमान खुर्शीद म्हणाले की, आजच्या घडीला देशात जातीय बाबींना जाणीवपूर्वक महत्त्व दिले जात आहे. विविध वर्गांमध्ये तेढ वाढताना दिसत आहे. यामुळे नागरिक एकमेकांवर घृणास्पद आरोप करत आहेत. यामागे राजकीय कारणे आहेत. देशवासीयांची विचारसरणी अशी नाही. याला कोणीतरी बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे, आपण सयंम बाळगला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाचेच म्हणणे नाकारत असू तर मग कुठे जायचे

नुपूर शर्माप्रकरणी बोलताना सलमान खुर्शीद म्हणाले की, आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणतीच उच्च संस्था नाही. सर्वोच्च न्यायालयाला आदरपूर्वक सांगू शकतो की, यावर पुनर्विचार करावा. परंतु, सर्वोच्च न्यायालयावर पक्षपातीपणाचा आरोप करणे पूर्णपणे चुकीचे आहे. आपण जर सर्वोच्च न्यायालयाचेच म्हणणे नाकारत असू तर मग कुठे जायचे, असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना केला. 

लोभामुळे हे सगळे घडतेय

देशात उद्भवलेल्या सद्य स्थितीमागील कारण लालसा, लोभ असल्याचे खुर्शीद यांनी म्हटले आहे. आता पैसा चालत नाही, मग लोक धर्माचा आसरा घेत आहेत. त्यामुळे आपल्याला आता अशा नेतृत्वाची गरज आहे, जे या विचारसरणीत बदल घडवून आणेल, जसा बदल राष्ट्रपिता महात्मा गांधीनी घडवून आणला होता, असे खुर्शीद यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, काँग्रेसने आपल्या सद्यस्थितीबाबत गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. या देशात नेमके असे काय बदल झाले आहेत, ज्यामुळे आपण देशातील राजकारणात मोठ्या प्रमाणात पिछाडीवर गेले आहोत, असे नमूद करत, देशातील वातावरण चांगले नसून, देशवासी सुखाने नांदताना दिसत नाहीत, असा दावा खुर्शीद यांनी केला.  

टॅग्स :Politicsराजकारणsalman khurshidसलमान खुर्शिदCentral Governmentकेंद्र सरकार