शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

“मोदींवरील भाष्य अत्यंत वेदनादायी”; ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवेंनी राहुल गांधींना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 16:54 IST

Harish Salve And Rahul Gandhi: देशाचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहताना अशा प्रकारची भाषा वापरली पाहिजे का? असा विचार राहुल गांधींनी करायला हवा, असे हरीश साळवेंनी म्हटले आहे.

Harish Salve And Rahul Gandhi: मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यानंतर आता राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. तसेच राहुल गांधी यांना त्यांचे निवासस्थानही देण्यात आले आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्याचे पाहायला मिळाले. यातच देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींना चांगलेच सुनावले आहे. 

गुजरात उच्च न्यायालयाच्या शिक्षेच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे विरोधी पक्षांनी जोरदार स्वागत केले. तसेच केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला. यातच एका वृत्तवाहिनीशी बोलताना हरीश साळवे यांनी याविषयी अत्यंत परखड शब्दांत मत मांडले. सार्वजनिक जीवनात अशा प्रकारे वक्तव्य करणे हे राहुल गांधींकडून अपेक्षित नाही, असे हरीश साळवे यांनी म्हटले आहे.

एका बाजूला देशाचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न अन् दुसऱ्या बाजूला...

मोदी आडनावावरुन राहुल गांधी यांनी जे काही वक्तव्य केले, त्यासाठी त्यांना दोषी ठरवले जावे की नाही हा वेगळा मुद्दा आहे. मात्र कुणाविषयी टिप्पणी करताना अशा पद्धतीची भाषा वापरणे हे अत्यंत वाईट आणि वेदनादायी आहे. लोकांवर खोटे आरोप करता आणि सांगता की मी सार्वजनिक आयुष्यात आहे. मात्र राहुल गांधी हे रात्री झोपताना हा विचार करत असतील का? की भारताचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहतो आहे तर मी अशा प्रकारची भाषा वापरली पाहिजे का? असा सवाल हरीश साळवे यांनी केला. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली असली तरी त्यावेळी हेही सांगितले की, जे तुम्ही बोललात ते चुकीचे आहे. अशा प्रकारचे वक्तव्य तुम्ही करायला नको होते. अद्याप सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला नाही फक्त गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली आहे, असे हरीश साळवे यांनी स्पष्टपणे सांगितले.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय