शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

जे बोलायचंय ते संघाच्या कार्यक्रमातच बोलेन; प्रणव मुखर्जींनी मौन सौडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 17:50 IST

संघाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारल्यानंतर प्रणव मुखर्जीं पहिल्यांदाच बोलले

कोलकाता : आरएसएसच्या नागपुरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमातील सहभागाबद्दल माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पहिल्यांदा भाष्य केलं. याबद्दल होत असलेल्या चर्चांना नागपुरात संघाच्या कार्यक्रमातच उत्तर देऊ, असं मुखर्जींनी म्हटलं आहे. 'मला जे काही बोलायचं आहे, ते मी नागपुरात बोलेन,' असं मुखर्जी यांनी बंगाली वृत्तपत्र आनंद बाजार पत्रिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. मला अनेकांनी पत्रं पाठवली आहेत. अनेकांचे फोन आले आहेत. मात्र मी कोणालाही उत्तर दिलेलं नाही, असंही ते म्हणाले. ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश आणि सी. के. जाफर शरीफ यांनी प्रणव मुखर्जींना पत्र लिहून कार्यक्रमात सहभागी होण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे. 'मुखर्जी यांच्यासारख्या विद्वान आणि धर्मनिरपेक्ष विचारांच्या व्यक्तीनं संघासोबत कोणतीही जवळीक ठेऊ नये,' अशा आशयाचं पत्र मुखर्जी यांना लिहिल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली. संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यास देशातील धर्मनिरपेक्ष वातावरणावर चुकीचा परिणाम होईल, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. आनंद बाजार पत्रिकेशी बोलताना जयराम रमेश यांनी काही प्रश्नदेखील उपस्थित केले आहेत. 'अचानक असं काय झालं की प्रणव मुखर्जी यांच्यासारखा महान नेता, ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, ते संघाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत?' असा सवाल रमेश यांनी केला. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे. 'आता त्यांनी कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं असल्यानं याबद्दल वाद घालून काही होणार नाही. निमंत्रण स्वीकारलचं आहे, तर आता त्यांनी तिथे जावं आणि संघाच्या विचारधारेतील त्रुटी सांगाव्यात,' असं चिदंबरम म्हणाले. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघ मुख्यालयात होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयcongressकाँग्रेस