शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

“संजीव भट्ट, उमर खालिद, प्रोफेसर साईबाबांना मुक्त करावे”; मार्कंडेट काटजूंचे SCला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 18:13 IST

Former Judge Markandey Katju Letter To Supreme Court: संजीव भट्ट, उमर खालिद आणि प्रोफेसर साईबाबा यांच्यावरील आरोप खोटे असून, मोदी सरकारने केवळ द्वेषापोटी यांना जेलमध्ये डांबले आहे, असा आरोप मार्कंडेय काटजू यांनी केला आहे.

Former Judge Markandey Katju Letter To Supreme Court: सातत्याने वादग्रस्त विधाने करून चर्चेत असलेले तसेच भाजपा व केंद्र सरकार यांचे निर्णय, धोरणांवर टीकास्त्र सोडणाऱ्या माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना एक पत्र लिहिले आहे. माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट, उमर खालिद, प्रोफेसर साईबाबा यांना जेलमधून मुक्त करावे, अशी मागणी मार्कंडेय काटजू यांनी या पत्रातून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केली आहे. 

माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू आपल्या पत्रात म्हणतात की, आदरपूर्वक अपील करतो की, जेलमध्ये असलेल्या काही जणांबाबत न्यायालयाने पूनर्विचार करावा. हे लोक निर्दोष असून, मोदी सरकारच्या राजकीय प्रतिशोधाच्या भावनेमुळे चुकीच्या पद्धतीने कारागृहात डांबले गेले आहे, असे मला वाटते. या लोकांविरोधात खोटे आरोप करण्यात आले आहेत. हे सर्व आरोप रद्द करून न्यायालयाने त्यांना सोडून देण्याचे आदेश द्यावेत. 

मार्कंडेय काटजू यांना कोणाकोणाला जेलमधून मुक्त करण्याची मागणी केली आहे?

- मार्कंडेय काटजू आपल्या पत्रात म्हणतात की, संजीव भट्ट हे वरिष्ठ आयपीएस पोलीस अधिकारी होते. गुजरात सरकारने १९९६ च्या जुन्या खटल्यात त्यांना खोट्या आरोपाखाली अटक करून दोषी ठरवले. २०१८ पासून संजीव भट्ट तुरुंगात आहेत. त्याला नोकरीतूनही बडतर्फ करण्यात आले असून, त्याचा व त्याच्या कुटुंबीयांचा अनेक प्रकारे छळ करण्यात आला आहे, असा आरोप काटजू यांनी या पत्रातून केला आहे. 

- पुढे काटजू लिहितात की, उमर खालिदने जेएनयूमधून पीएचडी पदवी मिळवली आहे. उमर खालिद सामाजिक कार्यकर्ता होते. यूएपीए आणि आयपीसीतील अनेक कलमांसह देशद्रोहाच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. हे सर्व पूर्णपणे बनावट आणि खोटे आहे. २०२० पासून उमर खालिद जेलमध्ये आहे. त्यांचा खरा गुन्हा मुस्लिम असणे हा आहे. जेएनयूमधील याच घटनेत कन्हैया कुमारवरही असेच आरोप करण्यात आले होते. हिंदू असल्याने त्याची मुक्तता करण्यात आली, असा मोठा दावा काटजू यांनी केला आहे. 

- भीमा कोरेगावच्या आरोपींवरील सर्व आरोप खोटे असल्याचे दिसून येत आहे. ते आरोप रद्द केले गेले पाहिजेत. भारतातील मानवाधिकार कार्यकर्त्यांवरील आरोप त्वरित रद्द करण्यात यावे. मोदी सरकारने अनेकदा त्यांच्याविरोधात टीका करणाऱ्यांना अटक केली आहे. लोकशाहीत सरकारवर टीका करणे हा जनतेचा अधिकार आहे, असेही काटजू यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

- प्रोफेसर साईबाबांच्या प्रकरणाचा फेरविचार व्हायला हवा. प्रोफेसर साईबाब यांच्यावरील सर्व आरोप रद्द व्हायला हवेत. कारण ते पूर्णपणे निर्दोष असल्याचे दिसून येत असून, त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी तयार केलेले पुरावे चुकीचे आहेत, असे काटजू यांनी पत्रात लिहिले आहे. 

- दहशतवाद, देशद्रोह, UAPA अशा खोट्या आरोपांखाली मोठ्या संख्येने निरपराध मुस्लीम समाजातील अनेक जण दीर्घकाळ तुरुंगात आहेत. त्यांचा गुन्हा एवढाच होता की, ते मुस्लीम आहे आणि मोदी त्यांचा तिरस्कार करतात, या शब्दांत मार्कंडेय काटजू यांनी पत्रातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयUmar Khalidउमर खालिदCentral Governmentकेंद्र सरकारProfessorप्राध्यापकsaibabaसाईबाबा