शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

“संजीव भट्ट, उमर खालिद, प्रोफेसर साईबाबांना मुक्त करावे”; मार्कंडेट काटजूंचे SCला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 18:13 IST

Former Judge Markandey Katju Letter To Supreme Court: संजीव भट्ट, उमर खालिद आणि प्रोफेसर साईबाबा यांच्यावरील आरोप खोटे असून, मोदी सरकारने केवळ द्वेषापोटी यांना जेलमध्ये डांबले आहे, असा आरोप मार्कंडेय काटजू यांनी केला आहे.

Former Judge Markandey Katju Letter To Supreme Court: सातत्याने वादग्रस्त विधाने करून चर्चेत असलेले तसेच भाजपा व केंद्र सरकार यांचे निर्णय, धोरणांवर टीकास्त्र सोडणाऱ्या माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना एक पत्र लिहिले आहे. माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट, उमर खालिद, प्रोफेसर साईबाबा यांना जेलमधून मुक्त करावे, अशी मागणी मार्कंडेय काटजू यांनी या पत्रातून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केली आहे. 

माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू आपल्या पत्रात म्हणतात की, आदरपूर्वक अपील करतो की, जेलमध्ये असलेल्या काही जणांबाबत न्यायालयाने पूनर्विचार करावा. हे लोक निर्दोष असून, मोदी सरकारच्या राजकीय प्रतिशोधाच्या भावनेमुळे चुकीच्या पद्धतीने कारागृहात डांबले गेले आहे, असे मला वाटते. या लोकांविरोधात खोटे आरोप करण्यात आले आहेत. हे सर्व आरोप रद्द करून न्यायालयाने त्यांना सोडून देण्याचे आदेश द्यावेत. 

मार्कंडेय काटजू यांना कोणाकोणाला जेलमधून मुक्त करण्याची मागणी केली आहे?

- मार्कंडेय काटजू आपल्या पत्रात म्हणतात की, संजीव भट्ट हे वरिष्ठ आयपीएस पोलीस अधिकारी होते. गुजरात सरकारने १९९६ च्या जुन्या खटल्यात त्यांना खोट्या आरोपाखाली अटक करून दोषी ठरवले. २०१८ पासून संजीव भट्ट तुरुंगात आहेत. त्याला नोकरीतूनही बडतर्फ करण्यात आले असून, त्याचा व त्याच्या कुटुंबीयांचा अनेक प्रकारे छळ करण्यात आला आहे, असा आरोप काटजू यांनी या पत्रातून केला आहे. 

- पुढे काटजू लिहितात की, उमर खालिदने जेएनयूमधून पीएचडी पदवी मिळवली आहे. उमर खालिद सामाजिक कार्यकर्ता होते. यूएपीए आणि आयपीसीतील अनेक कलमांसह देशद्रोहाच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. हे सर्व पूर्णपणे बनावट आणि खोटे आहे. २०२० पासून उमर खालिद जेलमध्ये आहे. त्यांचा खरा गुन्हा मुस्लिम असणे हा आहे. जेएनयूमधील याच घटनेत कन्हैया कुमारवरही असेच आरोप करण्यात आले होते. हिंदू असल्याने त्याची मुक्तता करण्यात आली, असा मोठा दावा काटजू यांनी केला आहे. 

- भीमा कोरेगावच्या आरोपींवरील सर्व आरोप खोटे असल्याचे दिसून येत आहे. ते आरोप रद्द केले गेले पाहिजेत. भारतातील मानवाधिकार कार्यकर्त्यांवरील आरोप त्वरित रद्द करण्यात यावे. मोदी सरकारने अनेकदा त्यांच्याविरोधात टीका करणाऱ्यांना अटक केली आहे. लोकशाहीत सरकारवर टीका करणे हा जनतेचा अधिकार आहे, असेही काटजू यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

- प्रोफेसर साईबाबांच्या प्रकरणाचा फेरविचार व्हायला हवा. प्रोफेसर साईबाब यांच्यावरील सर्व आरोप रद्द व्हायला हवेत. कारण ते पूर्णपणे निर्दोष असल्याचे दिसून येत असून, त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी तयार केलेले पुरावे चुकीचे आहेत, असे काटजू यांनी पत्रात लिहिले आहे. 

- दहशतवाद, देशद्रोह, UAPA अशा खोट्या आरोपांखाली मोठ्या संख्येने निरपराध मुस्लीम समाजातील अनेक जण दीर्घकाळ तुरुंगात आहेत. त्यांचा गुन्हा एवढाच होता की, ते मुस्लीम आहे आणि मोदी त्यांचा तिरस्कार करतात, या शब्दांत मार्कंडेय काटजू यांनी पत्रातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयUmar Khalidउमर खालिदCentral Governmentकेंद्र सरकारProfessorप्राध्यापकsaibabaसाईबाबा