शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

"कंगना राजकारणात अल्पवयीन, अपरिपक्व..."; सत्यपाल मलिक यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 20:06 IST

सत्यपाल मलिक यांनी शीख समुदायाच्या आत्मनिर्भरतेची प्रशंसा केली आणि सरकारी हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली.

हरियाणातील कर्नाल येथील गुरुद्वारामध्ये आयोजित शीख संमेलनात माजी उपराज्यपाल सत्यपाल मलिक आणि काँग्रेस नेते जगदीश सिंह झिंडा यांनीही भाग घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना मलिक म्हणाले की, "कंगना राणौत राजकारणात अल्पवयीन आणि अपरिपक्व आहे. ती विनाकारण वाद निर्माण करते. भारतीय जनता पक्षाने तिची पक्षातून हकालपट्टी करावी."

कार्यक्रमादरम्यान सत्यपाल मलिक यांनी शीख समुदायाच्या आत्मनिर्भरतेची प्रशंसा केली आणि सरकारी हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, "सरकारने शीख समाजाच्या कामात हस्तक्षेप करू नये. सरकार आपल्या कामात यशस्वी होत नाही, मग ते रस्ते दुरुस्ती असो, कालव्यांची देखभाल असो किंवा शेतीशी संबंधित समस्या असो. शीख समाज आपलं काम उत्कृष्टपणे करत आहे."

मलिक यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. "जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. माझ्या कार्यकाळात कोणीही श्रीनगरच्या जवळही जात नसे. आता परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे." शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना मलिक म्हणाले, "शेतकरी सातत्याने आंदोलन करत आहेत. त्यांच्या प्रत्येक आंदोलनाला माझा पाठिंबा आहे कारण त्यांच्या मागण्या न्याय्य आहेत" असं म्हटलं आहे. 

मलिक यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचंही कौतुक केलं. राहुल गांधी अतिशय शांत आणि विनम्र आहेत असं म्हटलं. मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले, "मोदी सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाले आहे, पण ज्या भागात शेतकरी आंदोलन झाले, तेथे त्यांचा पराभव झाला. मोदी सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांचा एकमेव अजेंडा भ्रष्टाचार करणं, पैसा कमवणं आणि सत्तेत राहणं आहे." 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी