शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

"कंगना राजकारणात अल्पवयीन, अपरिपक्व..."; सत्यपाल मलिक यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 20:06 IST

सत्यपाल मलिक यांनी शीख समुदायाच्या आत्मनिर्भरतेची प्रशंसा केली आणि सरकारी हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली.

हरियाणातील कर्नाल येथील गुरुद्वारामध्ये आयोजित शीख संमेलनात माजी उपराज्यपाल सत्यपाल मलिक आणि काँग्रेस नेते जगदीश सिंह झिंडा यांनीही भाग घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना मलिक म्हणाले की, "कंगना राणौत राजकारणात अल्पवयीन आणि अपरिपक्व आहे. ती विनाकारण वाद निर्माण करते. भारतीय जनता पक्षाने तिची पक्षातून हकालपट्टी करावी."

कार्यक्रमादरम्यान सत्यपाल मलिक यांनी शीख समुदायाच्या आत्मनिर्भरतेची प्रशंसा केली आणि सरकारी हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, "सरकारने शीख समाजाच्या कामात हस्तक्षेप करू नये. सरकार आपल्या कामात यशस्वी होत नाही, मग ते रस्ते दुरुस्ती असो, कालव्यांची देखभाल असो किंवा शेतीशी संबंधित समस्या असो. शीख समाज आपलं काम उत्कृष्टपणे करत आहे."

मलिक यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. "जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. माझ्या कार्यकाळात कोणीही श्रीनगरच्या जवळही जात नसे. आता परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे." शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना मलिक म्हणाले, "शेतकरी सातत्याने आंदोलन करत आहेत. त्यांच्या प्रत्येक आंदोलनाला माझा पाठिंबा आहे कारण त्यांच्या मागण्या न्याय्य आहेत" असं म्हटलं आहे. 

मलिक यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचंही कौतुक केलं. राहुल गांधी अतिशय शांत आणि विनम्र आहेत असं म्हटलं. मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले, "मोदी सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाले आहे, पण ज्या भागात शेतकरी आंदोलन झाले, तेथे त्यांचा पराभव झाला. मोदी सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांचा एकमेव अजेंडा भ्रष्टाचार करणं, पैसा कमवणं आणि सत्तेत राहणं आहे." 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी