शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

“अमित शाह लोकांशी खोटे बोलत आहेत तर काय करणार?”; फारूक अब्दुल्ला यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 20:21 IST

Farooq Abdullah:काश्मीरमध्ये शांतता आहे, असे हे लोक म्हणतात तर मग लष्कराचे जवान का शहीद का होतात, अशी विचारणा फारूक अब्दुल्ला यांनी केली.

Farooq Abdullah: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच केंद्रीय गृहमंत्री लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक २०२३ सादर केले. या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. याला आता फारूक अब्दुल्ला यांनी उत्तर दिले आहे. हे लोकांशी खोटे बोलत आहे, तर काय करणार, असे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

या विधेयकावर बोलताना, पंडित नेहरुंची चूक म्हणजे संयुक्त राष्ट्रात आपला मुद्दा घेऊन जाण्याची चूक. पंडित जवाहरलाल नेहरूंनी शेख अब्दुल्लांना लिहिलेले हे पत्र आहे. विरोधक विनाकारण माझ्यावर चिडचिड करत आहेत. मी नेहरूंचं पत्र वाचून दाखवत आहे. त्यांना चिडचिड करायचीच असेल, तर त्यांनी नेहरूंवर करायला पाहिजे. नेहरूंनी योग्य निर्णय घेतला असता तर पीओके भारताचा भाग असता, असा दावा अमित शाह यांनी केला. यावर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

अमित शाह लोकांशी खोटे बोलत आहेत तर काय करणार?

काश्मीरमध्ये पंडित नेहरुंच्या काळात जी स्थिती होती त्यामुळे संयुक्त राष्ट्रात जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. पूँछ आणि राजौरी वाचवण्यासाठी सैन्य वळवावे लागले. पूँछ आणि राजौरी भारताचा भाग आहे, तो त्याच निर्णयामुळे आहे. काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांकडे नेला पाहिजे, हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह सगळ्यांनीच त्यांना हा सल्ला दिला होता, असे फारूक अब्दुल्ला यांनी सांगितले. तसेच संयुक्त राष्ट्रांकडे जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता. या ठिकाणी शांतता प्रस्थापित होण्यासाठीच पंडित नेहरु संयुक्त राष्ट्रांकडे हा प्रश्न घेऊन गेले. आता हे (अमित शाह) लोकांशी खोटं बोलत आहेत तर काय करणार, असा सवाल फारूक अब्दुल्ला यांनी केला. 

दरम्यान, काश्मीरमध्ये दहशतीचे वातावरण संपले असे हे सांगतात. मला सांगा तिथे किती फौजा आहेत? BSF, CRPF आणि इतर फौजा आहे. इतक्या फौजा आणि लष्कर तिथे असूनही आपले जवान आणि अधिकारी मरत असतील तर त्याचे कारण काय? दहशतवाद संपला म्हणत आहेत मग हे का घडते आहे? अशी विचारणा फारूक अब्दुल्ला यांनी केली. 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाParliamentसंसदAmit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीर