शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

"कठोर कायद्याची गरज आहे...", वसतिगृहातील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर गांगुलीची तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 19:30 IST

पश्चिम बंगालमधील जादवपूर येथील विद्यापीठ परिसरात झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर वाद चिघळला आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील जादवपूर येथील विद्यापीठ परिसरात झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर वाद चिघळला आहे. जादवपूरच्या घटनेनंतर राज्यातील इतर विद्यापीठे आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. जादवपूरच्या घटनेनंतर रवींद्र भारती, प्रेसिडेन्सी, कलकत्ता या विद्यापीठांनी त्यांच्या कॅम्पसमध्ये बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली आहे. आवारात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करण्यात येत आहे. जादवपूरच्या घटनेनंतर इतर विद्यापीठेही त्यांच्या पूर्वीच्या निर्णयांची फेरतपासणी करत आहेत. अशातच भारतीय संघाचे माजी खेळाडू सौरव गांगुली यांनी या दुर्दैवी घटनेवर नाराजी व्यक्त केली.

ही शिकण्याची ठिकाणे आहेत, या संस्थांमध्ये विद्यार्थी शिकायला येतात. कठोर कायद्याची गरज असून यावरच लक्ष असायला हवे, असे गांगुली यांनी सांगितले. मृत्यूच्या घटनेनंतर चांगलेच राजकारण तापले आहे. सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस सरकारवर आरोप करत भाजपाने सडकून टीका केली.

शुक्रवारी आंदोलन करत असलेल्या भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पोलिसांविरोधात घोषणाबाजी सुरू केली असता अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. खरं तर जादवपूर विद्यापीठात ९ ऑगस्ट रोजी वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. विरोधक विविध आरोप करत आहेत. मात्र, ममता सरकार आरोपींचा बचाव करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

दरम्यान, ९ ऑगस्टच्या रात्री स्वप्नदीप हा वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडला असता त्याचा मृत्यू झाला. वसतिगृहात राहणाऱ्या इतर विद्यार्थ्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांना छतावरून काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. मग जाऊन पाहिले तर स्वप्नदीप रक्ताच्या थारोळ्यात दिसला. १० ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजता स्वप्नदीपचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील पडला तेव्हा त्यांच्या अंगावर कपडे नव्हते. तसेच त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा देखील होत्या.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालSaurav Gangulyसौरभ गांगुलीDeathमृत्यूMamata Banerjeeममता बॅनर्जी