शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

PAK vs AUS सामन्यावरून राजकारण तापलं; विद्यमान मुख्यमंत्र्यांची उपस्थिती अन् 'माजी' संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 20:33 IST

HD Kumaraswamy On Siddaramaiah : शुक्रवारी बंगळुरू येथील चिन्नस्वामी स्टेडियमवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळवला गेला.

HD Kumaraswamy On Karnataka Govt : सध्या भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. शुक्रवारी बंगळुरू येथील चिन्नस्वामी स्टेडियमवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळवला गेला. हा सामना पाहण्याठी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विविध खात्याच्या मंत्र्यांनी हजेरी लावली होती. यावरून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी सडकून टीका केली आहे. बंगळुरूमध्ये माध्यमांशी बोलताना कुमारस्वामी यांनी सांगितले की, राज्य अडचणीत असताना सरकार मात्र क्रिकेट सामने पाहण्यात व्यग्र आहे. 

राज्य सरकारवर टीका करताना कुमारस्वामी म्हणाले, "काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असता तर चालले असते पण सामना पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा होता. त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला की ऑस्ट्रेलियाला? राज्यात जनतेचे हाल होत असून सरकार क्रिकेटचा सामना पाहत आहे."

"राज्य सरकारमधील नेत्यांनी निधीसाठी केंद्राला पत्र लिहून वेळ मागितली पाहिजे. जनतेने आम्हाला सत्ता दिली, असे काँग्रेसचे नेते सांगत आहेत. पण, सरकारमधील टक्केवारी आणि भ्रष्टाचार यावर लोक बोलत आहेत. काँग्रेसवाले बोलतात की, आम्ही जे बोललो ते केले पण शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे त्याचे काय? राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करत आहे का? सरकारने केंद्राशी पत्रव्यवहार केला का? राज्य सरकारने केंद्राशी संपर्क साधायला हवा", असेही कुमारस्वामी यांनी नमूद केले. 

कुमारस्वामी यांची राज्य सरकारवर टीकाकर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी ७ ऑक्टोबर रोजी सांगितले होते की, राज्य सरकारने केंद्राकडे पीक नुकसान भरपाईसाठी ४,८६० कोटी रुपयांचे आवाहन केले आहे. मनरेगाची थकबाकीही केंद्राकडे मागितली आहे. यावर कुमारस्वामी म्हणाले की, काही जिल्ह्यांमध्ये पाण्याची टंचाई असून शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आणि काही भागात पिकाच्या गुणवत्तेशी संबंधित समस्या आहेत. सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकICC One Day World Cupवन डे वर्ल्ड कपPakistanपाकिस्तानkumarswamyकुमारस्वामीAustraliaआॅस्ट्रेलिया