शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

दिल्लीत गुन्हेगारी नाही अजूनही म्हणाल का? तिघांच्या हत्येनंतर केजरीवालांचा केंद्राला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 12:39 IST

राजधानी दिल्लीतील तिहेरी हत्याकांडावरुन माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

Delhi Triple Murder : राष्ट्रीय राजधानीतील नेब सराय भागात एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पती पत्नी आणि त्यांच्या मुलीची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये राजेश त्यांची पत्नी कोमल आणि मुलगी कविता यांचा समावेश आहे. मॉर्निंग वॉकवरुन मुलगा घरी परतला तेव्हा तिघांचेही मृतदेह घरात पडलेले दिसले. तिघांचे मृतदेह पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो बेशुद्ध झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दुसरीकडे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

बुधवारी सकाळी तिघांच्या हत्येने दिल्ली हादरली आहे. दक्षिण दिल्लीतील नेब सराय भागातील देवळी येथे पती, पत्नी आणि मुलीच्या हत्येची खळबळजनक घटना समोर आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. राजेश यांचा मुलगा पहाटे ५ वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेला होता. घरी आला असता त्याला आई-वडील व बहिणीचे मृतदेह दिसले. तिघांचीही हत्या झाली होती. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता तर राजेश हे सैन्यातून निवृत्त झाले होते.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत. याप्रकरणी पोलीस मुलाची चौकशी करत आहेत. हा गुन्हा करण्यासाठी चाकूचा वापर करण्यात आला आहे. तिघांचीही वार करून हत्या करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची तोडफोड किंवा चोरीचा प्रकार समोर आलेला नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हत्येमागील नेमकी कारणे शोधली जात आहेत.

दरम्यान, आपचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकणावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. नेब सराईत एकाच घरात तिघांचा खून. हे खूप वेदनादायक आणि भीतीदायक आहे. रोज सकाळी दिल्लीतील लोक अशा भीतीदायक बातम्यांनी जागे होतात. गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे. कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे. घरे उद्ध्वस्त होत आहेत, निष्पाप जीव गमावले जात आहेत आणि ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते हे सर्व घडताना मूकपणे पाहत आहेत. केंद्र सरकार गप्प बसून दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था कोलमडताना पाहणार का? दिल्लीत गुन्हेगारी हा मुद्दा नाही, असे त्यांचे पक्ष अजूनही म्हणतील का?, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस