शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत गुन्हेगारी नाही अजूनही म्हणाल का? तिघांच्या हत्येनंतर केजरीवालांचा केंद्राला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 12:39 IST

राजधानी दिल्लीतील तिहेरी हत्याकांडावरुन माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

Delhi Triple Murder : राष्ट्रीय राजधानीतील नेब सराय भागात एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पती पत्नी आणि त्यांच्या मुलीची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये राजेश त्यांची पत्नी कोमल आणि मुलगी कविता यांचा समावेश आहे. मॉर्निंग वॉकवरुन मुलगा घरी परतला तेव्हा तिघांचेही मृतदेह घरात पडलेले दिसले. तिघांचे मृतदेह पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो बेशुद्ध झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दुसरीकडे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

बुधवारी सकाळी तिघांच्या हत्येने दिल्ली हादरली आहे. दक्षिण दिल्लीतील नेब सराय भागातील देवळी येथे पती, पत्नी आणि मुलीच्या हत्येची खळबळजनक घटना समोर आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. राजेश यांचा मुलगा पहाटे ५ वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेला होता. घरी आला असता त्याला आई-वडील व बहिणीचे मृतदेह दिसले. तिघांचीही हत्या झाली होती. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता तर राजेश हे सैन्यातून निवृत्त झाले होते.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत. याप्रकरणी पोलीस मुलाची चौकशी करत आहेत. हा गुन्हा करण्यासाठी चाकूचा वापर करण्यात आला आहे. तिघांचीही वार करून हत्या करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची तोडफोड किंवा चोरीचा प्रकार समोर आलेला नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हत्येमागील नेमकी कारणे शोधली जात आहेत.

दरम्यान, आपचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकणावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. नेब सराईत एकाच घरात तिघांचा खून. हे खूप वेदनादायक आणि भीतीदायक आहे. रोज सकाळी दिल्लीतील लोक अशा भीतीदायक बातम्यांनी जागे होतात. गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे. कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे. घरे उद्ध्वस्त होत आहेत, निष्पाप जीव गमावले जात आहेत आणि ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते हे सर्व घडताना मूकपणे पाहत आहेत. केंद्र सरकार गप्प बसून दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था कोलमडताना पाहणार का? दिल्लीत गुन्हेगारी हा मुद्दा नाही, असे त्यांचे पक्ष अजूनही म्हणतील का?, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस