शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

दिल्लीत गुन्हेगारी नाही अजूनही म्हणाल का? तिघांच्या हत्येनंतर केजरीवालांचा केंद्राला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 12:39 IST

राजधानी दिल्लीतील तिहेरी हत्याकांडावरुन माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

Delhi Triple Murder : राष्ट्रीय राजधानीतील नेब सराय भागात एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पती पत्नी आणि त्यांच्या मुलीची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये राजेश त्यांची पत्नी कोमल आणि मुलगी कविता यांचा समावेश आहे. मॉर्निंग वॉकवरुन मुलगा घरी परतला तेव्हा तिघांचेही मृतदेह घरात पडलेले दिसले. तिघांचे मृतदेह पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो बेशुद्ध झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दुसरीकडे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

बुधवारी सकाळी तिघांच्या हत्येने दिल्ली हादरली आहे. दक्षिण दिल्लीतील नेब सराय भागातील देवळी येथे पती, पत्नी आणि मुलीच्या हत्येची खळबळजनक घटना समोर आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. राजेश यांचा मुलगा पहाटे ५ वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेला होता. घरी आला असता त्याला आई-वडील व बहिणीचे मृतदेह दिसले. तिघांचीही हत्या झाली होती. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता तर राजेश हे सैन्यातून निवृत्त झाले होते.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत. याप्रकरणी पोलीस मुलाची चौकशी करत आहेत. हा गुन्हा करण्यासाठी चाकूचा वापर करण्यात आला आहे. तिघांचीही वार करून हत्या करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची तोडफोड किंवा चोरीचा प्रकार समोर आलेला नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हत्येमागील नेमकी कारणे शोधली जात आहेत.

दरम्यान, आपचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकणावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. नेब सराईत एकाच घरात तिघांचा खून. हे खूप वेदनादायक आणि भीतीदायक आहे. रोज सकाळी दिल्लीतील लोक अशा भीतीदायक बातम्यांनी जागे होतात. गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे. कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे. घरे उद्ध्वस्त होत आहेत, निष्पाप जीव गमावले जात आहेत आणि ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते हे सर्व घडताना मूकपणे पाहत आहेत. केंद्र सरकार गप्प बसून दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था कोलमडताना पाहणार का? दिल्लीत गुन्हेगारी हा मुद्दा नाही, असे त्यांचे पक्ष अजूनही म्हणतील का?, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस