शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

दिल्लीत गुन्हेगारी नाही अजूनही म्हणाल का? तिघांच्या हत्येनंतर केजरीवालांचा केंद्राला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 12:39 IST

राजधानी दिल्लीतील तिहेरी हत्याकांडावरुन माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

Delhi Triple Murder : राष्ट्रीय राजधानीतील नेब सराय भागात एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पती पत्नी आणि त्यांच्या मुलीची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये राजेश त्यांची पत्नी कोमल आणि मुलगी कविता यांचा समावेश आहे. मॉर्निंग वॉकवरुन मुलगा घरी परतला तेव्हा तिघांचेही मृतदेह घरात पडलेले दिसले. तिघांचे मृतदेह पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो बेशुद्ध झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दुसरीकडे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

बुधवारी सकाळी तिघांच्या हत्येने दिल्ली हादरली आहे. दक्षिण दिल्लीतील नेब सराय भागातील देवळी येथे पती, पत्नी आणि मुलीच्या हत्येची खळबळजनक घटना समोर आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. राजेश यांचा मुलगा पहाटे ५ वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेला होता. घरी आला असता त्याला आई-वडील व बहिणीचे मृतदेह दिसले. तिघांचीही हत्या झाली होती. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता तर राजेश हे सैन्यातून निवृत्त झाले होते.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत. याप्रकरणी पोलीस मुलाची चौकशी करत आहेत. हा गुन्हा करण्यासाठी चाकूचा वापर करण्यात आला आहे. तिघांचीही वार करून हत्या करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची तोडफोड किंवा चोरीचा प्रकार समोर आलेला नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हत्येमागील नेमकी कारणे शोधली जात आहेत.

दरम्यान, आपचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकणावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. नेब सराईत एकाच घरात तिघांचा खून. हे खूप वेदनादायक आणि भीतीदायक आहे. रोज सकाळी दिल्लीतील लोक अशा भीतीदायक बातम्यांनी जागे होतात. गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे. कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे. घरे उद्ध्वस्त होत आहेत, निष्पाप जीव गमावले जात आहेत आणि ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते हे सर्व घडताना मूकपणे पाहत आहेत. केंद्र सरकार गप्प बसून दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था कोलमडताना पाहणार का? दिल्लीत गुन्हेगारी हा मुद्दा नाही, असे त्यांचे पक्ष अजूनही म्हणतील का?, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस