शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

BJP च्या माजी मुख्यमंत्र्यांनी वाचवलं होतं सरकार; काँग्रेस मुख्यमंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 10:18 IST

२०२० मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांनी अशोक गहलोत यांच्या विरोधात बंडखोरी करत विरोधात भूमिका घेतली होती.

जयपूर - राजस्थानच्या राजकारणात सध्या मोठ्या हालचाली दिसून येत आहेत. सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यातील मतभेद आता पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. त्यातच मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबद्दल एक खळबळजनक दावा केला आहे. २०२० मध्ये जेव्हा काँग्रस सरकार अडचणीत आले तेव्हा माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या मदतीनेच आमचे सरकार वाचले असा दोवा त्यांनी केला आहे. तर गहलोत यांच्या दाव्यात काहीही तथ्य नाही असं सांगत वसुंधरा राजे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

गहलोत यांनी धौलपूर येथील एका कार्यक्रमात हे विधान केले. अशोक गहलोत म्हणाले की, वसुंधरा राजे, शोभा रानी आणि कैलाश मेघवाल यांना माहिती होती की त्यांचा पक्ष राज्यातील सरकार पाडण्याची तयारी करत आहे. तेव्हा स्वत: वसुंधरा आणि कैलाश यांनी आम्ही कधीही जनतेने निवडून दिलेले सरकार पैशाच्या जोरावर पाडले नाही. अशी आमची संस्कृती नाही असं सांगत जे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांची साथ दिली नाही असा दावा गहलोत यांनी केला. 

गहलोत यांचे वक्तव्य एक षडयंत्र - वसुंधरा राजेत्याचवेळी भाजपाच्या दिग्गज नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी गहलोत यांचे विधान सपशेल खोटे असल्याचे म्हटले आहे. एका षड्यंत्राखाली हे वक्तव्य करण्यात आले आहे. माझा सर्वात जास्त अपमान कोणी केला असेल तर ती व्यक्ती म्हणजे गहलोत. २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने ते अशी वक्तव्ये करत आहेत. अशोक गहलोत यांनी आपल्यावर खोटे आरोप केले आहेत, कारण त्यांना त्यांच्याच पक्षात बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. या बंडामुळे गहलोत बिथरले आहेत असं वसुंधरा राजे यांनी म्हटलं. 

२०२० मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांनी अशोक गहलोत यांच्या विरोधात बंडखोरी करत विरोधात भूमिका घेतली होती. पायलट यांच्यासोबत तेव्हा काँग्रेसचे १८ आमदार होते. त्यानंतर अशोक गहलोत सरकार पडेल असे वाटत होते. मात्र, अशोक गहलोत यांना सरकार वाचवण्यात यश आले.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपा