शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

BJP च्या माजी मुख्यमंत्र्यांनी वाचवलं होतं सरकार; काँग्रेस मुख्यमंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 10:18 IST

२०२० मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांनी अशोक गहलोत यांच्या विरोधात बंडखोरी करत विरोधात भूमिका घेतली होती.

जयपूर - राजस्थानच्या राजकारणात सध्या मोठ्या हालचाली दिसून येत आहेत. सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यातील मतभेद आता पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. त्यातच मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबद्दल एक खळबळजनक दावा केला आहे. २०२० मध्ये जेव्हा काँग्रस सरकार अडचणीत आले तेव्हा माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या मदतीनेच आमचे सरकार वाचले असा दोवा त्यांनी केला आहे. तर गहलोत यांच्या दाव्यात काहीही तथ्य नाही असं सांगत वसुंधरा राजे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

गहलोत यांनी धौलपूर येथील एका कार्यक्रमात हे विधान केले. अशोक गहलोत म्हणाले की, वसुंधरा राजे, शोभा रानी आणि कैलाश मेघवाल यांना माहिती होती की त्यांचा पक्ष राज्यातील सरकार पाडण्याची तयारी करत आहे. तेव्हा स्वत: वसुंधरा आणि कैलाश यांनी आम्ही कधीही जनतेने निवडून दिलेले सरकार पैशाच्या जोरावर पाडले नाही. अशी आमची संस्कृती नाही असं सांगत जे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांची साथ दिली नाही असा दावा गहलोत यांनी केला. 

गहलोत यांचे वक्तव्य एक षडयंत्र - वसुंधरा राजेत्याचवेळी भाजपाच्या दिग्गज नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी गहलोत यांचे विधान सपशेल खोटे असल्याचे म्हटले आहे. एका षड्यंत्राखाली हे वक्तव्य करण्यात आले आहे. माझा सर्वात जास्त अपमान कोणी केला असेल तर ती व्यक्ती म्हणजे गहलोत. २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने ते अशी वक्तव्ये करत आहेत. अशोक गहलोत यांनी आपल्यावर खोटे आरोप केले आहेत, कारण त्यांना त्यांच्याच पक्षात बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. या बंडामुळे गहलोत बिथरले आहेत असं वसुंधरा राजे यांनी म्हटलं. 

२०२० मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांनी अशोक गहलोत यांच्या विरोधात बंडखोरी करत विरोधात भूमिका घेतली होती. पायलट यांच्यासोबत तेव्हा काँग्रेसचे १८ आमदार होते. त्यानंतर अशोक गहलोत सरकार पडेल असे वाटत होते. मात्र, अशोक गहलोत यांना सरकार वाचवण्यात यश आले.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपा