शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

BJP च्या माजी मुख्यमंत्र्यांनी वाचवलं होतं सरकार; काँग्रेस मुख्यमंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 10:18 IST

२०२० मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांनी अशोक गहलोत यांच्या विरोधात बंडखोरी करत विरोधात भूमिका घेतली होती.

जयपूर - राजस्थानच्या राजकारणात सध्या मोठ्या हालचाली दिसून येत आहेत. सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यातील मतभेद आता पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. त्यातच मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबद्दल एक खळबळजनक दावा केला आहे. २०२० मध्ये जेव्हा काँग्रस सरकार अडचणीत आले तेव्हा माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या मदतीनेच आमचे सरकार वाचले असा दोवा त्यांनी केला आहे. तर गहलोत यांच्या दाव्यात काहीही तथ्य नाही असं सांगत वसुंधरा राजे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

गहलोत यांनी धौलपूर येथील एका कार्यक्रमात हे विधान केले. अशोक गहलोत म्हणाले की, वसुंधरा राजे, शोभा रानी आणि कैलाश मेघवाल यांना माहिती होती की त्यांचा पक्ष राज्यातील सरकार पाडण्याची तयारी करत आहे. तेव्हा स्वत: वसुंधरा आणि कैलाश यांनी आम्ही कधीही जनतेने निवडून दिलेले सरकार पैशाच्या जोरावर पाडले नाही. अशी आमची संस्कृती नाही असं सांगत जे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांची साथ दिली नाही असा दावा गहलोत यांनी केला. 

गहलोत यांचे वक्तव्य एक षडयंत्र - वसुंधरा राजेत्याचवेळी भाजपाच्या दिग्गज नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी गहलोत यांचे विधान सपशेल खोटे असल्याचे म्हटले आहे. एका षड्यंत्राखाली हे वक्तव्य करण्यात आले आहे. माझा सर्वात जास्त अपमान कोणी केला असेल तर ती व्यक्ती म्हणजे गहलोत. २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने ते अशी वक्तव्ये करत आहेत. अशोक गहलोत यांनी आपल्यावर खोटे आरोप केले आहेत, कारण त्यांना त्यांच्याच पक्षात बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. या बंडामुळे गहलोत बिथरले आहेत असं वसुंधरा राजे यांनी म्हटलं. 

२०२० मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांनी अशोक गहलोत यांच्या विरोधात बंडखोरी करत विरोधात भूमिका घेतली होती. पायलट यांच्यासोबत तेव्हा काँग्रेसचे १८ आमदार होते. त्यानंतर अशोक गहलोत सरकार पडेल असे वाटत होते. मात्र, अशोक गहलोत यांना सरकार वाचवण्यात यश आले.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपा