शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दहा रुपयांची थाळी विसरा, मोफतच जेवून जा; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 08:50 IST

दिल्ली महापालिकेच्या नजफगड झोनचे उपायुक्त संयज सहाय यांनी ही योजना सुरू केली आहे.

नवी दिल्ली : तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशासारख्या राज्यांनी अवघ्या 5 ते 10 रुपयांत जेवण, नाश्ता अशा योजना लोकप्रिय झाल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातही निवडणुकीवेळी शिवसेनेने 10 रुपयांत पोटभर जेवण, तर भाजपाने ५ रुपयांत पोटभर जेवण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दिल्लीत जेवण मोफत दिले जाणार आहे. यासाठी एकच अट ठेवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे हे जेवण, नाष्टा कुठे साध्या किंवा गलिच्छ ठिकाणी नाही तर मोठमोठ्या मॉलमध्ये मिळणार आहे. 

दिल्ली महापालिकेच्या नजफगड झोनचे उपायुक्त संयज सहाय यांनी ही योजना सुरू केली आहे. त्यांनी सांगितले की, द्वारकेच्या दोन मॉलमध्ये गारबेज कॅफे सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये 250 ग्रॅम प्लॅस्टिक घेऊन येणाऱ्यांना नाश्ता तर 1 किलो प्लॅस्टिक घेऊन येणाऱ्या व्यक्तीला दुपारी किंवा रात्रीचे जेवण मोफत दिले जाणार आहे. मंगळवारपासून हे कॅफे सुरू करण्यात आले आहेत. 

दिल्लीला पूर्णपणे प्लॅस्टिकमुक्त करायचे आहे. मात्र, हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा लोक पुढे येतील. यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. यामुळे आम्ही पालिकेच्यावतीने हे अनोखे कॅफे सुरू केले आहेत. वर्धमान प्लस सिटी मॉल आणि सिटी सेंटर मॉलमध्ये दोन कॅफे खोलले आहेत. हे दोन्ही कॅफे मॉलच्या मालकांच्या मदतीने उघडण्यात आले आहेत. 

रोज जेवढे प्लॅस्टिक गोळा होईल, त्यावर दिल्ली पालिका प्रकल्पांमध्ये प्रक्रीया करणार आहे. पालिकेच्या अन्य झोनमध्येही अशाप्रकारचे कॅफे उघडले जाणार आहेत. मात्र, त्या ठिकाणी लोकांना मोफत जेवण नाही तर त्यांना प्लॅस्टिक कचरा दिल्यावर कुपन दिले जाणार आहे. या कुपनावर ते अन्य कोणत्याही हॉटेलांमध्ये जेवण करू शकणार आहे. यावर त्यांना 20 टक्क्यांची सूट दिली जाणार आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नdelhiदिल्लीShiv Senaशिवसेना