शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

S Jaishankar: “भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातील सर्वांत महान मुत्सद्दी”: परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 16:07 IST

S Jaishankar: मुत्सद्देगिरीच्या दृष्टीकोनातून श्रीकृष्ण आणि हनुमानाकडे पाहिले तर त्यांच्या महानतेची प्रचिती येते, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

S Jaishankar: आपल्याला चांगली रणनीती, व्यूहरचना बनवायची असेल तर आपल्याला भारतीय महाकाव्य आणि कथांमधून शिकावे लागेल. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. त्यामुळे आपण वाचलो असे जयद्रथला वाटले. पण तसे झाले नाही. चांगल्या रणनीतीचे हे उत्तम उदाहरण आहे, असे सांगत भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातील सर्वांत महान मुत्सद्दी होते, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले. 

एस. जयशंकर हे त्यांचं पुस्तक ‘द इंडिया वे : स्ट्रॅटेजीज फॉर अ‍ॅन अनसर्टन वर्ल्ड’च्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. एस. जयशंकर यांच्या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करण्यात आले आहे. ‘भारत मार्ग’ असे या भाषांतर केलेल्या मराठी पुस्तकाचे नाव आहे. महाभारतातील श्रीकृष्ण आणि जयद्रथाच्या कथेचा दाखला देताना एस. जयशंकर म्हणाले की, हे उदाहरण देण्याचे कारण म्हणजे परिस्थिती काहीही असो, विश्लेषण काहीही असो, आपण इतरांच्या किंवा पाश्चात्य कथांबाबत सहज बोलतो. ट्रोजन हॉर्स किंवा गॉर्डियन नॉट कथांबद्दल काही म्हणणे नाही. त्या कथा वाचल्याही आहेत. पण देशवासियांना हे सांगायचे आहे, तुम्हीही आपले साहित्य, कथा यांचे वाचन केले पाहिजे. जर खरोखरच रणनीतीची संस्कृती आपल्याला निर्माण करायची असेल, तर ती आपल्या कथा आणि महाकाव्यांमधून तयार होईल, असे जयशंकर यांनी सांगितले. 

भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातील सर्वांत महान मुत्सद्दी

श्रीकृष्णाने आपल्याला धैर्य कसे राखायचे ते शिकवले. कृष्णाने शिशुपालाचे १०० अपराध माफ केले. परंतु त्यानंतर त्याचा वध केला. भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातील सर्वात महान मुत्सद्दी आहेत. हनुमान तर मुत्सद्देगिरीच्याही पलीकडे गेले होते. ते लंकेला गेले, तिथे त्यांनी सीतेशी संपर्क साधला, लंकेला आगही लावली, अशी उदाहरणे जयशंकर यांनी दिली. 

दरम्यान, कौरव आणि पांडवांमध्ये महाभारताचे युद्ध झाले होते. लोक असे म्हणतात की, इतिहास आणि धार्मिक ग्रंथांमधून आपल्याला नवा दृष्टीकोन मिळतो. मुत्सद्देगिरीच्या दृष्टीकोनातून आपण श्रीकृष्णाकडे आणि हनुमानाकडे पाहिले तर त्यांच्या महानतेची प्रचिती येते. ते कोणत्या परिस्थितीत होते, त्यांना कोणते मिशन दिले होते, ते मिशन हनुमानाने कसे पूर्ण केले. आपल्या इंटेलिजन्सचा परिचय देत ते इतक्या पुढे गेले की, त्यांनी मिशन तर पूर्ण केलेच, परंतु त्यापुढे जाऊन त्यांनी लंकादेखील जाळून टाकली, असे जयशंकर यानी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरPuneपुणे