शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

S Jaishankar: “भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातील सर्वांत महान मुत्सद्दी”: परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 16:07 IST

S Jaishankar: मुत्सद्देगिरीच्या दृष्टीकोनातून श्रीकृष्ण आणि हनुमानाकडे पाहिले तर त्यांच्या महानतेची प्रचिती येते, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

S Jaishankar: आपल्याला चांगली रणनीती, व्यूहरचना बनवायची असेल तर आपल्याला भारतीय महाकाव्य आणि कथांमधून शिकावे लागेल. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. त्यामुळे आपण वाचलो असे जयद्रथला वाटले. पण तसे झाले नाही. चांगल्या रणनीतीचे हे उत्तम उदाहरण आहे, असे सांगत भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातील सर्वांत महान मुत्सद्दी होते, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले. 

एस. जयशंकर हे त्यांचं पुस्तक ‘द इंडिया वे : स्ट्रॅटेजीज फॉर अ‍ॅन अनसर्टन वर्ल्ड’च्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. एस. जयशंकर यांच्या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करण्यात आले आहे. ‘भारत मार्ग’ असे या भाषांतर केलेल्या मराठी पुस्तकाचे नाव आहे. महाभारतातील श्रीकृष्ण आणि जयद्रथाच्या कथेचा दाखला देताना एस. जयशंकर म्हणाले की, हे उदाहरण देण्याचे कारण म्हणजे परिस्थिती काहीही असो, विश्लेषण काहीही असो, आपण इतरांच्या किंवा पाश्चात्य कथांबाबत सहज बोलतो. ट्रोजन हॉर्स किंवा गॉर्डियन नॉट कथांबद्दल काही म्हणणे नाही. त्या कथा वाचल्याही आहेत. पण देशवासियांना हे सांगायचे आहे, तुम्हीही आपले साहित्य, कथा यांचे वाचन केले पाहिजे. जर खरोखरच रणनीतीची संस्कृती आपल्याला निर्माण करायची असेल, तर ती आपल्या कथा आणि महाकाव्यांमधून तयार होईल, असे जयशंकर यांनी सांगितले. 

भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातील सर्वांत महान मुत्सद्दी

श्रीकृष्णाने आपल्याला धैर्य कसे राखायचे ते शिकवले. कृष्णाने शिशुपालाचे १०० अपराध माफ केले. परंतु त्यानंतर त्याचा वध केला. भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातील सर्वात महान मुत्सद्दी आहेत. हनुमान तर मुत्सद्देगिरीच्याही पलीकडे गेले होते. ते लंकेला गेले, तिथे त्यांनी सीतेशी संपर्क साधला, लंकेला आगही लावली, अशी उदाहरणे जयशंकर यांनी दिली. 

दरम्यान, कौरव आणि पांडवांमध्ये महाभारताचे युद्ध झाले होते. लोक असे म्हणतात की, इतिहास आणि धार्मिक ग्रंथांमधून आपल्याला नवा दृष्टीकोन मिळतो. मुत्सद्देगिरीच्या दृष्टीकोनातून आपण श्रीकृष्णाकडे आणि हनुमानाकडे पाहिले तर त्यांच्या महानतेची प्रचिती येते. ते कोणत्या परिस्थितीत होते, त्यांना कोणते मिशन दिले होते, ते मिशन हनुमानाने कसे पूर्ण केले. आपल्या इंटेलिजन्सचा परिचय देत ते इतक्या पुढे गेले की, त्यांनी मिशन तर पूर्ण केलेच, परंतु त्यापुढे जाऊन त्यांनी लंकादेखील जाळून टाकली, असे जयशंकर यानी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरPuneपुणे