शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

"राज्यातील ढगफुटीच्या घटनांमागे विदेशी हात"; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचं अजब विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 13:18 IST

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी एक अजब दावा केला. राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमागे विदेशी हात असून ढगफुटी हा एक कट असल्याचं राव यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. तेलंगणामध्ये देखील पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी एक अजब दावा केला. राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमागे विदेशी हात असून ढगफुटी हा एक कट असल्याचं चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. भद्रचलम येथील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राव यांनी हे विधान केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी देशातील काही भागांमध्ये झालेल्या ढगफुटीच्या घटनांमागे विदेशी हात असल्याची माहिती माझ्याकडे आहे असं म्हटलं आहे. तसेच राज्यातील गोदावरी नदीच्या पर्जन्यकक्षेत झालेल्या ढगफुटीही याच कटाचा भाग असल्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी भद्रचलम येथील पूरग्रस्त भागाची रविवारी पहाणी केली. त्यांनी या भागाला एक हजार कोटींचा मदतनिधी जाहीर केला आहे. मात्र सध्या त्यांच्या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे. 

"ढगफुटी हा नवीन प्रकार समोर येऊ लागला आहे. हे किती खरं आहे मला ठावूक नाही. आपल्या देशाशी शत्रुत्व असणारे काहीजण देशात वेगवगेळ्या ठिकाणी ढगफुटी घडवून आणत आहेत. यापूर्वी त्यांनी काश्मीर, लेह-लडाख, त्यानंतर उत्तरखंडमध्ये हे घडवून आणलं आणि आता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ते गोदावरीच्या परिसरामध्ये हे घडवून आणत आहेत" असं मुख्यमंत्री बैठकीमध्ये म्हटलं आहे. याआधी त्यांनी या भागाची हवाई पाहणी सुद्धा केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

आंध्र प्रदेशमध्येही पूरामुळे लोक हैराण झाले आहेत. कोनासीमा जिल्ह्यातील पेडापट्टनमलंकामधील एक व्हिडीओ समोर आला आहे. पुराने वेढलेल्या भागात बोटीच्या सहाय्याने एका नवरीने आपल्या कुटुंबासह नवदेवाचे घर गाठल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोनसीमा जिल्ह्यातील पेडापट्टनमलंकामधील एका कुटुंबाने जुलैमध्ये आपल्या मुलीचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, मुसळधार पावसामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पुढच्या महिन्यात पावसाची स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे जुलै महिन्यातच प्रशांतीचे लग्न करण्याचा निर्णय तिच्या कुटुंबीयांनी घेतला. परंतु, पूर परिस्थितीमुळे वाहनांचा वापर करणे शक्य नव्हते. त्यामुळे अखेर बोटीच्या सहाय्याने प्रशांती आणि कुटुंबीयांनी नवरदेवाचे घर गाठत गाठले आणि दोघांचे लग्न लावण्यात आले. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाRainपाऊस