शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

"राज्यातील ढगफुटीच्या घटनांमागे विदेशी हात"; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचं अजब विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 13:18 IST

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी एक अजब दावा केला. राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमागे विदेशी हात असून ढगफुटी हा एक कट असल्याचं राव यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. तेलंगणामध्ये देखील पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी एक अजब दावा केला. राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमागे विदेशी हात असून ढगफुटी हा एक कट असल्याचं चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. भद्रचलम येथील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राव यांनी हे विधान केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी देशातील काही भागांमध्ये झालेल्या ढगफुटीच्या घटनांमागे विदेशी हात असल्याची माहिती माझ्याकडे आहे असं म्हटलं आहे. तसेच राज्यातील गोदावरी नदीच्या पर्जन्यकक्षेत झालेल्या ढगफुटीही याच कटाचा भाग असल्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी भद्रचलम येथील पूरग्रस्त भागाची रविवारी पहाणी केली. त्यांनी या भागाला एक हजार कोटींचा मदतनिधी जाहीर केला आहे. मात्र सध्या त्यांच्या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे. 

"ढगफुटी हा नवीन प्रकार समोर येऊ लागला आहे. हे किती खरं आहे मला ठावूक नाही. आपल्या देशाशी शत्रुत्व असणारे काहीजण देशात वेगवगेळ्या ठिकाणी ढगफुटी घडवून आणत आहेत. यापूर्वी त्यांनी काश्मीर, लेह-लडाख, त्यानंतर उत्तरखंडमध्ये हे घडवून आणलं आणि आता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ते गोदावरीच्या परिसरामध्ये हे घडवून आणत आहेत" असं मुख्यमंत्री बैठकीमध्ये म्हटलं आहे. याआधी त्यांनी या भागाची हवाई पाहणी सुद्धा केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

आंध्र प्रदेशमध्येही पूरामुळे लोक हैराण झाले आहेत. कोनासीमा जिल्ह्यातील पेडापट्टनमलंकामधील एक व्हिडीओ समोर आला आहे. पुराने वेढलेल्या भागात बोटीच्या सहाय्याने एका नवरीने आपल्या कुटुंबासह नवदेवाचे घर गाठल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोनसीमा जिल्ह्यातील पेडापट्टनमलंकामधील एका कुटुंबाने जुलैमध्ये आपल्या मुलीचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, मुसळधार पावसामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पुढच्या महिन्यात पावसाची स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे जुलै महिन्यातच प्रशांतीचे लग्न करण्याचा निर्णय तिच्या कुटुंबीयांनी घेतला. परंतु, पूर परिस्थितीमुळे वाहनांचा वापर करणे शक्य नव्हते. त्यामुळे अखेर बोटीच्या सहाय्याने प्रशांती आणि कुटुंबीयांनी नवरदेवाचे घर गाठत गाठले आणि दोघांचे लग्न लावण्यात आले. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाRainपाऊस