शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

तब्बल अडीच तास त्यांनी माझा आवाज दाबला; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 07:49 IST

आपल्या सरकारच्या तिसऱ्या कारकिर्दीतील पहिला अर्थसंकल्प सादर करण्याच्या एक दिवस आधी प्रसारमाध्यमांना मोदी संबोधित करत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : “मागच्या सत्रात अनेक खासदारांना त्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न मांडण्याची संधी मिळाली नाही, कारण काही पक्षांनी नकारात्मक राजकारण केल्याने संसदेचा वेळ वाया गेला. त्या सत्रात गोंधळ घालून पंतप्रधानांना तब्बल अडीच तास बोलू न देण्याचा, आवाज दाबण्याचा असंसदीय प्रयत्न झाला,” अशी खंत व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षांच्या खासदारांना राजकीय मतभेद बाजूला ठेवून विधायक चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

आपल्या सरकारच्या तिसऱ्या कारकिर्दीतील पहिला अर्थसंकल्प सादर करण्याच्या एक दिवस आधी प्रसारमाध्यमांना मोदी संबोधित करत होते. मतदानाच्या निकालानंतर लगेचच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी लोकांनी निवडलेल्या सरकारचा आवाज घटनाबाह्यरीत्या बंद करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानांना अडीच तास बोलू न देण्याच्या प्रयत्नांना लोकशाही परंपरांमध्ये स्थान असू शकत नाही आणि विरोधकांना त्याचा पश्चात्तापही होत नाही, असे ते म्हणाले. 

“देश हे सर्व बारकाईने पाहत आहे आणि आशा करतो की हे सत्र रचनात्मक, सर्जनशील असेल आणि लोकांच्या स्वप्नपूर्तीचा पाया घातला जाईल. भारतीय लोकशाहीच्या गौरवशाली प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.

दहा वर्षांत देशाचा श्वास कोंडला : काँग्रेसअडीच तास लोकसभेत बोलू दिले नाही, अशी टीका मोदींनी केल्यानंतर काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी दावा केला की, गेल्या दहा वर्षांच्या त्यांच्या अन्यायाच्या काळात संपूर्ण देशाचा श्वास कोंडला गेला होता, ज्यासाठी जनतेने त्यांना धडा शिकवला आहे. पंतप्रधान विसरले आहेत की, ते बहुमताच्या सरकारचे पंतप्रधान नसून दोन पक्षांच्या सहकार्याने चालवल्या जाणाऱ्या ‘एनडीए’च्या एक तृतीयांश सरकारचे पंतप्रधान आहेत. त्यांनी मोदी सरकार हा शब्द वापरणे टाळावे आणि स्वतःला लोकशाहीवादी सिद्ध करावे. तुमचे म्हणणे बरोबर आहे, संसद देशासाठी आहे. तो कोणत्याही राजाचा दरबार नाही. त्यामुळे देशातील तरुण, शेतकरी, सैनिक, मजूर, महिला, मागासवर्गीय, दलित, आदिवासी, गरिबांच्या व्यथा संसदेत मांडणे विरोधकांचे कर्तव्य आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

तीन वर्षांत सरकारची संसदेत ९१३ आश्वासने,  त्यापैकी ५८३ पूर्ण nसंसदीय कामकाज राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी सोमवारी राज्यसभेत माहिती दिली की, गेल्या तीन वर्षांत सरकारने संसदेत ९१३ आश्वासने दिली आहेत, nत्यापैकी ५८३ लागू करण्यात आली आहेत आणि ३३० प्रलंबित आहेत. धोरणात्मक समस्या आणि सुधारणांसह विविध कारणांमुळे आश्वासनांच्या अंमलबजावणीत विलंब होत असल्याचे ते म्हणाले.

खासदारांच्या भाषणांचे हिंदी रूपांतर बंद करा : सुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केंद्र सरकारने संसद सदस्यांच्या इंग्रजी किंवा प्रादेशिक भाषांमध्ये केलेल्या भाषणांचे दूरचित्रवाणी वाहिनीवर हिंदी रूपांतर (व्हॉइसओव्हर) करण्यास बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. ही एक प्रकारची सेन्सॉरशिप आहे. यामुळे लाखो गैर-हिंदी भाषिक भारतीयांना त्यांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींचे मूळ शब्द त्यांच्याच भाषेत ऐकण्याचा अधिकार हिरावून घेतला जातो. सरकारने हे भेदभावपूर्ण आणि संघराज्यविरोधी आंदोलन त्वरित थांबवावे, असे सुळे एक्सवर म्हणाल्या.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन