शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमधील सोनमर्ग येथील प्रकल्पाला लक्ष्य करत प्रथमच दहशतवाद्यांनी केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 13:36 IST

मजुरांच्या हत्येचा सुरक्षा दल बदला घेईल- नायब राज्यपाल

सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू: जम्मू-काश्मीरच्या सोनमर्ग जिल्ह्यातील गगनगीर क्षेत्रातील झेड वळण बोगद्याच्या कार्यात गुंतलेले कर्मचारी व मजुरांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबद्दल धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे गत १० वर्षांत या भागात एकही दहशतवादी हल्ल्याची घटना घडली नाही. सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने हा दहशतवादी हल्ला झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या दहशतवादी हल्ल्यात एक डॉक्टर आणि ६ परप्रांतीय मजुरांसह ७ लोक ठार झाले आहेत.

जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर द रजिस्टेंस फ्रंट या दहशतवादी गटाने केलेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. मात्र, गत दहा वर्षांत या भागात दहशतवादी कारवाया जवळपास नसल्यात जमा होत्या. त्यामुळे या क्षेत्रातील दहशतवाद पूर्णपणे संपल्याचा दावा केला जात होता. या वर्षी जेवढे दहशतवादी हल्ले झाले ते सर्व जम्मू-क्षेत्रात झाले आहेत. मात्र, काश्मीरमध्ये झालेला हा यंदाचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.

लोकांमध्ये दहशत पसरवण्याचे प्रयत्न

  • एखाद्या विकास प्रकल्पाला लक्ष्य करत दहशतवाद्यांनी हल्ला करणे, हेदेखील प्रथमच घडले आहे. 
  • स्थानिक नागरिक व परप्रांतीय मजुरांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी हल्ला करण्याची ही पहिलीच घटना आहे.
  • त्यामुळे विकास प्रकल्पात सहभागी लोकांमध्ये दहशत पसरवण्याचे धोरण दहशतवादी राबवत असल्याचे या कृतीतून स्पष्ट होत आहे.
  • या महत्त्वाच्या बोगद्याचे काम सुरू असताना कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षेची व्यवस्था का करण्यात आली नव्हती,  हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
  • सुरक्षेतील उणिवेमुळे हा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षा दलाने मात्र याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.

स्थलांतरित टार्गेट का?

  • सोनमर्गमध्ये सहा मजुरांसह ७ जणांची दहशतवाद्यांनी केलेली हत्या ही पहिली घटना नाही.
  • स्थलांतरित हे लोकसंख्याशास्त्र बदलण्याच्या कटात सहभागी असल्याचा समज दहशतवाद्यांचा आहे.त्यामुळे स्थलांतरितांना लक्ष्य केले जात आहे. 
  • कलम ३७० हटविल्यानंतरही  स्थलांतरित मजुरांवरील हल्ले कमी झालेले नाहीत.

प्रत्युत्तर दहशतवादी विसरणार नाहीत

गगनगीर क्षेत्रातील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या हत्येचा बदला सुरक्षा दल घेतल्याशिवाय राहणार नाही, असा दावा जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केला. सुरक्षा दलाने दिलेले प्रत्युत्तर दहशतवादी भविष्यात विसरणार नाहीत, असे  नमूद करत त्यांनी पाकिस्तानला लक्ष्य केले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिस