शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

जम्मू-काश्मीरमधील सोनमर्ग येथील प्रकल्पाला लक्ष्य करत प्रथमच दहशतवाद्यांनी केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 13:36 IST

मजुरांच्या हत्येचा सुरक्षा दल बदला घेईल- नायब राज्यपाल

सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू: जम्मू-काश्मीरच्या सोनमर्ग जिल्ह्यातील गगनगीर क्षेत्रातील झेड वळण बोगद्याच्या कार्यात गुंतलेले कर्मचारी व मजुरांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबद्दल धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे गत १० वर्षांत या भागात एकही दहशतवादी हल्ल्याची घटना घडली नाही. सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने हा दहशतवादी हल्ला झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या दहशतवादी हल्ल्यात एक डॉक्टर आणि ६ परप्रांतीय मजुरांसह ७ लोक ठार झाले आहेत.

जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर द रजिस्टेंस फ्रंट या दहशतवादी गटाने केलेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. मात्र, गत दहा वर्षांत या भागात दहशतवादी कारवाया जवळपास नसल्यात जमा होत्या. त्यामुळे या क्षेत्रातील दहशतवाद पूर्णपणे संपल्याचा दावा केला जात होता. या वर्षी जेवढे दहशतवादी हल्ले झाले ते सर्व जम्मू-क्षेत्रात झाले आहेत. मात्र, काश्मीरमध्ये झालेला हा यंदाचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.

लोकांमध्ये दहशत पसरवण्याचे प्रयत्न

  • एखाद्या विकास प्रकल्पाला लक्ष्य करत दहशतवाद्यांनी हल्ला करणे, हेदेखील प्रथमच घडले आहे. 
  • स्थानिक नागरिक व परप्रांतीय मजुरांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी हल्ला करण्याची ही पहिलीच घटना आहे.
  • त्यामुळे विकास प्रकल्पात सहभागी लोकांमध्ये दहशत पसरवण्याचे धोरण दहशतवादी राबवत असल्याचे या कृतीतून स्पष्ट होत आहे.
  • या महत्त्वाच्या बोगद्याचे काम सुरू असताना कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षेची व्यवस्था का करण्यात आली नव्हती,  हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
  • सुरक्षेतील उणिवेमुळे हा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षा दलाने मात्र याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.

स्थलांतरित टार्गेट का?

  • सोनमर्गमध्ये सहा मजुरांसह ७ जणांची दहशतवाद्यांनी केलेली हत्या ही पहिली घटना नाही.
  • स्थलांतरित हे लोकसंख्याशास्त्र बदलण्याच्या कटात सहभागी असल्याचा समज दहशतवाद्यांचा आहे.त्यामुळे स्थलांतरितांना लक्ष्य केले जात आहे. 
  • कलम ३७० हटविल्यानंतरही  स्थलांतरित मजुरांवरील हल्ले कमी झालेले नाहीत.

प्रत्युत्तर दहशतवादी विसरणार नाहीत

गगनगीर क्षेत्रातील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या हत्येचा बदला सुरक्षा दल घेतल्याशिवाय राहणार नाही, असा दावा जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केला. सुरक्षा दलाने दिलेले प्रत्युत्तर दहशतवादी भविष्यात विसरणार नाहीत, असे  नमूद करत त्यांनी पाकिस्तानला लक्ष्य केले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिस