शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

जम्मू-काश्मीरमधील सोनमर्ग येथील प्रकल्पाला लक्ष्य करत प्रथमच दहशतवाद्यांनी केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 13:36 IST

मजुरांच्या हत्येचा सुरक्षा दल बदला घेईल- नायब राज्यपाल

सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू: जम्मू-काश्मीरच्या सोनमर्ग जिल्ह्यातील गगनगीर क्षेत्रातील झेड वळण बोगद्याच्या कार्यात गुंतलेले कर्मचारी व मजुरांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबद्दल धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे गत १० वर्षांत या भागात एकही दहशतवादी हल्ल्याची घटना घडली नाही. सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने हा दहशतवादी हल्ला झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या दहशतवादी हल्ल्यात एक डॉक्टर आणि ६ परप्रांतीय मजुरांसह ७ लोक ठार झाले आहेत.

जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर द रजिस्टेंस फ्रंट या दहशतवादी गटाने केलेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. मात्र, गत दहा वर्षांत या भागात दहशतवादी कारवाया जवळपास नसल्यात जमा होत्या. त्यामुळे या क्षेत्रातील दहशतवाद पूर्णपणे संपल्याचा दावा केला जात होता. या वर्षी जेवढे दहशतवादी हल्ले झाले ते सर्व जम्मू-क्षेत्रात झाले आहेत. मात्र, काश्मीरमध्ये झालेला हा यंदाचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.

लोकांमध्ये दहशत पसरवण्याचे प्रयत्न

  • एखाद्या विकास प्रकल्पाला लक्ष्य करत दहशतवाद्यांनी हल्ला करणे, हेदेखील प्रथमच घडले आहे. 
  • स्थानिक नागरिक व परप्रांतीय मजुरांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी हल्ला करण्याची ही पहिलीच घटना आहे.
  • त्यामुळे विकास प्रकल्पात सहभागी लोकांमध्ये दहशत पसरवण्याचे धोरण दहशतवादी राबवत असल्याचे या कृतीतून स्पष्ट होत आहे.
  • या महत्त्वाच्या बोगद्याचे काम सुरू असताना कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षेची व्यवस्था का करण्यात आली नव्हती,  हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
  • सुरक्षेतील उणिवेमुळे हा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षा दलाने मात्र याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.

स्थलांतरित टार्गेट का?

  • सोनमर्गमध्ये सहा मजुरांसह ७ जणांची दहशतवाद्यांनी केलेली हत्या ही पहिली घटना नाही.
  • स्थलांतरित हे लोकसंख्याशास्त्र बदलण्याच्या कटात सहभागी असल्याचा समज दहशतवाद्यांचा आहे.त्यामुळे स्थलांतरितांना लक्ष्य केले जात आहे. 
  • कलम ३७० हटविल्यानंतरही  स्थलांतरित मजुरांवरील हल्ले कमी झालेले नाहीत.

प्रत्युत्तर दहशतवादी विसरणार नाहीत

गगनगीर क्षेत्रातील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या हत्येचा बदला सुरक्षा दल घेतल्याशिवाय राहणार नाही, असा दावा जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केला. सुरक्षा दलाने दिलेले प्रत्युत्तर दहशतवादी भविष्यात विसरणार नाहीत, असे  नमूद करत त्यांनी पाकिस्तानला लक्ष्य केले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिस