कुराणाचे पालन करा मुफ्ती अमजदअली काझी : शहरात रमजान ईद उत्साहात
By Admin | Updated: July 19, 2015 21:24 IST2015-07-19T21:24:28+5:302015-07-19T21:24:28+5:30
सोलापूर : कुराण म्हणजे ईश्वराचा शब्द आहे़ यातून जगाला शांततेचा संदेश दिला गेला आहे़ आयुष्य चांगले व्यतीत करायचे असेल तर कुराणाचे पालन करा, असे आवाहन शहर काझी मुफ्ती अमजदअली काझी यांनी केले़

कुराणाचे पालन करा मुफ्ती अमजदअली काझी : शहरात रमजान ईद उत्साहात
स लापूर : कुराण म्हणजे ईश्वराचा शब्द आहे़ यातून जगाला शांततेचा संदेश दिला गेला आहे़ आयुष्य चांगले व्यतीत करायचे असेल तर कुराणाचे पालन करा, असे आवाहन शहर काझी मुफ्ती अमजदअली काझी यांनी केले़रमजान ईदनिमित्त होटगी रोडवरील ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली़ याप्रसंगी त्यांनी तमाम जनतेला मार्गदर्शन करीत असताना वरील आवाहन केले़ सकाळी ९ वाजता होटगी रोडवरील ईदगाह मैदान मुस्लीम बांधवांनी फुलून गेले होते़ प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही राज्य कामगार विमा रुग्णालयाच्या कोपर्याला थाटलेल्या मंडपातून शहर काझी आणि काही बांधवांना गुलाबाची फुले देऊन त्यांचे स्वागत केले गेले़ यावेळी पालकांच्या सोबत लहान मुलांनीही नमाज अदा करण्यासाठी मैदानावर हजेरी लावली होती़ जवळपास १५ मिनिटे नमाज अदा करण्यात आली़ त्यानंतर शहर काझी यांनी तमाम जनतेला आपल्या प्रवचनातून मार्गदर्शन केले़ वाहतूक वळवली ईदगाह मैदान हे मुख्य रस्त्यावर असल्याने महावीर चौक, हॉटेल किनारा येथून आत होणारी वाहतूक थांबवून पर्यायी मार्ग काढून दिला होता़ याप्रसंगी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता़ मुख्य रस्ता आणि ईदगाह मैदानावर केवळ प्रार्थना करण्यासाठी आलेल्या बांधवांची गर्दी होती़ आबालवृद्धांचीही हजेरीनमाज अदा करण्यासाठी या मैदानावर पालकांबरोबर लहान मुलांनीही हजेरी लावली़ तरुणांबरोबर वयोवृद्ध नागरिकांनी या मैदानावर नमाज अदा करुन ईश्वराला आत्मसात करण्याचा प्रयत्न केला़ पांढर्या वेशातील जनसमुदाय लक्षवेधी ठरला़ जवळपास २० हजार बांधवांनी नमाज पठणासाठी हजेरी लावली होती़ आलिंगण देत दिल्या शुभेच्छा़़़नमाज पठणानंतर अनेकांनी प्रारंभी शहर काझींना रमजान ईदच्या शुभेच्छा देत गळा भेट घेतली़ त्यानंतर नागरिकांनी एकमेकाला आलिंगण देत ईदच्या शुभेच्छा दिल्या़ गर्दीतही मित्र, नातेवाईकांना भेटून शुभेच्छा देतानाचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले़ दानत्वाची परंपरा पाळलीकुराणामध्ये दानत्वाचे महत्त्व सांगितले गेले आहे़ नमाज पठणानंतर मुस्लीम बांधवांनी दानत्वाची परंपरा पाळली़ अनेक ठिकाणच्या प्रार्थनास्थळांसाठी जमेल तेवढी देणगी देऊन दानत्वाचे महत्त्व विषद केले़ मित्रांची गर्दी अन् क्षीरकुर्मा नमाज पठणानंतर मित्रांना, नातेवाईकांना घरी बोलावून गोड पदार्थ अर्थात क्षीरकुर्मा दिला जाण्याची परंपरा आहे़ घरोघरी मित्रांची गर्दी, हास्याचे फवारे, विनोद असेच काही प्रसंग पाहायला मिळाले़ अनेक दिवसांतून भेटलेले मित्र ईदनिमित्त घरी भेटल्याचा आनंद चेहर्यावरुन ओसंडून वाहत होता़