शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘पीएमओ’कडे अधिकार केंद्रित झाल्याने देश आर्थिक संकटात: अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:04 IST

नोबेल मिळाल्यानंतर डॉ. बॅनर्जी या सप्ताहांतास प्रथमच सपत्नीक भारतात आले होते.

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेवर सध्या जे मंदीचे संकट आले आहे त्यास तीन वर्षांपूर्वीची नोटाबंदी व पूर्ण तयारी न करता घाईघाईने लागू केलेला वस्तू व सेवाकर (जीएसटी) याखेरीज पंतप्रधान कार्यालयात सत्तेचे नको तेवढे केंद्रीकरण होणे हेही एक प्रमुख कारण आहे, असे मत यंदाचा नोबेल पुरस्कार जिंकणारे अर्थतज्ज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे.

नोबेल मिळाल्यानंतर डॉ. बॅनर्जी या सप्ताहांतास प्रथमच सपत्नीक भारतात आले होते. ‘दि वायर’ या आॅनलाइन न्यूज पोर्टलसाठी करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ‘जीएसटी’ सारखी आमूलाग्र बदल घडविणारी नवी अप्रत्यक्ष करव्यवस्था लागू झाल्यावर अडचणी येणे स्वाभाविक होते व अन्य कोणते सरकार असते तरी ते या अडचणी याहून चांगल्या प्रकारे हाताळू शकले असते असेही नाही.

ते असेही म्हणाले की, कंपन्यांवरील प्राप्तिकराच्या दरात कपात केल्याने गुंतवणुकीस चालना मिळून विकासाला गती येईल, याची खात्री देता येणार नाही. त्यासाठी ज्यायोगे बाजारातील मागणी वाढेल अशा उपायांचीही जोड द्यावी लागेल. त्यासाठी व्यक्तिगत प्राप्तिकरात कपात करून लोकांच्या हाती जास्त पैसा राहिल असे पाहणे व प्रधानमंत्री किसान योजनेसारख्या योजनांव्दारे ग्रामीण अर्थव्यवस्थेत आणखी पैसा खळविणे हे अन्य उपाय आहेत.

सरकारने शहरी भागातील महागाईला आळा घालण्यासाठी शेतमालाच्या आधारभूत किंमती जाणीवपूर्वक कमी ठेवल्याने ग्रामीण भागातील मागणी कमी झाली व सरकारने पुरवठादार व कंत्राटदारांचे पैसे वेळेवर चुकते न केल्याने अनेक प्रकल्प रखडणे हेही मंदीचे एक कारण आहे, असेही त्यांनी विश्लेषण केले.

या दौऱ्यात डॉ. बॅनर्जी यांनी त्यांनी जेथे शिक्षण घेतले त्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठासही भेट दिली. तेथे बोलताना ते म्हणाले की, याच विद्यापीठात माझ्या सहाध्यायी असलेल्या निर्मला सीतारामन आज देशाच्या वित्तमंत्री आहेत, याचा नक्कीच अभिमान वाटतो. सीतारामन यांनी कंपन्यांचा प्राप्तिकर वाढविण्याचा योग्य निर्णय घेतला होता. पण नंतर दडपणाला बळी पडून त्यांनी यात कपात करण्याची चूक केली, असे मला वाटते.

भाजपच्या व्यक्तिगत टीकेने व्यथित

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व भाजपचे राष्ट्रीय चिटणीस राहुल सिन्हा यांच्यासारख्या भाजप नेत्यांनी नोबेल पुरस्कारावरून केलेल्या व्यक्तिगत टीकेने आपण व्यथित झालो, असे डॉ. बॅनर्जी म्हणाले.ते म्हणाले की, माझ्या सल्ल्याने काँग्रेसने आखलेली ‘न्याय’ योजना मतदारांनी नाकारली, असे भाजप म्हणते; पण त्यानिमित्ताने हा विचार लोकांपुढे गेला, याचे मला समाधान आहे. मी एक अर्थतज्ज्ञ म्हणून व्यावसायिक सल्ला दिला होता. तो काँग्रेसप्रमाणे इतरांनाही घेता आला असता.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदी