शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

‘पीएमओ’कडे अधिकार केंद्रित झाल्याने देश आर्थिक संकटात: अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:04 IST

नोबेल मिळाल्यानंतर डॉ. बॅनर्जी या सप्ताहांतास प्रथमच सपत्नीक भारतात आले होते.

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेवर सध्या जे मंदीचे संकट आले आहे त्यास तीन वर्षांपूर्वीची नोटाबंदी व पूर्ण तयारी न करता घाईघाईने लागू केलेला वस्तू व सेवाकर (जीएसटी) याखेरीज पंतप्रधान कार्यालयात सत्तेचे नको तेवढे केंद्रीकरण होणे हेही एक प्रमुख कारण आहे, असे मत यंदाचा नोबेल पुरस्कार जिंकणारे अर्थतज्ज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे.

नोबेल मिळाल्यानंतर डॉ. बॅनर्जी या सप्ताहांतास प्रथमच सपत्नीक भारतात आले होते. ‘दि वायर’ या आॅनलाइन न्यूज पोर्टलसाठी करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ‘जीएसटी’ सारखी आमूलाग्र बदल घडविणारी नवी अप्रत्यक्ष करव्यवस्था लागू झाल्यावर अडचणी येणे स्वाभाविक होते व अन्य कोणते सरकार असते तरी ते या अडचणी याहून चांगल्या प्रकारे हाताळू शकले असते असेही नाही.

ते असेही म्हणाले की, कंपन्यांवरील प्राप्तिकराच्या दरात कपात केल्याने गुंतवणुकीस चालना मिळून विकासाला गती येईल, याची खात्री देता येणार नाही. त्यासाठी ज्यायोगे बाजारातील मागणी वाढेल अशा उपायांचीही जोड द्यावी लागेल. त्यासाठी व्यक्तिगत प्राप्तिकरात कपात करून लोकांच्या हाती जास्त पैसा राहिल असे पाहणे व प्रधानमंत्री किसान योजनेसारख्या योजनांव्दारे ग्रामीण अर्थव्यवस्थेत आणखी पैसा खळविणे हे अन्य उपाय आहेत.

सरकारने शहरी भागातील महागाईला आळा घालण्यासाठी शेतमालाच्या आधारभूत किंमती जाणीवपूर्वक कमी ठेवल्याने ग्रामीण भागातील मागणी कमी झाली व सरकारने पुरवठादार व कंत्राटदारांचे पैसे वेळेवर चुकते न केल्याने अनेक प्रकल्प रखडणे हेही मंदीचे एक कारण आहे, असेही त्यांनी विश्लेषण केले.

या दौऱ्यात डॉ. बॅनर्जी यांनी त्यांनी जेथे शिक्षण घेतले त्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठासही भेट दिली. तेथे बोलताना ते म्हणाले की, याच विद्यापीठात माझ्या सहाध्यायी असलेल्या निर्मला सीतारामन आज देशाच्या वित्तमंत्री आहेत, याचा नक्कीच अभिमान वाटतो. सीतारामन यांनी कंपन्यांचा प्राप्तिकर वाढविण्याचा योग्य निर्णय घेतला होता. पण नंतर दडपणाला बळी पडून त्यांनी यात कपात करण्याची चूक केली, असे मला वाटते.

भाजपच्या व्यक्तिगत टीकेने व्यथित

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व भाजपचे राष्ट्रीय चिटणीस राहुल सिन्हा यांच्यासारख्या भाजप नेत्यांनी नोबेल पुरस्कारावरून केलेल्या व्यक्तिगत टीकेने आपण व्यथित झालो, असे डॉ. बॅनर्जी म्हणाले.ते म्हणाले की, माझ्या सल्ल्याने काँग्रेसने आखलेली ‘न्याय’ योजना मतदारांनी नाकारली, असे भाजप म्हणते; पण त्यानिमित्ताने हा विचार लोकांपुढे गेला, याचे मला समाधान आहे. मी एक अर्थतज्ज्ञ म्हणून व्यावसायिक सल्ला दिला होता. तो काँग्रेसप्रमाणे इतरांनाही घेता आला असता.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदी