शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

वाहनांच्या हॉर्नमधून ऐकू येणार बासरी, पेटीचे सूर; केंद्र सरकार घेणार लवकरच निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 07:32 IST

केंद्र सरकार घेणार लवकरच निर्णय; कर्कश आवाजाने होते ध्वनिप्रदूषण

नवी दिल्ली : वाहनांच्या हॉर्नचा कर्कश्य आवाज बदलून त्याऐवजी भारतीय संगीत वाद्यांच्या आवाजाचा उपयोग करावा, असा आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी लवकरच देण्याची शक्यता आहे. कर्कश्य हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होते. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनेही हॉर्नचा सूर बदलणे आवश्यक आहे. त्यासंदर्भातील अध्यादेश लवकरच जारी करण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले की, देशात वायू व ध्वनिप्रदूषण वाढत आहे. कित्येक लोक आपल्या गाडीला मोठ्या आवाजाचे हॉर्न लावतात. ते हॉर्न विनाकारण वाजवत असतात. त्यामुळे गाडी चालविणाऱ्यांना व रस्त्यावरून चालणाऱ्यांनाही त्याचा त्रास होतो. अशा गोष्टीमुळे अपघातही होऊ शकतात. हे सर्व लक्षात घेऊन  कर्कश्य आवाजाचे हॉर्न बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यायचे ठरविले आहे.

तानपुरा, तबला, पेटी, बासरी अशा वाद्यांचे समधुर सूर हॉर्नमधून कानावर पडल्यानंतर कोणाच्या कानांना फार त्रास होणार नाही, ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण कमी होईल, असेही केंद्र सरकारचे मत आहे. वाहने भंगारात काढण्याच्या धोरणानंतर केंद्र सरकार पर्यावरणस्नेही वाहनांच्या वापराचा आग्रह करीत आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करण्याकरिताही सरकारच्या हालचाली सुरू आहेत.

जुनी वाहने भंगारात काढण्याचा निर्णय योग्यच

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, जुनी वाहने भंगारात काढण्याचा केंद्र सरकारचा निर्णय अतिशय योग्य आहे. जुनी वाहने ही नव्या वाहनांपेक्षा कितीतरी अधिक पट धूर वातावरणात सोडतात. त्यामुळे वायूप्रदूषणही वाढते.  ज्यांची आयुष्यमर्यादा संपली आहे अशीच वाहने भंगारात काढण्याचा आदेश याआधीच केंद्र सरकारने दिला आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAutomobileवाहन