शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
3
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
4
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
5
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
6
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
8
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
9
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
11
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
12
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
13
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
14
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
15
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
16
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
17
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
18
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
19
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

मध्य प्रदेश विधानसभेत आज शक्तिप्रदर्शन,सुप्रीम कोर्टाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 7:32 AM

माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान व भाजपच्या १० आमदारांच्या याचिकेवरील युक्तिवाद संपल्यावर सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड व न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

नवी दिल्ली  - काँग्रेस पक्षाच्या २२ आमदारांच्या राजीनाम्याने अस्थिरता निर्माण झालेल्या मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारने शुक्रवारी सायंकाळपर्यंत विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान व भाजपच्या १० आमदारांच्या याचिकेवरील युक्तिवाद संपल्यावर सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड व न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. पळवून नेऊन डांबलेल्या आमदारांना मुक्त केल्याखेरीज मतदान घेतले जाऊ नये, यासाठीची काँग्रेसची याचिका फेटाळली गेली.सविस्तर निकालपत्र लगेच देणे शक्य नाही व तोपर्यंत अस्थिरता लांबविली जाऊ शकत नाही, असे नमूद करून न्यायालयाचा आदेशात्मक भाग जाहीर केला. यात म्हटले आहे की, विधानसभेचे अधिवेशन २० मार्च रोजी भरवावे. त्यात विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या सरकारकडे बहुमत आहे का? हाच विषय असेल. या कामकाजाचे शक्यतो थेट प्रक्षेपण करावे.कमलनाथ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद बोलावली आहे. बहुमत सिद्ध करण्याजोगे संख्याबळ नसल्याने या वेळी ते राजीनाम्याची घोषणा करू शकतात, अशी चर्चा आहे.आमदारांना सुरक्षा द्याराजीनामे मंजूर न झालेल्या काँग्रेसच्या २२ आमदारांना आपले हक्क बजावता येतील याची हमी कर्नाटक व मध्य प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी घ्यावी. या आमदारांची मतदानासाठी हजर राहण्याची इच्छा असल्यास त्यांना पूर्ण सुरक्षा द्यावी. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस