शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण भारतात पुराचा कहर : बळींची संख्या शंभरावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 05:01 IST

दक्षिण भारतातील पूरबळींची संख्या शंभरावर गेली आहे. रविवारपर्यंत पूरबळींची संख्या केरळमध्ये ७२ व कर्नाटकमध्ये ३१ इतकी झाली.

बंगळुरू/कोची : दक्षिण भारतातील पूरबळींची संख्या शंभरावर गेली आहे. रविवारपर्यंत पूरबळींची संख्या केरळमध्ये ७२ व कर्नाटकमध्ये ३१ इतकी झाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड या आपल्या मतदारसंघाला भेट देऊन तेथील पूरग्रस्तांबरोबर संवाद साधला. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकातील पूरस्थितीची हवाई पाहाणी केली.आठवडाभराच्या मुसळधार पावसामुळे केरळमध्ये पूर आला आहे. वायनाड, कन्नूर, कासारगोड जिल्ह्यांमध्ये आता पावसाने जरा उसंत घेतली असली तरी तिथे दिलेला रेड अलर्टचा इशारा अद्यापही कायम आहे. केरळमध्ये गेल्या वर्षीही महापूर येऊन त्या राज्याचे प्रचंड नुकसान झाले होते. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, केरळमधील अडीच लाख पूरग्रस्तांनी १५५० निवारा शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे. राजकीय मतभेद विसरून नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मुसळधार पावसामुळे धावपट्टी पाण्याखाली गेल्याने बंद केलेला कोचीचा विमानतळ रविवार दुपारपासून हवाई वाहतुकीसाठी पुन्हा खुला झाला. अबुधाबीहून आलेले विमान तेथे उतरले. (वृत्तसंस्था)राहुल गांधींनी जाणून घेतल्या व्यथा

अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यासाठी वायनाडमधील बनसौरसागर धरणाचे दरवाजे शनिवारी उघडण्यात आले आहेत. राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये दाखल झाल्यानंतर तेथील निवारा शिबिरांना भेटी दिल्या.वायनाड, मलप्पुरम जिल्ह्यांमध्येही पूरामध्ये काही जणांचे बळी गेले आहेत. वायनाडमधील पूरग्रस्तांच्या व्यथा राहुल गांधी यांनी जाणून घेतल्या. आणखी काही दिवस आपला मुक्काम वायनाडमध्येच असल्याचे राहुल गांधी यांनी एका टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे.हंपीला पुराचा धोका : अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यासाठी तुंगभद्रा धरणाचे दरवाजे रविवारी सकाळी उघडण्यात आले असून त्यामुळे ऐतिहासिक महत्त्वाच्या हंपी शहरालाही पुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. धरणातून सोडलेले पाणी हंपी शहरात काही ठिकाणी शिरले आहे. तेथील पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.कर्नाटकात 17 जिल्ह्यांना तडाखा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून रविवारी बेळगाव जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आदी नेतेमंडळी होती.कर्नाटकातील १७ जिल्ह्यांतल्या ८० तालुक्यांना पुरासा तडाखा बसला असून ४ लाख लोकांना आपले घरदार सोडून दुसरीकडे स्थलांतरित व्हावे लागले आहे.कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड, उडुपी, उत्तर कन्नड, शिवमोगा, चिकमंगळुरू, कोडगू, हसन या जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीमुळे देण्यात आलेला रेड अलर्टचा इशारा उद्या, सोमवार सकाळपर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे.सकलेशपूर व सुब्रमण्य दरम्यानची रेल्वेसेवा दरड कोसळल्यामुळे विस्कळीत झाली आहे. बेळगावमध्येही मोठा पूर आला असून त्यात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी लष्कर, नौदल, एनडीआरएफच्या जवानांनी मदतकार्य हाती घेतले होते.

टॅग्स :floodपूरKarnatakकर्नाटकKeralaकेरळ