शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण भारतात पुराचा कहर : बळींची संख्या शंभरावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 05:01 IST

दक्षिण भारतातील पूरबळींची संख्या शंभरावर गेली आहे. रविवारपर्यंत पूरबळींची संख्या केरळमध्ये ७२ व कर्नाटकमध्ये ३१ इतकी झाली.

बंगळुरू/कोची : दक्षिण भारतातील पूरबळींची संख्या शंभरावर गेली आहे. रविवारपर्यंत पूरबळींची संख्या केरळमध्ये ७२ व कर्नाटकमध्ये ३१ इतकी झाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड या आपल्या मतदारसंघाला भेट देऊन तेथील पूरग्रस्तांबरोबर संवाद साधला. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकातील पूरस्थितीची हवाई पाहाणी केली.आठवडाभराच्या मुसळधार पावसामुळे केरळमध्ये पूर आला आहे. वायनाड, कन्नूर, कासारगोड जिल्ह्यांमध्ये आता पावसाने जरा उसंत घेतली असली तरी तिथे दिलेला रेड अलर्टचा इशारा अद्यापही कायम आहे. केरळमध्ये गेल्या वर्षीही महापूर येऊन त्या राज्याचे प्रचंड नुकसान झाले होते. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, केरळमधील अडीच लाख पूरग्रस्तांनी १५५० निवारा शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे. राजकीय मतभेद विसरून नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मुसळधार पावसामुळे धावपट्टी पाण्याखाली गेल्याने बंद केलेला कोचीचा विमानतळ रविवार दुपारपासून हवाई वाहतुकीसाठी पुन्हा खुला झाला. अबुधाबीहून आलेले विमान तेथे उतरले. (वृत्तसंस्था)राहुल गांधींनी जाणून घेतल्या व्यथा

अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यासाठी वायनाडमधील बनसौरसागर धरणाचे दरवाजे शनिवारी उघडण्यात आले आहेत. राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये दाखल झाल्यानंतर तेथील निवारा शिबिरांना भेटी दिल्या.वायनाड, मलप्पुरम जिल्ह्यांमध्येही पूरामध्ये काही जणांचे बळी गेले आहेत. वायनाडमधील पूरग्रस्तांच्या व्यथा राहुल गांधी यांनी जाणून घेतल्या. आणखी काही दिवस आपला मुक्काम वायनाडमध्येच असल्याचे राहुल गांधी यांनी एका टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे.हंपीला पुराचा धोका : अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यासाठी तुंगभद्रा धरणाचे दरवाजे रविवारी सकाळी उघडण्यात आले असून त्यामुळे ऐतिहासिक महत्त्वाच्या हंपी शहरालाही पुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. धरणातून सोडलेले पाणी हंपी शहरात काही ठिकाणी शिरले आहे. तेथील पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.कर्नाटकात 17 जिल्ह्यांना तडाखा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून रविवारी बेळगाव जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आदी नेतेमंडळी होती.कर्नाटकातील १७ जिल्ह्यांतल्या ८० तालुक्यांना पुरासा तडाखा बसला असून ४ लाख लोकांना आपले घरदार सोडून दुसरीकडे स्थलांतरित व्हावे लागले आहे.कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड, उडुपी, उत्तर कन्नड, शिवमोगा, चिकमंगळुरू, कोडगू, हसन या जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीमुळे देण्यात आलेला रेड अलर्टचा इशारा उद्या, सोमवार सकाळपर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे.सकलेशपूर व सुब्रमण्य दरम्यानची रेल्वेसेवा दरड कोसळल्यामुळे विस्कळीत झाली आहे. बेळगावमध्येही मोठा पूर आला असून त्यात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी लष्कर, नौदल, एनडीआरएफच्या जवानांनी मदतकार्य हाती घेतले होते.

टॅग्स :floodपूरKarnatakकर्नाटकKeralaकेरळ