शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
4
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
5
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
6
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
7
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
10
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
11
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
12
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
13
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
14
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
15
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
16
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
17
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
18
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
19
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
20
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 13:58 IST

जवाहर नवोदय विद्यालयाला अचानक आलेल्या पुराचा तडाखा बसला. संपूर्ण कॅम्पस पाण्याखाली गेला आणि तळमजल्यावरील वर्गखोल्या मोठ्या प्रमाणात पाण्याने भरल्या.

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमधून येणाऱ्या नद्यांना पूर आल्याने पंजाबच्या अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुदासपूर जिल्ह्यात एका जवाहर नवोदय विद्यालयाला याचा फटका बसला. संपूर्ण कॅम्पस पाण्याखाली गेला आणि तळमजल्यावरील वर्गखोल्या मोठ्या प्रमाणात पाण्याने भरल्या आहेत. हे नवोदय विद्यालय गुरुदासपूरपासून सुमारे १२ किमी अंतरावर असलेल्या डाबुरी गावात आहे. शाळेत ४०० विद्यार्थी आणि सुमारे ४० कर्मचारी अडकले आहेत.

ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली

ही शाळा गुरुदासपूर ते दोरंगळा या रस्त्यावर आहे. रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे आणि आजूबाजूचा परिसर पाण्याखाली गेला आहे. येथे पोहोचणे कठीण झाले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान दीनानगर विभागात जात असल्याने बचाव कार्यालाही विलंब होत आहे. गुरुदासपूर जिल्हा या विभागात येतो आणि सध्या अधिकारी त्यांच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. यामुळे बचाव कार्य सुरू करण्यास विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. ही शाळा देखील दीनानगर उपविभागात येते.

जवाहर नवोदय विद्यालय ही केंद्र सरकारच्या निधीतून चालवली जाणारी सरकारी शाळा आहे. गुरुदासपूरचे उपायुक्त त्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. या प्रकरणात प्रशासनाचा हलगर्जीपणा पाहून मुलांच्या पालकांमध्येही संताप दिसून येत आहे. एका पालकाने सांगितले की, जेव्हा पुरामुळे परिस्थिती बिकट होत होती, तेव्हा मुलांना लवकर का पाठवले नाही. जिल्हा प्रशासनाला तीन दिवसांपासून माहित आहे की पूर येणार आहे आणि परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.  प्रशासनाने संपूर्ण गुरुदासपूर जिल्ह्यातील सर्व शाळा तीन दिवसांसाठी बंद ठेवल्या आहेत, तर मग मुलांना येथून घरी का पाठवले नाही, असा सवाल त्यांनी केला.

१९८८ मध्ये असाच पूर आला होता

 जवाहर नवोदय विद्यालय ही निवासी शाळा आहे, यामुळे मुलांना घरी पाठवण्यात आले नाही.  शाळेच्या शेजारी एक नाला वाहतो. तो नाला गेल्या काही महिन्यांपासून साफ केलेला नाही. त्यामुळे पाणी वस्त्यांकडे वाहत असल्याचा आरोप करण्यात आला.  १९८८ मध्ये पंजाबमध्येही मोठा पूर आला होता. तो वर्षीच्या पुरापेक्षा यावेळी मोठा पूर आला असल्याचा दावा करण्यात येत आहे.

टॅग्स :Punjabपंजाब