शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 13:58 IST

जवाहर नवोदय विद्यालयाला अचानक आलेल्या पुराचा तडाखा बसला. संपूर्ण कॅम्पस पाण्याखाली गेला आणि तळमजल्यावरील वर्गखोल्या मोठ्या प्रमाणात पाण्याने भरल्या.

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमधून येणाऱ्या नद्यांना पूर आल्याने पंजाबच्या अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुदासपूर जिल्ह्यात एका जवाहर नवोदय विद्यालयाला याचा फटका बसला. संपूर्ण कॅम्पस पाण्याखाली गेला आणि तळमजल्यावरील वर्गखोल्या मोठ्या प्रमाणात पाण्याने भरल्या आहेत. हे नवोदय विद्यालय गुरुदासपूरपासून सुमारे १२ किमी अंतरावर असलेल्या डाबुरी गावात आहे. शाळेत ४०० विद्यार्थी आणि सुमारे ४० कर्मचारी अडकले आहेत.

ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली

ही शाळा गुरुदासपूर ते दोरंगळा या रस्त्यावर आहे. रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे आणि आजूबाजूचा परिसर पाण्याखाली गेला आहे. येथे पोहोचणे कठीण झाले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान दीनानगर विभागात जात असल्याने बचाव कार्यालाही विलंब होत आहे. गुरुदासपूर जिल्हा या विभागात येतो आणि सध्या अधिकारी त्यांच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. यामुळे बचाव कार्य सुरू करण्यास विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. ही शाळा देखील दीनानगर उपविभागात येते.

जवाहर नवोदय विद्यालय ही केंद्र सरकारच्या निधीतून चालवली जाणारी सरकारी शाळा आहे. गुरुदासपूरचे उपायुक्त त्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. या प्रकरणात प्रशासनाचा हलगर्जीपणा पाहून मुलांच्या पालकांमध्येही संताप दिसून येत आहे. एका पालकाने सांगितले की, जेव्हा पुरामुळे परिस्थिती बिकट होत होती, तेव्हा मुलांना लवकर का पाठवले नाही. जिल्हा प्रशासनाला तीन दिवसांपासून माहित आहे की पूर येणार आहे आणि परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.  प्रशासनाने संपूर्ण गुरुदासपूर जिल्ह्यातील सर्व शाळा तीन दिवसांसाठी बंद ठेवल्या आहेत, तर मग मुलांना येथून घरी का पाठवले नाही, असा सवाल त्यांनी केला.

१९८८ मध्ये असाच पूर आला होता

 जवाहर नवोदय विद्यालय ही निवासी शाळा आहे, यामुळे मुलांना घरी पाठवण्यात आले नाही.  शाळेच्या शेजारी एक नाला वाहतो. तो नाला गेल्या काही महिन्यांपासून साफ केलेला नाही. त्यामुळे पाणी वस्त्यांकडे वाहत असल्याचा आरोप करण्यात आला.  १९८८ मध्ये पंजाबमध्येही मोठा पूर आला होता. तो वर्षीच्या पुरापेक्षा यावेळी मोठा पूर आला असल्याचा दावा करण्यात येत आहे.

टॅग्स :Punjabपंजाब