शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

बंगळुरूमध्ये पुराने हाहाकार! ट्रॅक्टर, बुलडोझरवर बसून आयटी कर्मचारी ऑफिसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 09:07 IST

बंगळुरूमध्ये दाेन दिवसांपासून वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अनेक ठिकाणी वीज पुरवठा ठप्प आहे.

बंगळुरू : काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळघार पावसामुळे कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून, वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी आहे. त्यामुळे अनेकांनी चक्क ट्रॅक्टर आणि बुलडाेझरवर बसून कार्यालयाची वाट धरली. तर विजेच्या खांबाला स्पर्श झाल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बंगळुरूमध्येच घडली. तर हवामान खात्याने कर्नाटकसह आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

बंगळुरूमध्ये दाेन दिवसांपासून वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अनेक ठिकाणी वीज पुरवठा ठप्प आहे. तर बाेटींमधून अशा परिस्थितीत आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी भन्नाट शक्कल लढविली. ट्रॅक्टर ट्राॅलीमध्ये बसून अनेक कर्मचारी कार्यालयात जात आहेत. त्यासाठी ते प्रत्येकी ५० रुपये माेजत आहेत. तर काही जण चक्क बुलडाेझरवर बसून जलमय रस्त्यांवरून मार्ग काढताना दिसले. मात्र या पूरस्थितीमुळे आयटी कंपन्यांचे सुमारे २५० काेटी रुपयांचे नुकसान झाले आहे. (वृत्तसंस्था)

व्हाईटफील्ड भागात तरुणीचा मृत्यूव्हाईटफील्ड भागात अखिला नावाच्या तरुणीचा मृत्यू झाला. जलमय झालेल्या रस्त्यावर दुचाकी स्लीप झाली हाेती. त्यामुळे आधार घेण्यासाठी तिने विजेच्या खांबाचा आधार घेतला. मात्र, त्यात विद्युत प्रवाह असल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

केरळमध्ये दाेन जण गेले वाहूनकेरळमध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजधानी तिरुअनंतपूरमजवळ एका धबधब्यामध्ये अचानक आलेल्या पुरात दाेन पर्यटक वाहून गेले. त्यात एका लहान मुलाचाही समावेश आहे. कावेरी नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे किनाऱ्यालगतच्या गावांना इशारा दिला आहे. तिरुअनंतपूरम, पथ्थनपीथिटा, इडुक्की इत्यादी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

केवळ दोन विभागांमध्ये समस्या : मुख्यमंत्री बोम्मईकर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरूतील परिस्थितीसाठी यापूर्वीच्या काँग्रेस सरकारला दाेषी ठरविले. अतिवृष्टी आणि जलसाठे ओव्हरफ्लो भरल्यामुळे काही भागात पाणी भरले. केवळ दोन विभागांमध्येच अशी स्थिती असून चित्र मात्र पूर्ण शहर तुंबल्याचे रंगविणत येत असल्याचे बोम्मई म्हणाले.

‘अनअकॅडमी’च्या संस्थापकांनाही ट्रॅक्टरचा आधार -या महापुरात प्रसिद्ध ‘स्टार्टअप्स’चे संस्थापक किंवा सीईओंसाठी देखील ट्रॅक्टर मोठा आधार ठरला आहे. ‘अनअकॅडमी’चे संस्थापक गौरव मुंजाळ यांची सोसायटीही पाण्याखाली गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आणि पाळीव कुत्र्यालाही ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाचवावे लागले.

आलिशान कार सोडून लोक ट्रॅक्टरवर -परिस्थिती किती वाईट आहे, याचा अंदाज यावरूनच लावता येईल की, अतिश्रीमंताच्या सोसायटीतही लेक्सस, बेंटले, बीएमडब्ल्यू अशा आलिशान कार पाण्यात बुडलेल्या दिसत आहेत. तर, लोक जीव वाचवण्यासाठी फक्त जीवनावश्यक वस्तू ट्रॅक्टरवर ठेवून तेथून बाहेर पडत आहेत. कोट्यवधींच्या महागड्या कारही त्यांच्या कामी आल्या नाहीत, अखेर ट्रॅक्टरनेच तारले.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरBengaluruबेंगळूरKarnatakकर्नाटक