शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका
2
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
5
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
6
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
7
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
8
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
9
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
10
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
11
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
12
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
13
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
14
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
15
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
16
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
17
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
18
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
19
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
20
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...

बंगळुरूमध्ये पुराने हाहाकार! ट्रॅक्टर, बुलडोझरवर बसून आयटी कर्मचारी ऑफिसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 09:07 IST

बंगळुरूमध्ये दाेन दिवसांपासून वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अनेक ठिकाणी वीज पुरवठा ठप्प आहे.

बंगळुरू : काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळघार पावसामुळे कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून, वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी आहे. त्यामुळे अनेकांनी चक्क ट्रॅक्टर आणि बुलडाेझरवर बसून कार्यालयाची वाट धरली. तर विजेच्या खांबाला स्पर्श झाल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बंगळुरूमध्येच घडली. तर हवामान खात्याने कर्नाटकसह आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

बंगळुरूमध्ये दाेन दिवसांपासून वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अनेक ठिकाणी वीज पुरवठा ठप्प आहे. तर बाेटींमधून अशा परिस्थितीत आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी भन्नाट शक्कल लढविली. ट्रॅक्टर ट्राॅलीमध्ये बसून अनेक कर्मचारी कार्यालयात जात आहेत. त्यासाठी ते प्रत्येकी ५० रुपये माेजत आहेत. तर काही जण चक्क बुलडाेझरवर बसून जलमय रस्त्यांवरून मार्ग काढताना दिसले. मात्र या पूरस्थितीमुळे आयटी कंपन्यांचे सुमारे २५० काेटी रुपयांचे नुकसान झाले आहे. (वृत्तसंस्था)

व्हाईटफील्ड भागात तरुणीचा मृत्यूव्हाईटफील्ड भागात अखिला नावाच्या तरुणीचा मृत्यू झाला. जलमय झालेल्या रस्त्यावर दुचाकी स्लीप झाली हाेती. त्यामुळे आधार घेण्यासाठी तिने विजेच्या खांबाचा आधार घेतला. मात्र, त्यात विद्युत प्रवाह असल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

केरळमध्ये दाेन जण गेले वाहूनकेरळमध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजधानी तिरुअनंतपूरमजवळ एका धबधब्यामध्ये अचानक आलेल्या पुरात दाेन पर्यटक वाहून गेले. त्यात एका लहान मुलाचाही समावेश आहे. कावेरी नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे किनाऱ्यालगतच्या गावांना इशारा दिला आहे. तिरुअनंतपूरम, पथ्थनपीथिटा, इडुक्की इत्यादी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

केवळ दोन विभागांमध्ये समस्या : मुख्यमंत्री बोम्मईकर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरूतील परिस्थितीसाठी यापूर्वीच्या काँग्रेस सरकारला दाेषी ठरविले. अतिवृष्टी आणि जलसाठे ओव्हरफ्लो भरल्यामुळे काही भागात पाणी भरले. केवळ दोन विभागांमध्येच अशी स्थिती असून चित्र मात्र पूर्ण शहर तुंबल्याचे रंगविणत येत असल्याचे बोम्मई म्हणाले.

‘अनअकॅडमी’च्या संस्थापकांनाही ट्रॅक्टरचा आधार -या महापुरात प्रसिद्ध ‘स्टार्टअप्स’चे संस्थापक किंवा सीईओंसाठी देखील ट्रॅक्टर मोठा आधार ठरला आहे. ‘अनअकॅडमी’चे संस्थापक गौरव मुंजाळ यांची सोसायटीही पाण्याखाली गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आणि पाळीव कुत्र्यालाही ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाचवावे लागले.

आलिशान कार सोडून लोक ट्रॅक्टरवर -परिस्थिती किती वाईट आहे, याचा अंदाज यावरूनच लावता येईल की, अतिश्रीमंताच्या सोसायटीतही लेक्सस, बेंटले, बीएमडब्ल्यू अशा आलिशान कार पाण्यात बुडलेल्या दिसत आहेत. तर, लोक जीव वाचवण्यासाठी फक्त जीवनावश्यक वस्तू ट्रॅक्टरवर ठेवून तेथून बाहेर पडत आहेत. कोट्यवधींच्या महागड्या कारही त्यांच्या कामी आल्या नाहीत, अखेर ट्रॅक्टरनेच तारले.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरBengaluruबेंगळूरKarnatakकर्नाटक