शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

Assam Flood : पावसाचा हाहाकार! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; 27 जिल्ह्यांतील तब्बल 7 लाखांहून अधिक लोकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 13:06 IST

Assam Flood : राज्यातील 27 जिल्हे आणि जवळपास 7.18 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.

आसाममध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. गुरुवारी पूरस्थिती आणखी गंभीर झाली आणि यामध्ये आणखी एकाचा मृत्यू झाला. राज्यातील 27 जिल्हे आणि जवळपास 7.18 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दैनिक पूर अहवालानुसार, नागाव जिल्ह्यातील कामपूर महसूल क्षेत्रात बुडून एकाचा मृत्यू झाला. याशिवाय कामपूरमध्ये आणखी दोन जण बेपत्ता आहेत, असं त्यात म्हटलं आहे. यासह राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दहा झाली आहे, असं अहवालात म्हटलं आहे.

पुरामुळे राज्यात 7,17, 500 हून अधिक लोक बाधित झाल्याचं प्राधिकरणाने म्हटलं आहे. बजली, बक्सा, बारपेटा, विश्वनाथ, बोनगाईगाव, कछार, दरांग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगड, दिमा हसाओ, गोलपारा, हैलाकांडी, होजई, कामरूप, कामरूप मेट्रोपॉलिटन, कार्बी आंगलाँग वेस्ट, करीमगंज, कोकराझार, लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, नलबाडी, सोनितपूर आणि उदलगुरी जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे.

नगावमध्ये सर्वाधिक 3.31 लाख लोक बाधित झाले आहेत. त्यापाठोपाठ कछार (1.6 लाख) आणि होजाली (97,300) यांचा क्रमांक लागतो. बुधवारपर्यंत राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये पुरामुळे 6.62 लाख लोक बाधित झाले होते. प्राधिकरणाने सांगितलं की, सध्या 1790 गावं पाण्यात बुडाली असून संपूर्ण राज्यात 63,970.62 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं आहे. त्यात असे म्हटले आहे की, अधिकारी 14 जिल्ह्यांमध्ये 359 मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे चालवत आहेत. जिथे 80,298 लोकांना आश्रय दिला आहे. यामध्ये 12,855 मुलांचा समावेश आहे.

एका बुलेटिनमध्ये म्हटलं आहे की लष्कर, निमलष्करी दल, NDRF, SDRF, नागरी प्रशासन, प्रशिक्षित स्वयंसेवक, अग्निशमन, आपत्कालीन सेवा आणि स्थानिक लोकांनी 7,334 लोकांना विविध पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यासाठी बोटी आणि हेलिकॉप्टरचा वापर केला. अधिकाऱ्यांनी 7,077.56 क्विंटल तांदूळ, डाळी आणि मीठ, 6,020.90 लीटर मोहरीचे तेल, 2,218.28 क्विंटल चारा आणि इतर पूर मदत सामग्रीचे वाटप केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Assam Floodआसाम पूरAssamआसामRainपाऊस