शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गुजरातमध्ये पुराचा हाहाकार; मध्य प्रदेश, महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 19:06 IST

अहमदाबादच्या अनेक भागात सात फुटांवर पाणी भरले आहे. गुजरातच्या २३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

देशात पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. हवामान विभागाने मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातसह महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अशातच गुजरातमधील अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अहमदाबादमध्ये पहाटे तीन वाजल्यापासून पाऊस सुरु असून शहरातही पाणी भरले आहे. 

अहमदाबादच्या अनेक भागात सात फुटांवर पाणी भरले आहे. गुजरातच्या २३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर मध्य प्रदेशच्या नीचम, उज्जैन, मंदसौर, रतलामसह ८ जिल्ह्यांत पुढील २४ तासांत पूर येण्याचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानमध्ये ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि ५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

गुजरातमधील मोरबी येथे मुसळधार पावसामुळे धवना गावात तलाव भरून वाहू लागला होता. या ठिकाणी लोकांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली पाण्यात वाहून गेली, यामध्ये १७ जण वाहून गेले असून १० जणांना एनडीआरएफने वाचविले आहे, तर उर्वरितांचा शोध सुरु आहे. 

पाण्याची पातळी वाढल्यामुळे 72 जलाशयांना हाय अलर्ट तर 15 जलाशयांना नियमित सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अधिकाऱ्यांना सखल भागातील लोकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्याचे निर्देश दिले आहेत. अतिवृष्टीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये दक्षिण गुजरातमधील वलसाड, तापी, नवसारी, सुरत, नर्मदा आणि पंचमहाल यांचा समावेश आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर