शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

अरे देवा! माशांमुळे मोडले संसार, नवऱ्यांना सोडून माहेरी गेल्या बायका; तरुणांच्या लग्नाचे झाले वांदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 12:36 IST

माशांच्या त्रासाला वैतागून लग्न झालेल्या अनेक महिला या माहेरी राहायला गेल्या आहेत. अनेक दाम्पत्याचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. हरदोई जिल्ह्यातील काही गावात माशांमुळे लोक हैराण झालं आहेत. या ठिकाणी जवळपास 5 हजारांपेक्षा जास्त माशा आहेत. लोकांच्या आयुष्यावर याचा परिणाम होत असून येथे गावकऱ्याचं खाणंपिणं, रात्री झोपणंही अवघड झालं आहे. घरांच्या छतांवरही माशाच माशा आहे. माशांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी तक्रारी दिल्या. आंदोलनं केली. पण आतापर्यंत कोणीच दखल घेतली नाही. 

स्थानिक प्रशासन प्रदूषण विभागाची जबाबदारी असल्याचं सांगून आपले हात वर करत आहे. माशांच्या त्रासाला वैतागून लग्न झालेल्या अनेक महिला या माहेरी राहायला गेल्या आहेत. अनेक दाम्पत्याचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सागवान पोल्ट्री फार्मच्या निर्मितीनंतर ही समस्या उद्भवत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. अहिरोरीचील कुईया गावात 2014 साली केंद्र सरकारच्या वित्त पोषित कुक्कुट योजनेअंतर्गत सागवान पोल्ट्री फार्मची स्थापना झाली. 2017 सालापासून इथं उत्पादन सुरू झालं. 

सध्या दर दिवशी दीड लाख कोंबड्यांच्या अंड्यांचं उत्पादन होतं. पोल्ट्री फार्मची क्षमता वाढली तशी ग्रामस्थांची समस्या वाढली. पोल्ट्री फार्मपासून 300 मीटर दूर बढ़ईनपुरवा गावातील ग्रामस्थ माशांना वैतागले आहेत. या गावातील ग्रामस्थ श्रवण कुमार वर्मा यांच्या नेतृत्वात ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. श्रवण कुमार वर्मा म्हणाले, बढ़ईनपुरवा, डही, झाला पुरवा, नया गाव, देवरिया आणि एकघरा गावात माशांचा सर्वात जास्त त्रास आहे. गेल्या वर्षी गावात 7 लग्न झाली. त्यापैकी 4 तरुणी आणि 3 तरुण आहेत. यावर्षी एकही लग्न झालं नाही. ना कुणाच्या लग्नाची बोलणी सुरू आहे. 

माशांच्या त्रासामुळे कोणीच आपली मुलगी या गावात द्यायला तयार नाही. पोल्ट्री फार्मचे मालक दलवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी फार्म सुरू केलं तेव्हा प्रदूषण विभागाची एनओसी घेतली होती. लोकवस्तीपासून दूर पोल्ट्री फार्म तयार केलं. पण त्यानंतर काही लोकांनी पोल्ट्री फार्मजवळ आपली घरं बांधली. माशांना कंट्रोल करण्याची सर्व व्यवस्था आहे. कित्येक वेळा तपासणीही झाली, त्यात काहीच कमतरता दिसून आली नाही. माशांमुळे संसार उद्ध्वस्त होत नाही आहेत. याची कारणं दुसरी असावीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :marriageलग्न