शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
4
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
5
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
6
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
7
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
8
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
9
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
10
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
11
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
12
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
13
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
14
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
15
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
16
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
17
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
18
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
19
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
20
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! माशांमुळे मोडले संसार, नवऱ्यांना सोडून माहेरी गेल्या बायका; तरुणांच्या लग्नाचे झाले वांदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 12:36 IST

माशांच्या त्रासाला वैतागून लग्न झालेल्या अनेक महिला या माहेरी राहायला गेल्या आहेत. अनेक दाम्पत्याचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. हरदोई जिल्ह्यातील काही गावात माशांमुळे लोक हैराण झालं आहेत. या ठिकाणी जवळपास 5 हजारांपेक्षा जास्त माशा आहेत. लोकांच्या आयुष्यावर याचा परिणाम होत असून येथे गावकऱ्याचं खाणंपिणं, रात्री झोपणंही अवघड झालं आहे. घरांच्या छतांवरही माशाच माशा आहे. माशांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी तक्रारी दिल्या. आंदोलनं केली. पण आतापर्यंत कोणीच दखल घेतली नाही. 

स्थानिक प्रशासन प्रदूषण विभागाची जबाबदारी असल्याचं सांगून आपले हात वर करत आहे. माशांच्या त्रासाला वैतागून लग्न झालेल्या अनेक महिला या माहेरी राहायला गेल्या आहेत. अनेक दाम्पत्याचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सागवान पोल्ट्री फार्मच्या निर्मितीनंतर ही समस्या उद्भवत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. अहिरोरीचील कुईया गावात 2014 साली केंद्र सरकारच्या वित्त पोषित कुक्कुट योजनेअंतर्गत सागवान पोल्ट्री फार्मची स्थापना झाली. 2017 सालापासून इथं उत्पादन सुरू झालं. 

सध्या दर दिवशी दीड लाख कोंबड्यांच्या अंड्यांचं उत्पादन होतं. पोल्ट्री फार्मची क्षमता वाढली तशी ग्रामस्थांची समस्या वाढली. पोल्ट्री फार्मपासून 300 मीटर दूर बढ़ईनपुरवा गावातील ग्रामस्थ माशांना वैतागले आहेत. या गावातील ग्रामस्थ श्रवण कुमार वर्मा यांच्या नेतृत्वात ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. श्रवण कुमार वर्मा म्हणाले, बढ़ईनपुरवा, डही, झाला पुरवा, नया गाव, देवरिया आणि एकघरा गावात माशांचा सर्वात जास्त त्रास आहे. गेल्या वर्षी गावात 7 लग्न झाली. त्यापैकी 4 तरुणी आणि 3 तरुण आहेत. यावर्षी एकही लग्न झालं नाही. ना कुणाच्या लग्नाची बोलणी सुरू आहे. 

माशांच्या त्रासामुळे कोणीच आपली मुलगी या गावात द्यायला तयार नाही. पोल्ट्री फार्मचे मालक दलवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी फार्म सुरू केलं तेव्हा प्रदूषण विभागाची एनओसी घेतली होती. लोकवस्तीपासून दूर पोल्ट्री फार्म तयार केलं. पण त्यानंतर काही लोकांनी पोल्ट्री फार्मजवळ आपली घरं बांधली. माशांना कंट्रोल करण्याची सर्व व्यवस्था आहे. कित्येक वेळा तपासणीही झाली, त्यात काहीच कमतरता दिसून आली नाही. माशांमुळे संसार उद्ध्वस्त होत नाही आहेत. याची कारणं दुसरी असावीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :marriageलग्न