शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

#Flashback2017: 2017 मध्ये घडलेल्या मोठ्या दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 16:39 IST

जाणून घेऊया 2017मधील मोठ्या दुर्घटनांबद्दल. 

मुंबई- 2017 चा निरोप घेण्यासाठी सगळे सज्ज झाले आहेत. या वर्षातील अनेक गोड आठवणी सोबत घेऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मात्र काही गोड आठवणींसोबत कटू आठवणीदेखील आहेत ज्या विसरता येणं शक्य नाही. 2017 या वर्षात अनेक मोठ्या दुर्घटना घडल्या. या दुर्घटनांमध्ये अनेक निष्पापांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. यावरुन अनेक आरोप - प्रत्यारोपही झाले. जाणून घेऊया अशाच काही 2017मधील मोठ्या दुर्घटनांबद्दल. 

गोरखपूरमधील हॉस्पिटलमध्ये नवजात अर्भकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये असलेल्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेजमध्ये जवळपास 1 हजारपेक्षा जास्त नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्याच्या कालावधीत या मुलांचा मृत्यू झाला. गोरखपूरमधील या धक्कादायक घटनेने सगळ्यांचंच लक्ष वेधलं होतं. तसंच यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले. सप्टेंबर महिन्यात लहान मुलांचा मृत्यू होणं ही सामान्य बाब असल्याचं धक्कादायक वक्तव्य उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी केल्याने सगळीकडून संताप व्यक्त केला गेला. 

एनडीपीएल बॉयलर स्फोट

उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथील एनटीपीसीच्या उंचाहार औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात 2 नोव्हेंबर रोजी बॉयलरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये 32 जणांचा मृत्यू झाला.  बॉयलरचा स्टीम पाइपमध्ये ब्लॉकेज असल्याने ही दुर्घटना घडली. ५०० मॅगावॅटच्या वीज निर्मिती केंद्रात हा स्फोट झाला होता. यामध्ये अनेक कामगार जखमीही झाले होते. माध्यमांमध्ये हा मुद्दा उचलून धरल्यावर घटनेची चौकशी करण्यात आली. 

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी

29 सप्टेंबर 2017 (शुक्रवार) हा दिवस रेल्वे प्रवाशांसाठी खरोखरचा ब्लॅकफ्रायडे ठरला. पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकात अफवा पसरून तुफान चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू आला तर अनेक जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. यावरून अनेक वादविवाद झाले अजूनही सुरूच आहेत. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने 5 लाखांची मदत जाहीर केली. प्रवाशांचा उद्रेक, राजकीय मोर्चे यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं अशी चर्चा सुरू झाली. आता एल्फिन्स्टन स्थानकावरील पूल लष्कराकडून बांधला जातो आहे. 

हिराखंड ट्रेन अपघात

22 जानेवारी रोजी आंध्रप्रदेशमध्ये हिराखंड ट्रेनचे 9 डबे रूळावरून घसरून अपघात झाला. या अपघातात 39 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 36 प्रवासी जखमी झाले. हिराखंड एक्स्प्रेस जगदाळपूरहून भुवनेश्वरला जात असताना हा भीषण अपघात झाला होता. 

उत्कल ट्रेन अपघात

18 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशच्या मुझ्झफरनगरमध्ये पुरी-हरिद्वार-कलिंगा एक्स्प्रेसचे 14 डबे रूळावरून घसरून अपघात झाला. या अपघातात 23 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 40 जण गंभीर जखमी झाले. अपघातातील मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केली. तर केंद्रीय रेल्वेमंत्रालयाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी साडेतीन लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली. 

टॅग्स :Flashback 2017फ्लॅशबॅक 2017Accidentअपघात