शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात 8 जवान शहीद; तीन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 20:25 IST

दक्षिण काश्मीरमधील पुलवामाध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एकुण आठ जवान शहीद झाल्याची माहिती मिळते आहे.

ठळक मुद्दे दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील पोलीस लाईनवर शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला.या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले आहेत.

श्रीनगर, दि. 26- दक्षिण काश्मीरमधील पुलवामाध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एकुण आठ जवान शहीद झाल्याची माहिती मिळते आहे.  यामधील ४ जण जम्मू काश्मीर पोलीस दलातील असून ४ जण सीआरपीएफचे आहेत. तर पाच जवान जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे.  पहाटेच्या सुमारास काही दहशतवाद्यांनी जिल्हा पोलीस वसाहतीवर हल्ला केला. यानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांकडून ऑपरेशन सुरु झालं. यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरू असल्याची माहिती मिळते आहे.

दहशतवादी जिल्हा पोलीस वसाहतीमध्ये लपून बसल्यावर सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन सुरु करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. यामध्ये सुरक्षा दलाचे एकूण ८ दहशतवादी जखमी झाले. ‘इमारतीच्या आतून दोन दहशतवादी गोळीबार करत आहेत,’ अशी माहिती दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पोलिसांकडून देण्यात आली. यानंतर पोलिसांच्या कुटुंबीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.

लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस लाईमधील सगळ्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. लेफ्टनंट जनरल जे.एस संधू यांच्या माहितीनुसार, पोलीस लाईनमध्ये असणाऱ्या सगळ्या कुटुंबांना बाहेर काढण्यात आलं आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरू आहे. 

भरती होणा-यांपेक्षा ठार होणा-या दहशतवाद्यांची संख्या जास्तजम्मू काश्मीरमध्ये गुप्तचर यंत्रणांकडून मिळत असलेल्या ठोस माहितीच्या आधारे दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत दहशतवादाचं कंबरडं मोडण्यात यश मिळालं आहे. परिस्थिती तर अशी झाली आहे की, या वर्षात जितके दहशतवादी भरती झालेले नाहीत त्यापेक्षा जास्त दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जम्मू काश्मीरात एकूण 71 दहशतवाद्यांची भरती करण्यात आली होती. मात्र लष्कराने कारवाई करत एकूण 132 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. यावर्षी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून 78 दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. गतवर्षी 2016 मध्ये हा आकडा एकूण 123 होता. दहशतवाद्यांची ही आकडेवारी पाहता काश्मीर खो-यातील दहशतवाद्यांच्या घुसखोरीचं प्रमाणही कमी झाल्याचंच दिसत आहे. यावर्षी लष्कराने कारवाई करत ज्या 132 दहशतवाद्यांना ठार केलं, त्यामधील 74 विदेशी तर 58 स्थानिक दहशतवादी होते. यामधील 14 लष्कर-ए-तोयबा, हिजबूल मुजाहिद्दीन आणि अल-बद्रचे टॉप कमांडर होते. राज्य पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने केलेल्या संयुक्त कारवायांमध्ये मोठं यश हाती लागत असल्याचं दिसत आहे.  

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू काश्मिर