शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

उत्तर प्रदेशमध्ये थंडीच्या लाटेनं पाच जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 21:18 IST

लखनऊ- उत्तर प्रदेशमधल्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात शीतलहरी पसरल्या आहेत. या कडाक्याच्या थंडीमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

लखनऊ- उत्तर प्रदेशमधल्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात शीतलहरी पसरल्या आहेत. या कडाक्याच्या थंडीमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. थंड वा-यांमुळे तापमान कमी होत असून, लोकांना सर्दी-ताप सारख्या आजारांनी ग्रासले आहेत. गेल्या 24 तासांत बदायूमध्ये थंडी वाजून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे, तर आझमगडमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.उत्तर प्रदेशमधल्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात तापमान खालावत चाललं आहे. बरेली, गोरखपूर, मुरादाबादेत सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात थंडीची लाट कायम राहणार आहे. या भागात पुढील दोन ते तीन दिवस धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. उत्तर प्रदेशमधल्या शीत लहरींमुळे शाळा 7 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर 8 जानेवारीला सकाळी 10 वाजता शाळा पुन्हा सुरळीत सुरू होणार आहेत. तर महाराष्ट्रातही जोरदार थंडीची लाट पसरली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रही चांगलाच गारठला आहे. मुंबईकरांनाही सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे. रविवारी निच्चांकी तापमान गोदाकाठी नाशिकला ९़५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.गेले काही दिवस थंडी, उकाडा, ढगाळ हवामान असा सर्व ऋतुचा अनुभव एकाच दिवसात मिळाल्यानंतर, आता थंडीचा कडाका पुन्हा वाढू लागला आहे. राज्यात विदर्भातील बहुतांश ठिकाणचे किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढला असून, खान्देशही चांगलाच गारठला आहे. नाशिकच्या किमान तपमानातही पुन्हा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली असून, पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. पुणे शहरातील किमान तापमानही घटते आहे. शनिवारी या हंगामातील १०़१ इतके किमान तापमान होते. त्यात रविवारी किंचित वाढ होऊन ते १०.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे नववर्षांच्या सेलिब्रेशनला गुलाबी थंडीची साथ मिळणार आहे.काश्मीर हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, उत्तर राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश आणि कच्छ या भागात थंडीची लाट जाणवत आहे. काश्मीर खो-यात श्रीनगरमध्ये उणे २.१ इतके किमान तपमान नोंदविले गेले. पश्चिम राजस्थानमधील चुरु येथे ४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़. बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब येथे दाट धुक्यामुळे दृश्यमानता २५ मीटरपर्यंत कमी झाली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश