शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशमध्ये थंडीच्या लाटेनं पाच जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 21:18 IST

लखनऊ- उत्तर प्रदेशमधल्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात शीतलहरी पसरल्या आहेत. या कडाक्याच्या थंडीमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

लखनऊ- उत्तर प्रदेशमधल्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात शीतलहरी पसरल्या आहेत. या कडाक्याच्या थंडीमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. थंड वा-यांमुळे तापमान कमी होत असून, लोकांना सर्दी-ताप सारख्या आजारांनी ग्रासले आहेत. गेल्या 24 तासांत बदायूमध्ये थंडी वाजून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे, तर आझमगडमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.उत्तर प्रदेशमधल्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात तापमान खालावत चाललं आहे. बरेली, गोरखपूर, मुरादाबादेत सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात थंडीची लाट कायम राहणार आहे. या भागात पुढील दोन ते तीन दिवस धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. उत्तर प्रदेशमधल्या शीत लहरींमुळे शाळा 7 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर 8 जानेवारीला सकाळी 10 वाजता शाळा पुन्हा सुरळीत सुरू होणार आहेत. तर महाराष्ट्रातही जोरदार थंडीची लाट पसरली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रही चांगलाच गारठला आहे. मुंबईकरांनाही सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे. रविवारी निच्चांकी तापमान गोदाकाठी नाशिकला ९़५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.गेले काही दिवस थंडी, उकाडा, ढगाळ हवामान असा सर्व ऋतुचा अनुभव एकाच दिवसात मिळाल्यानंतर, आता थंडीचा कडाका पुन्हा वाढू लागला आहे. राज्यात विदर्भातील बहुतांश ठिकाणचे किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढला असून, खान्देशही चांगलाच गारठला आहे. नाशिकच्या किमान तपमानातही पुन्हा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली असून, पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. पुणे शहरातील किमान तापमानही घटते आहे. शनिवारी या हंगामातील १०़१ इतके किमान तापमान होते. त्यात रविवारी किंचित वाढ होऊन ते १०.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे नववर्षांच्या सेलिब्रेशनला गुलाबी थंडीची साथ मिळणार आहे.काश्मीर हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, उत्तर राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश आणि कच्छ या भागात थंडीची लाट जाणवत आहे. काश्मीर खो-यात श्रीनगरमध्ये उणे २.१ इतके किमान तपमान नोंदविले गेले. पश्चिम राजस्थानमधील चुरु येथे ४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़. बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब येथे दाट धुक्यामुळे दृश्यमानता २५ मीटरपर्यंत कमी झाली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश