शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आंध्र प्रदेशमध्ये पाच उपमुख्यमंत्री; प्रत्येक समाजाला देणार प्रतिनिधित्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 02:07 IST

मागास जातींना प्राधान्य; मंत्रिमंडळात अडीच वर्षांनी फेरबदल

हैदराबाद : आंध्रप्रदेशमध्ये जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर कॉँग्रेस सरकारने ५ उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास, अल्पसंख्याक व कापू समुदायातून (कृषक समाज) प्रत्येकी एक-एक उपमुख्यमंत्री नियुक्त केला जाईल.

२५ जणांचे भरगच्च कॅबिनेट मंत्रीमंडळही असणार आहे. या निर्णयामुळे रेड्डी नवा उच्चांक प्रस्थापित करतील. मुख्यमंत्र्याच्या मते, सत्तेमध्ये सर्व जातींचे संतुलन राखण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे. वायएसआर कॉँग्रेसचे आमदार एम.एम. शायक म्हणाले की, आम्ही या निर्णयामुळे प्रसन्न आहोत. आंध्र प्रदेश मध्ये ५ उपमुख्यमंत्री असतील. या निर्णयामुळे हे सिध्द होईल की, रेड्डी आतापर्यंतच्या देशाच्या इतिहासातील सर्वात चांगले मुख्यमंत्री असतील.

रेड्डी जमातीचा मंत्रिमंडळात सिंहाचा वाटा असेल, अशी अटकळ होती. मात्र ताज्या निर्णयामुळे क्रांतीकारक पाऊल पडले असून संबंधित जातीजमातींमध्ये खुषीची लहर पसरली आहे.

चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारमध्ये यापूर्वी कापुसमुदायाचा आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील एका आमदारास उपमुख्यमंत्रीपदी संधी देण्यात आली होती. 

दुर्बल घटकांना प्राधान्यया राज्यात विधानसभेच्या १७५ पैकी १५१ जागांवर वायएसआर कॉँग्रेसने शानदार विजय मिळविला आहे. शनिवारी एका समारंभात मंत्रिमंडळाची स्थापना केली जाईल. वायएसआर कॉँग्रेसच्या आमदारांची बैठक शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झाली. त्यावेळी त्यांनी पाच उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला.

मंत्रिमंडळातही प्रामुख्याने दुर्बल घटकातील लोकप्रतिनिधींचा समावेश असेल, असे त्यांनी सांगितले. रेड्डी म्हणाले की,सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर मंत्रिमंडळात अडीच वर्षांनी फेरबदल केले जातील.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश