वनविभागाने मागविले पाच पिंजरे आजपासून जनजागृती मोहीम राबविणार :
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:31+5:302015-08-26T23:32:31+5:30
जळगाव- बिबट्या सारख्या वन्यजीवांना कै द करणारे पाच पिंजरे वन विभागाकडून मागविण्यात आले आहेत़ पूर्वतयारी म्हणून पिंजरे मागविण्यात आले आहेत़ वरिष्ठ अधिकार्यांच्या परवानगीशिवाय त्यांचा वापर केला जाणार नसल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे़

वनविभागाने मागविले पाच पिंजरे आजपासून जनजागृती मोहीम राबविणार :
ज गाव- बिबट्या सारख्या वन्यजीवांना कै द करणारे पाच पिंजरे वन विभागाकडून मागविण्यात आले आहेत़ पूर्वतयारी म्हणून पिंजरे मागविण्यात आले आहेत़ वरिष्ठ अधिकार्यांच्या परवानगीशिवाय त्यांचा वापर केला जाणार नसल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे़ गेल्या काही दिवसांपासून शिरसोली आणि हिंगळे शिवारात बिट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे़ यामुळे नागरिकांच्या मनात अनैक गैरसमज निर्माण झाले आहेत़ शेतकर्यांमध्य ेभीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ यापार्श्वभूमिवर पूर्व तयारी म्हणून वन विभागाकडून मंगळवारी ५ पिंजरे मागविण्यात आले आहेत़ जळगाव वन विभागाचे सहायक वन संरक्षक डी़आऱ पाटील यांनी ही माहिती दिली़ इन्फोआजपासून जनजागृतीबिबट आणि वाघ यासारख्या वन्यजीवांपासून आपला बचाव कसा करावा़ वन्यजीवांची मानसिकता कशी ओळखावी़ त्यांचा अधिवास कसा ओळखावा, याबाबत वन विभागाकडून वनक्षेत्र लगतच्या गावांमध्ये गुरुवारपासून जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे़ या मोहिमेंतर्गत विविध ठिकाणी कार्यशाळा, शिबिरे घेतली जातील़ तसेच माहितीपत्रके वाटली जाणार आहेत़ पिंजरे लावणे अशक्यवन विभागाच्या नियमानुसार आणि सध्यस्थिती पाहता बिबट्याला कैद करण्यासाठी पिंजरे लावणे अशक्य असल्याचे वन विभागाच्या एका अधिकार्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले़ तशी परिस्थिती निर्माण झाल्यास वरिष्ठांच्या परवानगीने पिंजरे लावले जातील़ जैन हिल्स मध्ये दिसलेला बिबट्या हा पौढ नाही़ दोन ते अडीच वर्षाचे ते पिल्लू आहे़ त्यामुळे खुलेआमपणे तो परिसरात भटकत असून त्यापासून कोणालाही भीती नसल्याचेदेखील त्या अधिकार्याने सांगितले़प्रत्येक १० कि़मी़ बिबट्याच वावरजिल्ाची भौगोलिक स्थिती पाहता १० ते १२ कि़मी़ अंतरावर बिबट्याचा वावर आहे़ वनक्षेत्रापर्यंत मानवी वस्ती येऊन ठेपलेली आहे़ अन्नाच्या शोधात बिबट्यासारखे वन्यजीव गावात येतात़ मनुष्य आणि वन्यजीव संघर्ष भविष्यात वाढत जाणारा आहे़ त्यांच्यासोबत राहण्याचे मानवाला शिकावे लागेल़ त्यांचा अधिवास आपल्याला मान्य केला पाहिजे, असे वन विभागाच्या एका अधिकार्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले़नागरिकांनी धीर धरवाबिबट्या मानवी वस्तीत अन्नाच्या शोधात येतो़ तो माणसांवर एकाकी हल्ला चढवत नाही़ त्याचा वावर नैसर्गिक आहे़ नागरिकांनी धीर धरवा़ काही समस्या असल्यास वन विभागशी संपर्क साधावा़ दक्ष रहावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे़