नदीत वाहून गेलेल्या विद्याथ्र्यापैकी पाच जणांचे मृतदेह सापडले

By Admin | Updated: June 10, 2014 00:21 IST2014-06-10T00:21:53+5:302014-06-10T00:21:53+5:30

24 विद्याथ्र्यापैकी पाच जणांचे मृतदेह सोमवारी बाहेर काढण्यात आल़े यात तीन मुले व दोन मुलींचा समावेश आहे. अन्य 21 जण अद्यापही बेपत्ता आहेत.

Five bodies of five students were found in the river | नदीत वाहून गेलेल्या विद्याथ्र्यापैकी पाच जणांचे मृतदेह सापडले

नदीत वाहून गेलेल्या विद्याथ्र्यापैकी पाच जणांचे मृतदेह सापडले

>मंडी : बियास नदीच्या काठावर छायाचित्रे टिपण्याचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा लोंढा आल्याने वाहून गेलेल्या हैदराबाद अभियांत्रिकी महाविद्यालयातील 24 विद्याथ्र्यापैकी पाच जणांचे मृतदेह सोमवारी बाहेर काढण्यात आल़े यात तीन मुले व दोन मुलींचा समावेश आहे. अन्य 21 जण अद्यापही बेपत्ता आहेत. 
 दरम्यान हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांनी या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले असून याप्रकरणी लार्जीजल विद्युत प्रकल्पाचे दोन वरिष्ठ अभियंते तसेच एका फिटरला निलंबित करण्यात आले आहे. रविवारी संध्याकाळी मंडीपासून 4क् कि.मी. अंतरावर मनाली-किरतपूर राष्ट्रीय महामार्गावर बियास नदीच्या काठावर छायाचित्रे टिपण्याचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा लोंढा आल्याने किमान 24 विद्यार्थी व एक टूर ऑपरेटर असे 25 जण वाहून गेले होत़े लार्जी येथील जलविद्युत प्रकल्पातून अचानक पाणी सोडण्यात आल्याने ही दुर्घटना घडली होती़ वाहून गेलेल्यांत 18 विद्यार्थी, 6 विद्यार्थिनींसह एका टूर ऑपरेटरचा समावेश आहे. पोलीस, मच्छीमारांच्या मदतीने शोधकार्य सुरू आह़े 
राष्ट्रपती, सोनिया गांधींना दु:ख
बियास नदीत वाहून गेलेल्या 24 विद्याथ्र्याच्या मृत्यूवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसेच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले   आह़े  (वृत्तसंस्था)
 
अलार्मचा दावा खोडला
4लार्जी जलविद्युत प्रकल्पाच्या अधिका:यांनी नदीत पाणी सोडण्यापूर्वी अलार्म (हूटर) वाजवला होता; पण विद्याथ्र्यानी त्याकडे दुर्लक्ष केले, असे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह म्हणाल़े तथापि या दुर्घटनेतून बचावलेल्या एकाने अलार्म वाजलाच नसल्याचे म्हटले आह़े 
 
पालकांचा संतप्त आक्रोश
-या विद्याथ्र्याना रात्रीच्या वेळी नदीच्या किना:यावर का नेले, असा प्रश्न संतप्त पालकांकडून विचारला जातो आहे. याविषयी आम्हाला कोणीच का कळविले नाही, असे म्हणत अनेक पालकांनी आक्रोश केला. या पालकांच्या विमान वाहतुकीचा सर्व खर्च राज्य सरकार करेल, असे तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
स्मृती इराणींची घटनास्थळाला भेट 
-केंद्रीय मनुष्यबळविकासमंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी घटनास्थळाचा दौरा केला़ विद्यार्थी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तेथेही त्यांनी भेट दिली. बचाव व मदत कार्यासाठी सवरेतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली़   

Web Title: Five bodies of five students were found in the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.