शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

...तर ईशान्य भारतात फक्त एका राज्यात राहिल काँग्रेसचे सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 13:40 IST

उत्तरेपाठोपाठ ईशान्य भारतातही भाजपाचा मोठा विस्तार होण्याचे संकेत एक्झिट पोलने दिले आहेत. या दोन्ही राज्यात अन्य पक्षांच्या मदतीने भाजपा सत्तेत येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देत्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यात भाजपा आघाडीला सत्ता मिळण्याचा अंदाज एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आला आहे. तीनपैकी दोन एक्झिट पोल्सनी त्रिपुरामध्ये भाजपा-आयपीएफटी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

नवी दिल्ली - त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांमध्ये काल  विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडल्यानंतर संध्याकाळी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले. उत्तरेपाठोपाठ ईशान्य भारतातही भाजपाचा मोठा विस्तार होण्याचे संकेत या एक्झिट पोलने दिले आहेत. त्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यात भाजपा आघाडीला सत्ता मिळण्याचा अंदाज एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आला आहे. मेघालयमध्ये भाजपाला संधी नसली तरी तिथे काँग्रेसचे सरकार येणार नाही, ही भाजपासाठी जमेची बाजू आहे. 

मेघालयमध्ये त्रिशंकू स्थिती राहू शकते. माजी लोकसभा अध्यक्ष पी.ए.संगमा यांनी स्थापन केलेला एनपीपी सर्वात मोठा पक्ष ठरु शकतो. त्रिपुरा, नागालँड या दोन राज्यांच्या विधानसभेत सध्या भाजपाची ताकत नगण्य आहे. या दोन्ही राज्यात अन्य पक्षांच्या मदतीने भाजपा सत्तेत येण्याची शक्यता आहे. त्रिपुरामध्ये भाजपा डाव्यांचे संस्थान खालसा करण्याची शक्यता आहे. मागच्या 25 वर्षांपासून त्रिपुरामध्ये डाव्यांची सत्ता आहे.  

तीनपैकी दोन एक्झिट पोल्सनी त्रिपुरामध्ये भाजपा-आयपीएफटी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तिसऱ्या एक्झिट पोलने अटीतटीचा सामना होईल असे म्हटले आहे.  नागालँडमध्ये भाजपा माजी मुख्यमंत्री  नेफ्यू रियो यांच्या एनडीपीपी पक्षाबरोबर आघाडी करुन निवडणूक लढवत आहे.

नागालँडमध्ये काँग्रेसला स्वत:चे अस्तित्व दाखवता आलेले नाही. सध्या इथे एनपीएफचे सरकार आहे. एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार निकाल लागले तर पहिल्यांदाच संपूर्ण ईशान्य भारतात फक्त मिझोराम या एका राज्यात काँग्रेसचे सरकार राहिल.                                                     

टॅग्स :congressकाँग्रेसnorth eastईशान्य भारत