शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आधी ठाकरे, आता गांधी; विरोधी पक्षाच्या राजकारणात शरद पवारच केंद्रस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 23:13 IST

देशातील मोदी सरकारला प्रखर विरोध करण्यासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे, अशी भूमिका सर्वांनी घेतली आहे

नवी दिल्ली - राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीची मूठ बांधण्यात शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळेच, शरद पवार यांच्या नेृत्त्वात महाविकास आघाडी सद्यातरी भक्कम आहे. त्यातच, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. ठाकरे स्वत: पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी पोहचले होते. या भेटीची सर्वत्र चर्चा झाली. त्यानंतर, आज काँग्रेस नेतृत्वासह शरद पवार यांची राजधानी दिल्लीत चर्चा झाली. त्यामुळे, आधी ठाकरे, पुन्हा गांधी, पण शरद पवारच राजकारणाच्या केंद्रस्थानी असं चित्र दिसून येत आहे. 

देशातील मोदी सरकारला प्रखर विरोध करण्यासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे, अशी भूमिका सर्वांनी घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी याज काँग्रेस नेत्यांशीही चर्चा केली. तसेच, इतरही पक्षांसोबत बोलणी करणार असल्याची माहिती आहे. 

दरम्यान, शरद पवार यांनी ठाकरे यांच्या राजीनाम्याबाबत व्यक्त केलेली नाराजी, तसंच फडतूस-काडतूस वादावरुनही ठाकरे यांना सुनावलेले खडे बोल या पार्श्वभूमीवर ही ठाकरे-पवार भेट झाल्याचं बोललं गेलं. ठाकरे-पवार भेटीवेळी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊतही उपस्थित होते. त्यानंतर, आज 

मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री, उद्योगपती गौतम अदाणी यांच्या जेपीसी चौकशीची मागणी यावरुन पवार यांनी घेतलेली वेगळी भूमिका यामुळे महाविकास आघाडीत मतभेद सुरु असल्याची चर्चा आहे. तर, राहुल गांधींच्या भूमिकेवरही पवार यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी दर्शवली होती. त्यामुळे, आजच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी, काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हेही उपस्थित होते. 

देशात सरकारी संस्थांचा दुरुपयोग होत आहे, युवकांजवळ रोजगार नाही. महागाई वाढत आहे, आणि बोलण्याच्या स्वातंत्र्यावरही गदा आणली जात आहे. त्यामुळे, देशातील लोकशाही वाचवण्यासाठी, तसेच देशाला वाचविण्यासाठी एकत्र येऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचं काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधींच्या भेटीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.   

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना