शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

एअर इंडियाच्या विमानांमध्ये जवानांना प्रथम प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 21:19 IST

एअर इंडियाच्या विमानांमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने हा निर्णय काल (मंगळवारी) घेतला असून याबाबत ट्विट केले आहे. 

नवी दिल्ली, दि. 16 - एअर इंडियाच्या विमानांमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने हा निर्णय काल (मंगळवारी) घेतला असून याबाबत ट्विट केले आहे. एअर इंडियाने ट्विटवर दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर, नौदल आणि वायूदल या तिन्ही दलातील जवानांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.  15 ऑगस्टपासून देशातील सर्व विमानतळांवर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. जगातील काही देशांमध्ये विमानात प्रवेश करताना जवानांना पहिल्यांदा सोडले जाते. त्याच धर्तीवर एअर इंडियाने हा निर्णय अवलंबला असल्याचे समजते. दरम्यान, एअर इंडियाचे कार्यकारी संचालक सरबजोत सिंग उबेरॉय यांनी ई-मेलद्वारे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. 

याचबरोबर, देशासाठी लढणा-या जवानांच्या योगदानाचा आमच्याकडून उचित सन्मान व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता एअर इंडियाच्या विमानांमध्ये प्रथम जवानांना आणि बिझनेस श्रेणीच्या प्रवाशांच्या आधी चढू दिले जाणार आहे. दरम्यान, एअर इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्वानी लोहानी यांनी सांगितले की, यासोबतच जवानांना देशातंर्गत विमान प्रवासाच्या भाड्यात काही प्रमाणात सवलत दिली जाणार आहे. 

आणखी वाचा -(एअर इंडिया का विकता?खासदारांचा सवाल)(एअर इंडिया विकण्यासाठी विमान कंपनीलाच प्राधान्य)(...तर टाटा ग्रुप एअर इंडिया कंपनी खरेदी करेल- रिपोर्ट)