शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

एअर इंडियाच्या विमानांमध्ये जवानांना प्रथम प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 21:19 IST

एअर इंडियाच्या विमानांमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने हा निर्णय काल (मंगळवारी) घेतला असून याबाबत ट्विट केले आहे. 

नवी दिल्ली, दि. 16 - एअर इंडियाच्या विमानांमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने हा निर्णय काल (मंगळवारी) घेतला असून याबाबत ट्विट केले आहे. एअर इंडियाने ट्विटवर दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर, नौदल आणि वायूदल या तिन्ही दलातील जवानांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.  15 ऑगस्टपासून देशातील सर्व विमानतळांवर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. जगातील काही देशांमध्ये विमानात प्रवेश करताना जवानांना पहिल्यांदा सोडले जाते. त्याच धर्तीवर एअर इंडियाने हा निर्णय अवलंबला असल्याचे समजते. दरम्यान, एअर इंडियाचे कार्यकारी संचालक सरबजोत सिंग उबेरॉय यांनी ई-मेलद्वारे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. 

याचबरोबर, देशासाठी लढणा-या जवानांच्या योगदानाचा आमच्याकडून उचित सन्मान व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता एअर इंडियाच्या विमानांमध्ये प्रथम जवानांना आणि बिझनेस श्रेणीच्या प्रवाशांच्या आधी चढू दिले जाणार आहे. दरम्यान, एअर इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्वानी लोहानी यांनी सांगितले की, यासोबतच जवानांना देशातंर्गत विमान प्रवासाच्या भाड्यात काही प्रमाणात सवलत दिली जाणार आहे. 

आणखी वाचा -(एअर इंडिया का विकता?खासदारांचा सवाल)(एअर इंडिया विकण्यासाठी विमान कंपनीलाच प्राधान्य)(...तर टाटा ग्रुप एअर इंडिया कंपनी खरेदी करेल- रिपोर्ट)