शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

23 वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच भारतात पहिल्यांदा वाजली होती मोबाइलची रिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 15:19 IST

1973 साली जगात मोबाइलचा वापर सुरू झाल्यापासून भारतात मोबाइल येण्यास तब्बल 22 वर्षे लागली होती.

नवी दिल्ली - मोबाइल हा आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आजच्या घडीला भारतात मोबाईलचे कोट्यवधी युझर्स असून, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र 1973 साली जगात मोबाइलचा वापर सुरू झाल्यापासून भारतात मोबाइल येण्यास तब्बल 22 वर्षे लागली होती. 1995 साली भारतात मोबाइलचे आगमन झाले आणि आजच्याच दिवशी 31 जुलै 1995 रोजी भारतात पहिल्यांदा मोबाइलची रिंग खणाणली होती. 31 जुलै 1995 रोजी तेव्हाचे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी तत्कालीन दूरसंचार मंत्री सुखराम यांना मोबाइलवरून फोन करून त्यांच्याशी संवाद साधला होता. ज्योती बसू यांनी हा फोन कोलकाता येथील रॉयटर्स बिल्डिंगमधून दिल्लीतील संचार भवनमध्ये केला होता.  भारतातील पहिली मोबाइल ऑपरेटर कंपनी मोदी टेल्स्ट्रा होती. याच कंपनीच्या सेवेला मोबाइल नेट या नावाने ओळखले जात असे. याच कंपनीच्या नेटवर्कवरून भारातातील पहिला मोबाइल कॉल करण्यात आला होता. मोदी टेल्स्ट्रा ही भारतातील मोदी ग्रुप आणि ऑस्ट्रेलियातील टेलिकॉम कंपनी टेल्स्ट्रा यांची संयुक्त कंपनी होती. ही कंपनी तेव्हाच्या देशातील आठ कंपन्यांपैकी एक होती ज्यांना भारताता सेल्युलर सर्व्हिस पुरवण्यासाठी परवाना मिळाला होता.  मात्र 1995 साली भारतात मोबाइल सेवा सुरू झाल्यानंतरही सर्वसामान्य भारतीयाच्या हातात मोबाईल फोन येण्यास बराच वेळ लागला. त्याचे कारण म्हणजे मोबाइल सेवेचे असलेले महागडे दर हे होते. त्याकाळी एका आऊटगोईंग कॉलसाठी 16 रुपये प्रति मिनीट एवढा दर होता. तर इनकमिंग कॉलवरही ठरावीक शुल्क आकारले जाई.  भारतात मोबाइल सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्या पाच वर्षांत मोबाइल युझर्सची संख्या 50 लाखांपर्यंत पोहोचली. त्यानंतर मात्र हा आकडा वेगाने वाढला. आज भारतातील 65 टक्क्यांहून अधिक लोकांकडे मोबाइल आहेत.  

टॅग्स :MobileमोबाइलIndiaभारतnewsबातम्या